Thursday, September 29, 2011

शारदीय नवरात्रोत्सव



("आपले सण - एक सुलभ संकल्पना" - वेदमूर्ती विनायक वासुदेव भातखंडे व विलास मोरेश्वर कर्णिकएम. एह्यांच्या पुस्तकातून)

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवाची पूर्वपीठीका प्रथम जाणून घेऊ. 


देवीची साडेतीन पीठे (गाद्या) आहेत. त्यांचा क्रमच लावावयाचा झाल्याससर्व प्रथम येते ती कोल्हापूरची अंबाबाई अर्थातच श्री महालक्ष्मी. ही देवी सात्विकतेचे द्योतक आहे व कोल्हापूरचे पीठ हे पूर्णपीठ मानले जाते. त्यानंतर राजसपणाचे प्रतिक म्हणजेच तुळजापूरची भवानी. हे दुसरे पूर्ण पीठ होय. माहुरची महामाया रेणुका ही परशुरामाची माता तसेच जमदग्नींची पत्नी असून तिचे स्थान हे तिसरे पूर्ण पीठ आहे. नाशिकची (वणीची) सप्तश्रुंगी जगदंबा अथवा अंबाजोगाईची योगेश्वरी ह्यांना अर्धपीठ समजले जाते. कुलाचाराप्रमाणे ह्या दोन्ही देविंपैकी एका देवीला अर्धपीठ मानणारे लोक आहेत. देशामध्ये इतर ठिकाणी असलेल्या देवी ह्या साडे तीन पिठाच्या देवीचीच रूपे आहेत. नवरात्रामध्ये पूजन केल्या जाणाऱ्या देविंमध्ये त्यामुळेच भिन्नभिन्नता आढळते.


देवी बसते म्हणजे काय?


शुंभ-निशुंभमधु-कैटभचंड-मुंडमहिषासुर आदि असुरांचा संहार करण्यास देवीला घनघोर युद्ध करावे लागले. निरनिराळ्या शक्तींचा प्रयोग केल्यावरच ह्या भयानक राक्षसांचा पाडाव होऊ शकला. त्यामुळे श्री विष्णू आदि देवांना देवीस विश्रांती देणे जरुरीचे आहे असे प्रकर्षाने वाटू लागले. नवखंडांतील शत्रूंचा नाश केल्यावर आलेला शीण घालवण्यासाठी प्रत्येक खंडासाठी एक रात्र अशा एकूण नऊ रात्री देवीनी विश्रांती घ्यावी ह्या हेतूने श्री विष्णुंनी देवीला स्थानापन्न व्हावे असे सांगितले. अशा प्रकारे स्थानापन्न झालेल्या देवीला 'देवी बसलीअसे म्हणतात. संपूर्ण नवरात्रीच्या काळात देवीला स्थानभ्रष्ट करू नयेम्हणजेच तिच्या विश्रांतीला धक्का लावू नयेअसा संकेत आहे.


देवी बसविण्याच्या भिन्न-भिन्न पद्धती 


नवरात्र हा जसा सण आहे तसेच ते व्रतसुद्धा आहे. कुलाचाराप्रमाणेजाती-जमाती प्रमाणेप्रदेशाप्रमाणे वगैरे विभिन्न पद्धती यासंबंधी आचरणात आणल्या जातात. जातीनिहाय उहापोह करणे शक्य नाही पण काही ज्ञाती अवलंबित असलेल्या प्रथा येथे उद्धृत केल्या आहेत.


नवरात्र याचा शब्दश: अर्थ नऊ रात्री असा आहे. म्हणजेच देवी नऊ रात्री बसलेल्या (विश्राम घेत असलेल्या) असावयास हव्यात. हा अर्थ धरल्यास अश्विन शुद्ध प्रतिपदेला बसलेली देवी ही दसऱ्याच्या दिवशीच उठवली गेली पाहिजेपरंतु कुलाचाराप्रमाणे काही ज्ञातीत नवमीची पूजा झाल्यावर देवीला उठविले जाते. त्याचप्रमाणे काही कुटुंबामध्ये फक्त कुलस्वामिनीची स्थापना करून तिला नऊ दिवस झेंडूच्या फुलाच्या माळा बांधल्या जातात. त्यांच्याकडे घटस्थापना आणि धान्याचे रोह लावण्याची प्रथा नसते. तसेच कुमारिका व सुवासिनी पूजन सुद्धा फक्त देवी बसता-उठता केले जाते. अखंड दीपप्रज्वलन मात्र असतेच असते. अशा मर्यादित स्वरुपात नवरात्र उत्सव काहीजणांकडे केला जातो. 


