Monday, December 19, 2011

Saintliness of the Saints


There are many good things that Saints do that shows their Sainthood. Being equal to God they are ever engaged in welfare of others. To that end they behave like mother for the devotees that completely surrender to them. They foster their devotees like a child. Their primary goal is to make their devotees happy. Like a mother who speaks soft to her children, however at times to bring her children on the right path she also does not stop from chiding them. So do the Saints. Not only that, to bring devotee out of calamity Saints suffer themselves. When devotee completely surrenders to them, they treat their devotee’s difficulty as their own.

There was a couple Mr. and Mrs. Khaparde from Amaravati who were completely surrendered to Saibaba. Frequently, they used to visit Shirdi for offering their services to Baba. During one of the visits when Mrs. Khaparde and young son of Khapardes were staying in Shirdi, son caught a high fever which culminated into bubonic plague. The mother was terrified and was thinking of going back to Amaravati for treatment. Out of the habit of taking permission of Baba to leave Shirdi she went to meet Baba when he was out for evening rounds. In a trembling tone she explained about her son’s condition. Baba speaking softly assured her not to worry and consider the difficulty as a passing cloud and that her son will soon get out of fever. Then he lifted his Kafni up to his waist and showed her four big bubos developed on his waist. He said that his devotee’s difficulties are His and so he suffers for his devotees.

Such is a saintliness of Saints. To bring their devotee on the right path and to develop faith in them they even suffer for their devotees.

Baba chose Shri Govind Raghunath Dabholkar alias “Hemadpant” as His instrument to write His such stories so that devotees who couldn’t get direct darshan of Baba can get closer to direct experience by reading His stories.

Thursday, December 15, 2011

Resolution that can transform the life




They say that Sant sang i.e. association with Saints is the most beneficial association that helps to purify all sins of this and previous birth and sets one on the path of happy and joyful life devoid of fear, worries, sorrow.

Jaggery and its sweetness can never be separated. In the same way God and Saints are one. They can never be separated.

However usually Saints are few and so it’s not easy to find them. They say that even to recognize and get associated with a Saint one needs to have savings of merit (punya). Saints are full of love. So it may not be possible to recognize or understand a Saint by applying a logic that is used in worldly affairs. Logic and love do not go hand in hand. Love knows no logic. Mother, out of her love, overlooks the faults of her children. It’s very difficult for a mother to digest criticism on her child. She is ever ready to forgive all mistakes of her child. Saints are like mother. However to become their child is not that easy. To become a child of a Saint one has to accept a Saint as mother. Then only one can experience their motherly love.

The land of Maharashtra is called Santbhumi (land of saints) because this is a land that numerous saints chose to be their Karmabhumi (the land of major time of activity). The lineage of Saints starts from Saint Dnyaneshwar followed by Saint Namdev, Saint Janabai, Saint Eknath, Shri Nrusimha Saraswati, Saint Tukaram, Saint Samartha Ramdas, Saint Akkalkot Swami Maharaj, Saint Manik Prabhu, Saint Bahinabai, Saint Gajanan Maharaj, Saint Saibaba, Saint Gondavalekar Maharaj to name a few. All these saints lived their life for welfare of others. They lived simple life but their principles were lofty yet easy to follow.

These saints left their legacy through their stories. In fact these stories are nothing but literal incarnations of those saints. Reading these stories is the best way to establish a close relation with them. Through these stories one gets to know how these Saints lived their life, how their devotees got benefited through their association.
Saints assure that one who reads their stories regularly will eventually find all his/her desires fulfilled. What’s needed is Shraddha (faith in what Saints say) and Saburi (patience).

Here are names of some of popular Saints, the place where they stayed for most of their life and the title of their divine story book.



