Sunday, January 28, 2024

पंचारण्य स्थळंगल

दक्षिण भारतातल्या कावेरी नदीच्या दक्षिण काठावर पांच अरण्यांमध्ये पांच शिव मंदिरे आहेत ज्यांना एकत्रित पणे पंचारण्य स्थलंगल असं संबोधलं जातं. असा समज आहे कि ह्या मंदिरांचं एका दिवसात दर्शन घेतलं तर हरिद्वारला दर्शन घेतल्याचं फळ मिळतं.

सध्याच्या दिवसात आता आधुनिक वाहतुकीच्या सोयींमुळे ह्या मंदिरांना एका दिवसात भेट देणं सहज शक्य झालं आहे. 

ह्या मंदिरांची यादी खालील तक्त्यामध्ये दिली आहे. येणाऱ्या सप्ताहांमध्ये ह्या प्रत्येक मंदिराची विस्तारित माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.


नाव

स्थळ

मंदिराचे नाव

वनाचे नाव

स्थळ वृक्ष

भगवान शिवाचे नाव

श्री पार्वतीचे नाव

विशेष देवता

दर्शनाची वेळ

थिरुकरुकावूर 

पापनाशम तालुका, तंजावूर जिल्हा, तामिळनाडू

श्री मुल्लईवन नाथर 

चमेली

चमेली

श्री मुल्लईवन नाथर

श्री करुकात्थरनायकी

श्री कर्पगविनायकर

सकाळी ६

अवळीवनल्लूर 

पापनाशम तालुका, तंजावूर जिल्हा, तामिळनाडू

श्री साक्षीनाथर मंदिर

कर्ण फुल वृक्ष

कर्णफूल

श्री साक्षीनाथर

श्री सौन्दर्यनायकी

श्री मुरुगन

सकाळी ८

हरिद्वारमंगलम

हरिद्वारमंगलम

श्री पाताळेश्वरर

शमी वृक्ष

शमी

श्री पाताळेश्वरर

श्री अलंकारवल्ली

श्री पाताळेश्वर

दुपारी १२

आलंगुडी

आलंगुडी

श्री आपत् सहाय्येश्वरर्

रेशीम कापूस

रेशीम कापूस

श्री आपत् सहाय्येश्वरर्

श्री एलवरकुळली

श्री दक्षिणामूर्ती

संध्याकाळी ५.३०

थिरुक्कोल्लम 

नन्निलंतालुका, तंजावूर जिल्हा, तामिळनाडू

श्री बिल्ववन ईश्वरर मंदिर

बिल्ववन

बिल्ववृक्ष

श्री बिल्ववनेश्वरर 

श्री सौन्दर्यअंबिका

श्री नटराज

संध्याकाळी ८.३०

 

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


Thursday, January 25, 2024

Shri Kabartheeshwarar Temple at Thiruvalanchuzhi

This shiva temple is one of the sapta thana Shiva temples associated with Shri Adikumbheshwarar Temple of Kumbhakonam. This temple is famous as Shri Shweta Vinayaka Temple of Thiruvalanchuri. This temple is about 1 km from Kumbhakonam on Kumbhakonam Tanjavur route via Papanasham.


Mulavar: Shri Kabartheeshwarar, Shri Valanchuzhinathar, Shri SenchataiNathar

Devi: Shri Mangalanayaki, Shri Periyanayaki Ambal

Sacred Teertha: river Kaveri, Arasalaru, Jada teertha

Kshetra Vruksha: Bilva tree

Puranik name: Shaktivanam, Thirunaavartham, Dakshinavartam


Kshetra Puran: 

  1. The Sgae Yayarava had 100 sons. He prayed to Shri Parvati Devi for a daughter. Shri Parvati Devi decided to take birth as his daughter as she wanted to see herself getting married to Shri Shiva with matted hair. At very early age she told her father about her wish and started doing penance. With her divine power, she made a shiva linga out of sand. In order to make the Shiva linga she prayed and requested Shri Shiva to fetch water from Ganges. Shri Shiva obliged and created sacred tank known as Jatatirtha with Ganges water from his matted hair. Since Shri Parvati Devi wished to marry Shri Shiva with matted hair the name of Shri Shiva here is Shri Kabardieeshwarar (kabar in Urdu also means jata). Shri Shiva appeared according to Shri Parvati Devi’s wish and married with her at this place. As per Shri Parvati Devi’s wish Shri Shiva stayed at this place in the form of a Shiva Linga which is worshiped as Shri Kabardeeshwarar.