ज्यांच्याकडे विस्तृत स्वरुपात नवरात्र साजरे केले जाते त्यांची सर्वसाधारण पद्धती अशी आहे की कुलस्वामिनीची स्थापना करून त्याचबरोबर घटस्थापना तसेच घटाभोवती माती पसरून त्यात सप्त धान्ये (सालासह भात, ज्वारीबाजरीगहूकांगजवसचणे) पेरली जातात. कुलस्वामिनीचा टाक तसेच श्रीफळ ठेवलेला घट ह्यांच्यावर झेंडूची फुलेतिळाची फुले अथवा नागवेलीची पाने ह्यांच्या माळा नवरात्रीचे सर्व दिवस बांधल्या जातात. माळाच काएखादे पुष्प का नाहीह्याला तसा शास्त्रीय आधार काही नाही. फक्त टाक लहान असून एक-एक फुल जरी नऊ दिवस वाहिले तरी टाकाचे दर्शन होणार नाही म्हणून माळा बांधण्याची पद्धत अस्तित्वात आली असावी. तसेच ज्या विभागात जी फुले मुबलक त्या फुलांच्या माळा करण्याची पद्धत आली असावी. अखंड दीपप्रज्वलन हे सुद्धा आलेच.


नवरात्रीच्या व्रतामध्ये कुमारी पूजनाचे महत्व विशेष आहे. यथासांग नवरात्र साजरे करणाऱ्या कुटुंबामध्ये नवरात्रीचे सर्व दिवस कुमारिका व सुवासिनींचे पूजन केले जाते. तसेच अष्टमीला नऊ सुवासिनींची ओटी भरून विशेष हळदी कुंकू करण्याची प्रथा आहे. नवरात्रीमध्ये आपण करणार असू त्याचा संकल्प गुरुजींकडून पूजा करताना सोडावा लागतो. नऊ दिवस कुमारिका पूजन केल्यास शास्त्राप्रमाणे पृथ्वीचे राज्य मिळतेतर फक्त देवी बसता-उठता कुमारिकेचे पूजन केल्यास भोग व मोक्षप्राप्ती होते.


श्री देवी महात्म्यात सांगितल्याप्रमाणे एक वर्षाच्या कन्येचे पूजन करू नये. कुमारिका दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतची असावी. दोन वर्षाच्या मुलीची कुमारिका म्हणून पूजा करावीतीन वर्षाच्या कन्येची त्रिमूर्ती म्हणूनचार वर्षाची कल्याणीपाच वर्षाची रोहिणीसहा वर्षाची कालीसात वर्षाची चंडिकाआठ वर्षाची शांभवीनऊ वर्षाची दुर्गा आणि दहा वर्षाची सुभद्रा म्हणून पूजा करावी. घरातील कर्त्या माणसांनी उपवास करावेत. नवरात्रीच्या नऊ दिवसात श्री देवी महात्म्याचे वाचन करावे. ते शक्य नसल्यासअष्टमीच्या दिवशी बारावा अध्याय वाचावा अथवा नवार्णव मंत्राचा १०८ वेळा होम करावा.काही ज्ञातीमध्ये कुलदेवतेबरोबरच कुलस्वामींना सुद्धा पुष्पमाला घालण्याची पद्धत आहे. 


काही ज्ञातीमध्ये सप्तमीला घरातील कर्ती स्त्री डाळ-तांदुळाचा जोगवा पाच घरी मागूनतो शिजवून त्याचाच नैवेद्य देवीला दाखवते. देवीला वरण-पुरणाचा नैवेद्य नित्यनेमाने दाखवून चालतोपरंतु शास्त्राप्रमाणे कुमारिकेला दररोज नूतन वस्त्र देऊन तिचा सन्मान करावा व नैवेद्याच्या जेवणात खाली दिल्याप्रमाणे पदार्थ ठेवावेत. शक्य झाल्यास उत्तम फलप्राप्तीसाठी खाली दिलेले दिवस व त्याखाली दिलेल्या वारांची सांगड घालून नैवेद्य तयार करावा. 


नवरात्रीतील दिवस क्रमांक
नैवेद्यातील पदार्थ
अपेक्षित फलप्राप्ती
१ ला
तूप
निरोगीपणा
२ रा
साखर
दीर्घायुष्य
३ रा
दुध
दु:खनाश
४ था
अनारसे
विघ्ननाश
५ वा
केळी
बुद्धीवृद्धी
६ वा
मध
तेजवृद्धी
७ वा
गुळ
शोकनाश
८ वा
नारळाचे पाणी
तापनाश
९ वा
लाह्या
इहलोक सुख


वारांप्रमाणे नैवेद्यातील पदार्थ व त्यामुळे होणारी फलप्राप्ती खालीलप्रमाणे आहे.