Name of Saint
Place
Prominent Divine story book
Shri Samarth Sadguru Sainath Maharaj
Shirdi, Maharashtra
Shri Sai Satcharit
Shri Gajanan Maharaj
Shegaon, Maharashtra
Shri Gajanan Vijay (the book that contains above shlokas)
Shripad ShriVallabh
Pithikapur, Andhra Pradesh
Shripad Shri Vallabh Charitamrut
Shri Nrusimh Saraswati
Gangapur, Karnataka
Shri Gurucharitra written by Saraswati Gangadhar
Shri Saptashati Gurucharitra Saar, summary of Gurucharitra written by Shri Vasudevanand Saraswati (Tembe Swami)


Sunday, November 27, 2011

God’s well known attribute

उपासकां वरदायक होसीं, ऐसी तव कीर्ती |
                                                       - आरती काळभैरवाची

They say that to become eligible for God's grace and blessings one should do what God likes. It is not possible that one does whatever one likes and still expect God to shower His blessings. This does not work even in human relationships. Is it not? Even if father loves his son and daughter he cannot be happy if they do not do anything what father wants them to do. Father expects son and daughter to follow some discipline not for father's sake but for their own development. The same is true with relationship between God and human being.

They say that God likes the discipline. But not any discipline. He likes the actions that are performed with love, with a noble motive. That action does not need to be extravagant. More than external display the internal motive is what is important. 

Numerous stories have been told through Pothis and Puranas about God's well known attribute (कीर्ती) of blessing Upasakas (disciplined persons) who perform Upasana, a disciplined routine for purifying self so that one can become qualified to participate in God's own work. Like working for best employer offers one a job security, the same is true when one participates in God's work. The Upasana itself is not difficult to start with. One can choose upasana that suits to one's own routine. The best upasana is the one that is prescribed by one's own Guru. However if one does not have Guru there are some popular disciplines to choose from, for example

  1. Lighting a lamp and incense stick in front of God's idol or photo
  2. Offering a garland of flowers or just a flower to God's idol or photo
  3. Offering naivedya to God
  4. Chanting or listening a stotra (hymn) 
  5. Singing or listening a prayer / arti  in front of God
  6. Chanting the name of God
  7. Saluting one's own parents
  8. Remembering and prostrating before one's own Kula Devata (Goddess of one’s own lineage)
  9. Reading a line, a page or a chapter from religious scripture
  10. Performing Surya namaskar in front of God
They say one should decide a time of day to perform these actions and then try to stick to that time. These actions do not take much time. But the benefits, tangible and intangible, that one incurs by performing one or all of these actions consistently are huge.

Tuesday, November 8, 2011

Shri Kakaji (Maganmal Jethanand Wawa) - an article by Dr. M.V.P. Kumar

This is the great occasion of Baba's temple inauguration and Kumbhabhishekam when this souvenir is being brought out. I wish to write few words about our beloved guru Shri Kakaji of Panvel. Shri Kakaji dedicated his entire life to the cause of humanity and he was a great unassuming personality.

Shri Kakaji is my guru who initiated me into the path of spirituality and human service. It is befitting to write a few words with my limited ability. All the same I have tried to put his glory.

I have never come accross a similar person who had sacrificed the entire life to the service to humanity without any expectation in return.

I met Shri Kakaji somewhere in 1960 and till his passing away in the year 1978 (02.05.1978), I was in association with him. But even now he lives in our hearts and has guided throughout my life at every stage like father and mother.

Rightly this is the befitting time for me to reveal something about my guru who had shown path of service to humanity leading to Godhood (Manavseva is Madhavseva).

He used to spend his entire day with people sitting in a small room, solving their problems.
His entire family along with his parents, came from Sind as refugees and settled at Chembur Camp after partition. From there they came and settled down to Panvel.

Since then till he breathed his last, Panvel remained his residence and workplace. I have humbly followed in my life his teaching of leading simple life and be of use to humanity at large.

It will not be out of place to mention that Shri M.V.Raghupathi, my younger brother, has also been the disciple of venerable Guru Shri Kakaji. To be precise, Kakaji gave "Diksha" to Raghupathi in 1968 and bestowed his blessings on him. It is on his order (aadesh) that my brother entered teaching profession in 1978 and remained active in that profession till 2005. He had however, started his pursuit at Dapoli since 1996-97. Again on Kakaji's order only he has been devoting his entire time since 2005 to activities in Dapoli. My brother has put in practice the preaching of Param Pujya Shri Kakaji.