    The following legend explains why the name is Thiruvalanchuzi. The detail is obtained from a grantha known as Abhidana Chintamani. During Samudra Manthan they started the churning the ocean of milk with Vasuki (snake) as churning rope. She started splitting venom which became unbearable. When devas approached Shri Shiva for a remedy, he reminded them that they have forgotten to worship Shri Ganesha first. So they made an idol of Shri Ganesh from the foam of ocean of milk. And after worshiping they got relief from venom. This idol of Shri Ganesha is known as Sweta Vinayaka. 


    Shri Indra desired to have Sweta Vinayaka for his worship. At the same time the other devas were also interested in same. Finally it was decided to worship Sweta Vinayaka at everyone’s place for some time. Sweta Vinayaka was worshiped by Shri Shiva and Shri Parvati Devi for some time at Kailash, by Shri Maha Vishnu and Shri Mahalakshmi at Shri Vaikuntha, by Shri Brahma and Shri Saraswati Devi at Satyaloka and then finally it came to Shri Indrani Devi and Shri Indra Deva at Indraloka. When Shri Indra had to leave Indraloka due to curse of Ahalya, for an atonement he started on a pilgrimage. He took Sweta Vinayaka along with him. Shri Indra reached this place and decided to have a bath at Jatatirtha. Shri Shiva felt that Sweta Vinayaka should be installed at this place. So he appeared as a small brahmin boy. Shri Indra Deva handed over the idol to small brahmin for a safe keeping while taking a bath. He forgot the instructions that the idol should not be kept on the ground. When Shri Indra Deva took dip in the water the boy kept the idol on the ground and disappeared. Shri Indra tried to uproot it from the place but could not do so. A celestial voice instructed him to leave the idol in the same place and worship the idol on Mondays in the shukla paksha in the month of August (second fortnight August) to first fortnight of September. But still Shri Indra tried to move the idol with the help of chariot, horses and elephants and he failed miserably. The celestial voice of Shri Shiva again instructed him to stop his attempts. Shri Shiva told him that Shri Sweta Vinayaka will grace and fulfill desires of one and all by staying in Kailash in Krutayuga, at Vaikuntha in Tretayuga, at Satyaloka in Dwaparyuga, and on earth in Kaliyuga.

  2. Once Shri Adishesha came from patal loka on Mahashivaratri day to worship Shri Shiva at this place creating a big hole. River Kaveri started flowing through this hole circulating Shri Shiva temple. The Chola king known as Haridhwajan felt that his people will be deprived of the water and there may be famine due to the Kaveri flowing into the patala loka. He prayed to Shri Shiva in order to get her back and flow through his kingdom. The divine voice of Shri Shiva told the king that Kaveri can be brought back only when king or a sage sacrificed his life by entering  the hole. The king decided to enter  the hole himself for the sake of his people. Sage Atri (also known as Heranda) who was performing penance at nearby Kottaiyur village stopped the king from the entering the hole. He felt that king's life is more precious than his and hence was ready to sacrifice for the people and he entered the hole and brought Kaveri back. The place where river Kaveri came out is known as Melakaveri. The sage came out of the hole at the place known as Thiruvalanpuram which is at present known as Melaperumpallam. Later Sage Atri did penance at Melaperumpallam and attained salvation. 


This temple is one of the 276 Padal Petra Sthalams on the southern bank of river Kaveri. The temple is also addressed as Vellai (Shwetavinayaka Temple). This is an east facing temple with three parikramas. It is spread about an area of 7.25 acres. The Rajagopuram is five tiered. It is considered to be beneficial and auspicious to worship in this temple. At this temple along with the shiva temples at Thirunallar, Pattishwaram, Keezhapazhayarai and Avoor in a day during Dakshinayan. This temple is about 1700 years old. 