वार
पदार्थ
फलप्राप्ती
रविवार
पायस (खीर)
सुखसमृद्धी
सोमवार
गाईचे दुध
प्रगल्भता
मंगळवार
केळी
सुबुद्धी
बुधवार
लोणी
स्वर्गलोक
गुरुवार
खडीसाखर
सुखप्राप्ती
शुक्रवार
सीताफळ
(शीतलता देणारे फळ)
दु:खनाश
शनिवार
हरभऱ्याचा पदार्थ
नेत्रदोष नष्ट 


नवरात्रीचा २ रा दिवस बुधवारी आल्यास दुसरा दिवस म्हणून साखर व बुधवार म्हणून लोणी घ्यावे. ज्या लोकांची देवी शत्रूंचे निर्दालन करून राज्य उपभोगणारी आहेअशा देवींना अष्टमीला बळी लागतो. तसेच अष्टमीलाच घागर फुंकण्याची सुद्धा प्रथा आहे. ह्याच दिवशी काही ज्ञातींमध्ये लग्नापासून पाच वर्षे नवविवाहिता पुत्रप्राप्ती व ऐश्वर्यासाठी खड्यांच्या महालक्ष्मीची सुद्धा पूजा करतात. 

हल्ली जर चार भाऊ वेगवेगळे राहत असतील तर एकाकडेच नवरात्र करतातपरंतु हे अयोग्य असून चारही भावांकडे स्वतंत्र नवरात्र होणे आवश्यक आहे. सार्वजनिक नवरात्र हा प्रकार तर सर्वथा अयोग्य आहे. गुजरात मध्ये असलेल्या ह्या प्रथेचा तेथून महाराष्ट्रात आलेल्या समाजाने चालू केलेल्या ह्या उत्सवास समाज विघातक असे वळण मिळालेले आपणाला दिसेल. ओळीने नऊ रात्री अती कर्कश वाद्यांच्या साथीने गरबा खेळून शांतता भंग करणेकितपत योग्य आहेयाचा संबंधीतांनी विचार करावा. 


पुरवणी 


नवरात्रीत आपण ज्या दुर्गेची आपण पूजा करतो तिची नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी निरनिराळी रूपे असतात. अर्थातच देवीचे पूजन करताना तिची खालील नामरूपे लक्षात ठेवावीत. 


प्रथमेस - शैलपुत्री 
द्वितीयेस - ब्रह्मचारिणी 
तृतीयेस - चंद्रघंटा 
चतुर्थेस - कुष्माण्डा
पंचमीस - स्कंदमाता 
षष्ठीस - कात्यायनी 
सप्तमीस - काळरात्री
अष्टमीस - महागौरी 
नवमीस - सिद्धदात्री 



नवरात्रीतील पंचमीस 'ललिता पंचमीम्हणतात व काही कुटुंबात तेव्हा उपांगललिता हे व्रत केले जाते. हे व्रत पुत्रपौत्र प्राप्तीधनधान्यसमृद्धीकौटुंबिक स्वास्थ्य ह्यासाठी कुटुंबप्रमुखाने करावयाचे आहे. ह्या व्रतासाठी पूर्ण रात्रभर असलेली पंचमी घ्यावी. ह्या व्रतात ललीतादेविला ४८ दुर्वांची एक जुडी ह्याप्रमाणे ४८ जुड्या वहाव्यात. ह्यासाठी पंचमीला ललीतागौरीची स्थापना व दुसरे दिवशी विसर्जन करावे लागते. 


नवरात्रीमध्येच येणाऱ्या सप्तमीस 'सरस्वतीशयन सप्तमीअसे म्हणतात. श्रीदेवी महात्म्यामध्ये सांगितल्या प्रमाणे सप्तमीपासून दशमी पर्यंत पठण-पाठणलेखन ह्या गोष्टी ह्या काळात बंद ठेवाव्यात कारण सरस्वतीने शयन केलेले असते. ह्या संदर्भात हे लक्षात घ्यावे की गुरुकुलात शिकत असलेल्या शिष्यांसाठी हा उपदेश आहे. नित्यनेमाने करावयाच्या वाचन-लेखनाला हरकत नाही.


नवरात्री व्रत हे वास्तविक पहाता नऊ रात्रींचे व्रत आहे पण सध्याच्या वेगवान जगात ९ दिवस यथासांग पूजन करण्यास वेळ मिळणे सुद्धा नव्या पिढीला कठीण आहे. अशा परिस्थितीतशास्त्रानेच सर्व पूजा वगैरे विधी नवमीला करण्याची सोय ठेवली आहे. त्याला 'एकदिवसीय नवरात्रअसे म्हणतात. ह्या एका दिवसातच नऊ दिवस होणारे सर्व कुलाचार पार पाडावे लागतात.

No comments:

Post a Comment