Dr. M.V.P. Kumar

Wednesday, October 26, 2011

दिपावली

("आपले सण - एक सुलभ संकल्पना" - वेदमूर्ती विनायक वासुदेव भातखंडे व विलास मोरेश्वर कर्णिक, एम. ए, ह्यांच्या पुस्तकातून) 

दिपावली अर्थात दिपोत्सव ह्या भारतभर अत्यंत उत्साहाने साजरा होणाऱ्या सणाचे प्रामुख्याने सहा भाग पडतात.

१) वसुबारस (अश्विन वद्य द्वादशी)
२) धनत्रयोदशी (अश्विन वद्य त्रयोदशी)
३) नरक चतुर्दशी (अश्विन वद्य चतुर्दशी)
४) लक्ष्मीपूजन (अश्विन वद्य अमावास्या)
५) बलिप्रतिपदा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा)
६) भाऊबीज (कार्तिक शुद्ध द्वितीया)

वरील प्रत्येक दिवसाचे महत्व, तिथीवार खाली विशद केले आहे.


१) वसुबारस

दिपोत्सवाचा हा प्रथम दिवस. हा दिवस गुरुद्वादशी तसेच गोवत्स द्वादशी असा सुद्धा ओळखला जातो. ह्या दिवसापासून आरंभ झालेला दिपोत्सव त्रिपुरी पौर्णिमे पर्यंत आकाश कंदिल लावून साजरा करतात. (हल्ली मात्र अपुऱ्या माहितीमुळे बहुतेक जन दिवा, पणती तसेच आकाश कंदिल धन त्रयोदशी अथवा नरक चतुर्दशी पासून भाऊबीजेपर्यंत लावतात.)

वसुबारस ह्या दिवसाला गुरुद्वादशी म्हटले जाते. याचे कारण म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांच्या निजगमनाचा हा दिवस. त्यांच्या स्मरणार्थ भक्त दिपोत्सव साजरा करतात. ह्याच दिवशी धेनु व तिचे वासरू यांचे पूजन स्त्रिया करतात. ह्या मागे सुद्धा असणारी भूमिका अशी आहे की, पोळ्याला पुरुष बैलाचे पूजन करतात. तसेच पुत्र-पौत्र, धनधान्य, सुबत्ता, आनंद व शांती ह्यासाठी स्त्रिया सवत्स देनुची पूजा करतात. धेनु व तिच्या बछड्याला उकडीचे वाडे, उडदाचे वाडे, भात, गोडधोड पदार्थ, आंबवण खाऊ घालतात. काही ठिकाणी गाईला ओवाळून तिची आरती सुद्धा केली जाते. ह्याच दिवशी एकभुक्त राहणाऱ्या स्त्रिया गाईचे दुध, दही, तूप इत्यादी खात नाहीत.

२) धनत्रयोदशी

सर्व देवांनी केलेल्या समुद्र मंथनातून धनत्रयोदशीला जी चौदा रत्ने बाहेर आली त्यातील एक रत्न धन्वंतरी हे होय. धन्वंतरी हा विष्णूचा अवतार असून ही आरोग्य देवता आहे. अर्थातच धनत्रयोदशी ही वैद्यक व्यवसायात असणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्वाची आहे. ह्याच दिवशी स्त्रिया सुद्धा अभ्यंगस्नान करतात. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लोकांखेरीज व्यापारी लोकसुद्धा तितक्याच भावभक्तीने लक्ष्मीची पूजा करतात. घरोघरी सुद्धा सायंकाळी लक्ष्मीची पूजा करण्याची पद्धत आहे. ह्या दिवशी जरी पूजा लक्ष्मीची होत असते तरी मुख्य उद्देश श्री विष्णूंचा म्हणजेच धन्वंतरीचा वास आरोग्यासाठी घरात असावा, हा असतो. धणे-गुळाचा नैवेद्य देवाला दाखवितात.