Shri Vinayaka in this temple is made from the foam, hence no abhishek is done. Civates is sprinkled along with raw camphor powder as abhishek. As this idol of Shri Vinayaka is not touched by hand he is known as Theendatha Thirumeni (untouched body).


Koshtha murtis: Shri Nardana Vinayaka, Shri Nataraja, Shri Bhikshatanar, Shri Dakshinnamurti, Shri Brahma, Shri Lingothbhavar, Shri Ardhanareeswarar, Shri Durga Devi, Shri Chandikeshwarar.


Idols of Shri Shiva and Shri Parvati Devi, shrine of Shri Vishnu, Shri Muruga, Shri Nataraja, Shri Somaskandaha, Shri Gajalakshmi, Brahma Linga, Shri Surya, Shri Chandra, Shri Kashi Vishwanath along with Shri Vishalakshi Devi, Twin (Irattiai) Vinayaka, Shri Durga Devi with sapta matrikas are found in the corridors. Shrine of Shri Brihannayaki Devi (Periyanayaki) is to the right of Shri Shiva’s shrine. We come across separate shrines for Shri Ashtabhuja Mahakali, Shri Heranda Maharishi and Shri Bhairav. According to Puran, once sages and devas conducted a yadnya at this place. Each of them installed a Shiva linga, hence we find 22 of them in a row along with the names of the sages who installed them in the outer parikrama.

Shri Shiva and Shri Pravati Devi shrines are facing the east. Shri Parvati Devi is on the right side of Shri Shiva. According to Shaiva saint Shri Sambandhar one must have done great punya for entering this temple and worship Shri Shiva. 


There are two shrines of Shri Muruga namely one is Shri Shanmukha, and the other is Shri Subramanya with Shri Valli and Shri Deivayani. The shape of sanctum sanctorum is semi circular. As per Marut puran Mahalingehswarar temple at Thiruvaduthurai has nine temples as pariwar sthalam and this is one of them. They are namely


  • Shri Shwetavinayaka at Thiruvalanchuzhi
  • Shri Subramanya at SwamiMalay
  • Shri Dakshinamurti at Alangudi
  • Shri Nandi at Thiruvaduthurai
  • Shri Navagraha at Suryanar Kovil
  • Shri Chandikeshwarar at Seinganur
  • Shri Nataraja at Chidambaram
  • Shri Bhairava at Sirkazhi
  • Shri Somaskandhar at Thiruvarur


Those who worshiped at this place: Shri Parvati Devi, Shri Mahavishnu, Shri Brahma, Shri Indra, Shri Adi Shesha, and Shri Heranda Maharishi. 


In continuation we will writing Shwetavinayaka temple.


Festivals:

  1. Avani (Aug-Sept): Vinayaka Chaturthi

  2. Purattasi (Sept-Oct): Navaratri

  3. Aippassi (Oct-Nov): Skandashashthi and Annabhishek

  4. Karthigai (Nov-Dec): Thirikarthigai festival (light festival)

  5. Margazhi (Dec-Jan): Thiruvaduthirai (Arudra darshan)

  6. Thai (Jan-Feb): Makar sankrant

  7. Masi (Feb-Mar): Mahashivaratri

  8. Pradosha puja is performed during Pradoshakaal


Address:

Thiruvalachzhinathar Temple

At post Thirivalachuzhi via Swami Malai

Kumbhakonam, 612302

Telephone number: 91-4352454421, 91-4352454026


Courtesy: Various websites and blogs


Sunday, January 21, 2024

श्री चिदंबरम

हे मंदिर अतिभव्य मंदिरांपैकी एक आहे. पंचमहाभूतांपैकी हे आकाश ह्या तत्वाचं प्रतीक आहे. नायनमारांनीं ज्या २७६ मंदिरांमध्ये भगवान शिवांची स्तुती केली त्या पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण एक आहे. तामिळनाडू राज्यातील कडलूर ह्या जिल्ह्यामध्ये हे मंदिर वसलं आहे. 


पंच सभइ म्हणजेच भगवान शिवांनी ज्या पांच स्थळांमध्ये तांडव नृत्य केलं त्या स्थळांपैकी पण एक आहे. पंच सभइ स्थळांमध्ये ह्या स्थळाला सुवर्ण सभा  (तामिळ मध्ये पोन्नबलं) असं नाव आहे. चिंदंबरमला थिल्लई (एक प्रकारचं खारपुटी झाड) असं पण म्हणतात कारण ह्या स्थळामध्ये ह्या प्रकारची खूप झाडं होती. ह्या मंदिराला चिदंबरम नटराज मंदिर असं पण म्हणतात. हे मंदिर साधारण २००० वर्षे जुनं आहे. 


मुलवर: श्री थिरुमोल्लनादर, श्री कुठनादर

देवी: श्री उमयांम्बीका, श्री शिवगामसुंदरी

क्षेत्र वृक्ष: थिल्लई 

पवित्र तीर्थ: शिवगंगा, व्याघ्रपाद तीर्थ, अनंत तीर्थ, ब्रह्म तीर्थ. ह्या शिवाय अजून पण काही तीर्थे आहेत. एकूण साधारण १० तीर्थे आहेत. 


क्षेत्र पुराण:

वसिष्ठ ऋषींनी एकदा आपल्या आप्तेष्टाच्या माध्यंदिनार नावाच्या पुत्राला पूर्णज्ञान प्राप्तीसाठी थिल्लईवनं येथील स्वयंभू शिवलिंगाची उपासना करण्याचा उपदेश दिला. ह्या उपासनेमध्ये सूर्योदयाच्या आधी झाडाची फुले गोळा करून ती शिवलिंगावर वाहणे अपेक्षित होतं. पण हे त्या मुलाला जमत नव्हतं. सूर्योदयाच्या आधी अंधारामध्ये झाडावर चढून फुलं काढणं त्याला शक्य नव्हतं आणि सूर्योदयानंतर त्या फुलांमधील मध मधमाश्यांनी शोषल्यामुळे ती फुलं शिवलिंगावर वाहण्यासाठी अयोग्य होती. त्याने भगवान शिवांची प्रार्थना केली आणि आपली असमर्थता व्यक्त केली. भगवान शिवांनी त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला वाघासारखे पाय दिले आणि अंधारामध्ये फुलं शोधण्याची दृष्टी पण प्रदान केली. आणि त्यामुळे त्या मुलाची उपासना पूर्ण होऊ शकली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्याला ऋषिपद प्रदान केलं आणि भविष्यात व्याघ्रपाद ऋषी ह्या नावाने तो प्रसिद्धी पावेल असा आशीर्वाद दिला. 


मुख्य आख्यायिका अशी आहे. थिल्लईवनामध्ये काही ऋषी तपस्या करून आपलं जीवन व्यतीत करत होते. त्यांच्या तपश्चेर्येने त्यांना आपल्या यज्ञयागादी कर्मांमुळे आपण देवांवर नियंत्रण करू शकतो असा अभिमान  झाला. त्यांच्या आभिमानाचं हरण करण्यासाठी भगवान शिव ह्या वनामध्ये भिक्षादनर रूपामध्ये अवतरले. आणि त्यांच्याबरोबर भगवान विष्णू पण मोहिनी ह्या स्त्री रूपामध्ये अवतरले. भगवान शिवांचं भिक्षादनर हे रूप खूप मोहक होतं आणि त्यामुळे ऋषींच्या पत्नी त्या रूपावर भाळल्या आणि त्यामुळे त्यांचं आपल्या पतींच्या कर्मामध्ये लक्ष लागेना. त्याचबरोबर ऋषि पण भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाकडे मोहित झाले. आपल्या पत्नींची अवस्था बघून ऋषींनी भिक्षादनरचा नाश करण्याचा प्रयत्न चालू केला. त्यांनी अत्यंत उग्र वाघाला निर्माण करून त्याला भिक्षादनरवर म्हणजेच भगवान शिवांवर सोडला. पण भगवान शिवांनी त्या वाघाला मारून त्याचं कातडं आपल्या कमरेभोवती गुंडाळलं. मग ऋषींनी एका उग्र हत्तीला भगवान शिवांवर सोडलं. भगवान शिवांनी त्या हत्तीचा संहार केला. म्हणूनच भगवान शिवांना गजसंहार असं नाव प्राप्त झालं. ऋषींनी त्यानंतर एका राक्षसाला आवाहन करून त्याला भगवान शिवांवर सोडलं. भगवान शिवांनी त्याला स्तंभित केलं. अंततः ते ऋषी भगवान शिवांना शरण गेले कारण त्यांना कळून चुकलं कि भगवान शिव हे मंत्र आणि कर्मकांडाच्या पलीकडे आहेत आणि फक्त ह्यांच्या साहाय्याने ते वश होत नाहीत. 