३) नरकचतुर्दशी

सर्वसामान्यांची दिवाळी ह्या दिवसापासून धुमधडाक्यात चालू होते. वास्तविक पहाता, दिवाळीचे सहाही दिवस अभ्यंगस्नान आवश्यक असते; पण वेळे अभावी पहिले दोन दिवस अभ्यंगस्नानाची प्रथा बंद पडली आहे.

नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध करून परतलेल्या श्रीकृष्णाने नरकासुराला दिलेल्या वराप्रमाणे सर्वांनी मंगलस्नान करून दिपोत्सव साजरा करावा. त्या दिवशी जरी आबालवृद्ध स्त्री-पुरुषांनी अभ्यंगस्नान करावयाचे असले, तरी स्त्रियांनी पुरुषांच्या अंगाला तेल लावून स्नान घालण्याची रूढी पडली आहे. स्नान करतानाच चिराटे फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध केला जातो. त्याच्या वधाच्या आनंदाप्रीत्यर्थ फटाके वाजविले जातात. पुरुषांना औक्षण करून मग फराळ केला जातो. 

अभ्यंगस्नानाविषयी विशेष महत्व तिळाच्या तेलाचे आहे. तिळाचे तेल हे लक्ष्मीचे द्योतक आहे तर पाणी गंगेचे द्योतक आहे. ह्या दोघांचे मिश्रण म्हणजे अभ्यंगस्नान होय. जल आरोग्यदायी, जीवनदायी आहे, तर तेल लक्ष्मी स्वरूप आहे. लक्ष्मी चंचल राहू नये म्हणजेच स्थिर रहावी, यासाठी दिपावलीचे सर्व दिवस अभ्यंगस्नान केल्यास संपूर्ण संवत्सर आरोग्य व संपत्तीचा लाभ होतो.

४) लक्ष्मीकुबेरपूजन

अलक्ष्मी नाशासाठी (म्हणजेच अवदसेचे पारिपत्य करण्यासाठी) तसेच अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी ह्या अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करतात. अखंड लक्ष्मीप्राप्ती म्हणजे अष्ट लक्ष्मींची प्राप्ती. त्या अष्ट लक्ष्मी म्हणजे धनलक्ष्मी, लाभलक्ष्मी, किर्तीलक्ष्मी, रौप्यलक्ष्मी, सुवर्णलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी, गृहलक्ष्मी होय. हे पूजन प्रदोषकाळी (सूर्यास्तानंतर) होते कारण लक्ष्मीचा प्रवेश तिन्हीसांजेला होतो. सूर्यास्तानंतर, स्थिर लग्नावर, पूजा करण्याची पद्धत असल्यामुळे कधी-कधी पूजेचा मुहूर्त रात्री ८-९ नंतर सुद्धा येतो. लक्ष्मीपूजनात कुबेर पूजन सुद्धा असते, कारण कुबेर हा संपत्तीचा देव असून लक्ष्मीने दिलेल्या वरामुळे त्याची संपत्ती अक्षय्य आहे.

लक्ष्मीपूजनाला धान्य, रूपे, सुवर्ण ह्यांची पूजा अपेक्षित आहे, परंतु घरोघरी हल्ली सोने, दागदागिने व वहीपूजन करून साळीच्या लाह्यांचा नैवेद्य दाखवितात. ह्याच वेळी नवीन केरसुणीची सुद्धा पूजा करतात. लक्ष्मीचे स्वागत फटाक्यांच्या आवाजाने (आतषबाजीने) करतात. रात्री बारानंतर नव्या केरसुणीने घरातील कचरा झाडून तो वेशीबाहेर ठेवावा. ह्याचा प्रतीकात्मक अर्थ अवदसेला घरातून बाहेर काढण्याचा आहे. पारंपारिक रित्या हा केर जुन्या सुपात भरून, जुन्या केरसुणीसकट, सूप वाजवून टाकला जात असे. सूप वाजविण्याचा अर्थ अलक्ष्मीला निरोप देणे असा आहे. एखाद्या गोष्टीचे 'सूप वाजले' ह्या शब्दप्रयोगाची उत्पत्ती ह्यात आहे.