मंदिरातल्या देवता आणि मुर्त्या:

१. श्री थिरुमोल्लनादर आणि श्री उमैल्या - व्याघ्रपाद ऋषी आणि पतंजली ऋषींनी पूजिलेलं शिव लिंग 

२. ६३ नायनमारांच्या मुर्त्या

३. श्री शिवगामसुंदरी 

४. श्री विनायक 

५. श्री मुरुग 


ह्याशिवाय अजून पण इथे अनेक छोट्या मुर्त्या आहेत.


मंडप (सभा, अंबालम)

१. चित्रम्बलं - ह्या मंडपामध्ये श्री नटराज आणि श्री शिवगामसुंदरी ह्यांच्या मुर्त्या आहेत.   

२. पोन्नबलं किंवा कनकसभा - पूजा उपचार ह्या मंडपामध्ये साजरे होतात. 

३. नृत्यसभा - हा ५६ स्तंभ असलेला मंडप ध्वजस्तंभाच्या समोर आहे. ह्या मंडपामध्ये श्री नटराजांनी श्री कालीदेवींना नृत्यामध्ये पराभूत केलं आणि आपल्या प्रभुत्वाची प्रचिती दिली. 

४. राजसभा - हा १००० स्तंभ असलेला मंडप सहस्रार ह्या योगचक्राचं प्रतीक आहे. 

५. देवसभा - ह्या मंडपामध्ये पंच मूर्ती आहेत  - श्री गणेश, श्री सोमस्कंद, श्री शिवानंदनायकी देवी आणि श्री चंडिकेश्वर


मंदिराची वैशिष्टये:

ह्या मंदिरातील मुख्य देवता स्वयंभू लिंग आहे ज्याचे नाव श्री थिरुमोल्लनादर आहे. अधिदेवता श्री नटराज आहेत. श्री थिरुमोल्लनादर ह्यांच्या पश्चिमेला दगडापासून बनवलेलं झाड आहे. भगवान विष्णू (श्री गोविंदराज पेरुमल) आणि श्री थिल्लई काली ह्यांच्या मुर्त्या जवळजवळ आहेत. श्री नटराजांच्या समोर असलेल्या मंडपातून श्री ब्रह्म, श्री विष्णू आणि श्री शिव ह्यांचं एकत्र दर्शन होतं. ह्या मंदिराला चित्रम्बलं असं पण नाव आहे. 


ह्या मंदिरामध्ये आपल्याला भगवान शिवांचं ३ रूपांमध्ये दर्शन होतं - श्री नटराज, आकाश लिंग आणि स्फटिक लिंग. व्याघ्रपाद ऋषी आणि पतंजली ऋषी ह्यांनी इथे भगवान शिवांची आराधना केली. त्यांच्या उपासनेचा प्रतिसाद म्हणून भगवान शिवांनी त्यांना ३००० मुनींसमवेत इथे दर्शन दिलं. थै ह्या तामिळ महिन्यातील (जानेवारी-फेब्रुवारी) पुष्य नक्षत्रावर इथे उत्सव साजरा केला जातो. 


असा समज आहे की माणसाला मुक्ती प्राप्त होण्यासाठी त्याचा जन्म थिरुवरुर येथे झालेला असला पाहिजे, किंवा त्याच वास्तव्य कांची मध्ये असलं पाहिजे किंवा त्याला थिरुवन्नमलै ह्याचं सतत स्मरण असलं पाहिजे किंवा त्याचा मृत्यू काशीमध्ये व्हायला पाहिजे. तसेच श्री नटराज किंवा श्री थिरुमोल्लनादर ह्यांची आराधना केल्यामुळे पण मुक्ती मिळते. 


श्री आदी शंकराचार्यांनी इथल्या श्री अंबिका देवीच्या देवालयामध्ये श्री चक्राची स्थापना केली आहे. 


मंदिराची महती:

१. पंच भूत स्थळांपैकी श्री कालहस्ती, श्री कांचीपुरम आणि श्री चिदंबरम हे ७९’४१” पूर्व रेखांशामध्ये एका सरळ रेषेमध्ये आहेत. श्री थिरुवन्नईकवल हे ह्या रेषेच्या ३’ दक्षिणेकडे आणि ह्या रेषेच्या उत्तरेच्या टोकाच्या १’ पश्चिमेकडे आहे. श्री थिरुवन्नमलै हे ह्या रेषेवर दोघांच्या मध्ये आहे. 

२. ह्या मंदिराची ९ प्रवेशद्वारे हि मानवी शरीराच्या ९ द्वारांची प्रतीके आहेत. 

३. पोन्नबलं ह्या मंडपातील गाभारा हे हृदयाचं प्रतीक आहे. ह्या गाभाऱ्याला पाच पायऱ्या आहेत ज्या पंचाक्षरी (शि वा य न म) मंत्रातील एक एक अक्षराचं प्रतीक आहेत.

४. पोन्नबलं मंडप २८ स्तंभांच्या आधाराने बनला आहे. हे २८ स्तंभ २८ आगमांची (पूजेच्या पद्धती)  प्रतीके आहेत.  

छतावरील ६४ तुळया ह्या ६४ कलांची प्रतीके आहेत. तुळयांचं जाळं हे रक्त वाहिन्यांचं प्रतीक आहे. छतावरील २१६०० सोन्याच्या टाईल्स ह्या २१६०० श्वासांची प्रतीके आहे. आणि ह्या टाईल्स ज्या ७२००० खिळ्यांनी घट्ट बसवल्या आहेत ते खिळे मानवी शरीरातल्या ७२००० नाड्यांची प्रतीके आहे. ह्या मंडपातील ९ सुवर्ण कलश ९ प्रकारच्या ऊर्जा किंवा शक्तींची प्रतीके आहेत. अर्थ मंडपामध्ये ६ स्तंभ आहेत जी ६ शास्त्रांची प्रतीके आहेत.

५. अर्थ मंडपाच्या शेजारच्या सभागृहामध्ये १८ स्तंभ आहेत जे १८ पुराणांची प्रतीके आहेत. 


मंदिरात साजरे होणारे सण:

ह्या मंदिरात ६ प्रमुख सण साजरे होतात 

१. चित्राई (एप्रिल-मे): तिरुवोनं 

२. आनी (जून-जुलै): उत्तिरं नक्षत्र उत्सव 

३. अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): ह्या महिन्याच्या चतुर्दशीला उत्सव साजरा केला जातो  

४. पूरत्तासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): ह्या महिन्याच्या चतुर्दशीला उत्सव साजरा केला जातो

५. मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवदीराई

६. मासी (फेब्रुवारी-मार्च): ह्या महिन्याच्या चतुर्दशीला उत्सव साजरा केला जातो

७. फेब्रुवारी महिन्यात नाट्यांजली उत्सव साजरा केला जातो ज्यामध्ये भरतनाट्यमचे नृत्यक नृत्य करून श्री नटराजांना आदरांजली वाहतात. 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

Saturday, January 13, 2024

श्री थिरुवन्नामलै मंदिर

हे मंदिर तामिळनाडू मधल्या थिरुवन्नामलै ह्या गावामध्ये वसलेलं आहे. हे पंच भूत स्थळांपैकी एक आहे. पंच महाभुतांमध्ये हे अग्नी ह्या तत्वाचं प्रतीक आहे. ६३ नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण एक आहे. हे मंदिर आथार स्थळांपैकीपण एक आहे आणि तांत्रिक चक्रांपैकी हे मणिपूर चक्राचं प्रतीक आहे. ह्या ठिकाणी शिव लिंग हे पर्वताच्या रूपात आहे. पर्वताच्या बाजूचा भागात हे मंदिर आहे. ह्या स्थळाला शोणचलम, शोणगिरी आणि अरुणाचल अशी पण नावे आहेत. पुराणांनुसार इथे भगवान शिव हे ज्योती स्वरूपात आहेत. 


मुलवर: श्री अण्णामलैयार 

देवी: श्री पार्वती देवी, श्री उण्णामली अम्मन, श्री अभिथा गुजांबळ 

पवित्र तीर्थ: अग्नी तीर्थ 


क्षेत्र पुराण:

एकदा श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णू ह्यांच्या मध्ये त्या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे ह्यावर वाद निर्माण झाला. ह्या वादाचं निरसन करण्यासाठी ते भगवान शिवांकडे गेले. भगवान शिव एका भव्य ज्योतिस्तंभाच्या रूपात प्रकट झाले ज्याच्या अंताचा आणि उगमाचा ठावठिकाणा जाणणे अशक्य आहे. त्यांनी श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव दोघांनाही ह्या त्यांच्या रूपाच्या उगमाचा आणि अंताचा शोध घेण्यास पाठविले. श्री विष्णू वराह अवतार घेऊन त्या स्तंभाचा तळ शोधण्यास गेले तर श्री ब्रह्मदेव हंसाच्या रूपामध्ये ह्या स्तंभाचे शिखर शोधण्यास गेले. श्री ब्रह्मदेवांना केतकी पुष्प दिसलं म्हणून त्यांना वाटलं आपल्याला शिखराचा शोध लागला पण श्री विष्णूंनी मात्र मान्य केलं की त्यांना तळाचा शोध लागला नाही म्हणून. श्री ब्रह्मदेव खोटं बोलले म्हणून भगवान शिवांनी त्यांना शाप दिला कि त्यांची पृथ्वीवरील कुठल्याही मंदिरात त्यांची पूजा होणार नाही. 


अजून एका आख्यायिकेनुसार एकदा कैलास पर्वतावरील एका बागेमध्ये भगवान शिव आणि श्री पार्वतीदेवी असताना श्री पार्वती देवींनी खेळीमेळीमध्ये भगवान शिवांचे डोळे मिटले. पण त्यांच्या ह्या कृत्यामुळे जगाचे व्यवहार स्तंभित झाले आणि त्यामुळे श्री पार्वती देवींकडून पाप घडलं. ह्या पापाचं निरसन करण्यासाठी त्या ह्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी अजून काही शिव भक्तांसमवेत तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येचं फळ म्हणून भगवान शिव अन्नमलै पर्वतावर एका भव्य ज्योतिस्तंभाच्या रूपात प्रकट झाले आणि त्यांनी श्री पार्वतीदेवींवर कृपेचा वर्षाव केला. म्हणून अन्नमलै मंदिराच्या मागे असलेला अन्नमलै पर्वत (लाल पर्वत) हा पवित्र मानला जातो आणि ह्या पर्वतालाच शिव लिंग समजलं जातं.  


मंदिराबद्दल माहिती:


गाभाऱ्याच्या मागे श्री वेणूगोपाळस्वामी (श्री कृष्ण) ह्याची मूर्ती आढळते. गाभाऱ्याच्या भोवती श्री सोमस्कंद, श्री दुर्गा, श्री चंडिकेश्वर, श्री गजलक्ष्मी, श्री आरूमुगस्वामी (श्री संकमुख), श्री दक्षिणामूर्ती आणि श्री लिंगोद्भवर ह्यांच्या मुर्त्या आढळतात. गाभाऱ्याच्या भोवतीच्या दुसऱ्या आवरणामध्ये श्री पार्वती देवींची मूर्ती आहे जिचे नाव श्री उन्नमलै अम्मन असे आहे. ध्वजस्तंभाच्या उत्तरेला श्री संबंध विनायकाची मूर्ती आहे. इथे १००० स्तंभ असलेलं एक सभागृह आहे आणि त्याच्या दक्षिणेला श्री सुब्रह्मण्य ह्यांचे देवालय आहे. इथे एक भूमिगत शिव लिंग आहे ज्याला पाताळ लिंग असे म्हणतात. इथे श्री नंदि आणि श्री सूर्य ह्यांची पण मंदिरे आहेत.


ह्या पर्वताच्या उतारावर श्री रमण महर्षी ह्यांनी तपश्चर्या केली. ह्या पर्वताच्या पायथ्याशी त्यांचा आश्रम आहे. ह्या शिवाय संत शेषाद्री स्वामिगळ, योगी रामसुरत कुमार ह्यांचा पण ह्या स्थळांशी संबंध आहे. 


ज्या दिवशी भगवान शिव इथे एका भव्य ज्योतिस्तंभाच्या रूपात प्रकट झाले तो दिवस सर्व जगात महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो. ह्या ठिकाणी तो सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. स्कंद पुराणातल्या महेश्वर खंडामध्ये महर्षी व्यासांनी अरुणाचलाचा महिमा वर्णन केला आहे. 


श्री रमण महर्षी ह्या स्थळाबद्दल म्हणतात - “काशी, वाराणसी आणि हृषीकेश हि स्थळे भगवान शिवांची निवासस्थाने समजली जातात, तर अरुणाचल हे मात्र स्वतः भगवान शिवच आहेत. हे खूप गोपनीय स्थान आहे. हे स्थळ ज्ञानदात्री क्षेत्र आहे. इथे साक्षात भगवान शिव हे अरुणाचल ह्या पर्वतरूपी ज्योतिस्वरुपात आहेत.”


अरुणाचल महिमानुसार असं म्हणलेलं आहे कि - एखाद्याला चिदंबरमच दर्शन घेतल्यावर मुक्ती मिळेल, किंवा थिरुवरुर मध्ये जन्मास आल्यामुळे मुक्ती मिळेल, किंवा काशीमध्ये मृत पावल्यामुळे मुक्ती मिळेल, पण अरुणाचलाचा नुसता विचार मनात आल्यामुळे मुक्ती मिळते.  


ह्या पर्वताच्या प्रदक्षिणेला गिरिवलम असं म्हणतात. ह्या गिरीवलमच्या मार्गावर १२ राशींच्या संबंधित आठ छोटी मंदिरे आहेत. 


देव 

रास

दिशा

श्री इंद्र

वृषभ, तूळ

पूर्व

श्री अग्नी 

सिंह

आग्नेय

श्री यम

वृश्चिक

दक्षिण

श्री निरुत्ती

मेष

नैऋत्य

श्री वरुण

मकर, कुंभ

पश्चिम

श्री वायू

कर्क

वायव्य

श्री कुबेर

धनु, मीन

उत्तर

श्री ईशान

मिथुन, कन्या

ईशान्य



मंदिरात साजरे होणारे सण:


इथे ४ महत्वाचे सण साजरे होतात - ब्रह्मोत्सव, कार्थिगई दीपम, चैत्र पौर्णिमा, थिरु


थै (जानेवारी-फेब्रुवारी): थिरुवुदळ (ह्या दिवशी श्री नंदिदेवांना फळे, भाज्या आणि स्वादिष्ट पदार्थांनी सजवल जातं, तामिळनाडूमध्ये हा बैलांचा सण म्हणून साजरा केला जातो ज्याला माट्टू-पोंगल असं म्हणतात. हा मकर संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. ) 

चित्राई (एप्रिल-मे): ब्रह्मोत्सव, चैत्र पौर्णिमा

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम


ह्याशिवाय इथे दर पौर्णिमेला हजारो यात्रिक अरुणाचलेश्वराला गिरीवलम (प्रदक्षिणा) घालतात. 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.