५) बलीप्रतिपदा

बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असे महाराष्ट्रात, उर्वरित पश्चिम भारतात व दक्षिण भारतातील काही भागात मानले जाते. उत्तरेत मात्र बलिप्रतिपदा हा अर्धाच मुहूर्त समजला जातो. जरी हा दिवस मुहूर्ताचा असला, तरी विवाह व मुंज या कार्यासाठी हा मुहूर्त योग्य असेलच, असे नाही.

बलिप्रतिपदा साजरी करण्यामागे एक कथा आहे. श्री विष्णूंचा चौथा अवतार म्हणजे वामन अवतार. हा अवतार उन्मत्त झालेल्या बळीराजाला वठणीवर आणण्यासाठीच झाला होता. त्या काळच्या प्रथेप्रमाणे राजे-रजवाडे भिक्षुकांना, विशेषत: बटूंना विन्मुख पाठवत नसत. बळीराजा जरी क्रूर दानव असला, तरी दानशूर म्हणून प्रसिद्ध होताच. म्हणून श्री विष्णूंनी बटूचे रूप घेऊन तीन पावले भूमी बळीकडे दान मागितली. बळीराजाने त्याला रुकार देताच पहिल्या पावलाने बटूने स्वर्ग व्यापला, दुसऱ्या पावलाने पृथ्वी व्यापल्यावर  तिसरे पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेऊन त्याला पाताळात पाठविले. परंतु बळीराजा हा विष्णूंचा भक्त असल्याने त्याने विष्णूंकडे वर मागितला की, ह्या दिवशी जे माझी पूजा करतील, त्यांना आपल्या चरणांशी स्थान द्यावे. श्री विष्णूंनी हे मान्य केल्यामुळे बलिप्रतिपदा साजरी करण्याची प्रथा पडली. शहरांमध्ये बलीची पूजा करणे हे अभावांनेच आढळते. पण खेडेगावांमध्ये मात्र शेणाच्या बाहुल्या करून बळीचे पूजन संकल्प करून केले जाते. शहरांमधील लोकांना पूजा करणे शक्य नसल्यास खालील प्रार्थना करावी.

बलीराज नमस्तुभ्यं विरोचन सुत प्रभो |
दानवेन्द्र सुराराते पुजामे प्रतीगृह्यताम  ||


बलीची पूजा ही पुरुषांनी करावयाची असते. बलिप्रतिपदेला सायंकाळी पत्नी पतीला औक्षण करून आपल्या पतीचे आयुष्य वाढावे, म्हणून प्रार्थना करते. औक्षण करताना पत्नीने ज्याप्रमाणे सावित्रीने सत्यवानाचे आयुष्य यमाकडून वाढवून घेतले, तसेच आपल्या पतीचे आयुष्य वृद्धिंगत व्हावे, अशी यमाला प्रार्थना करावी.

बलिप्रतिपदेला द्यूत खेळण्याची जी परंपरा आहे, त्याविषयी आदित्य पुराणात स्पष्टीकरण आहे. ह्या दिवशी शंकर-पार्वती द्यूत खेळले व त्यामध्ये पार्वतीने शंकराचा सतत पराजय केला. पार्वतीच्या खेळावर प्रसन्न होऊन शंकराने पार्वतीला 'शक्तिशाली होशील' असा वर दिला. ह्या दिवशी द्युतामध्ये जे घडते, तेच वर्षभर घडत रहाते अशी समजूत आहे.

६) भाऊबीज

धर्मशास्त्राप्रमाणे दिपावली वसुबारसेपासून ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत असली तरी सुद्धा लौकिक अर्थाने भाऊबीज हा दिवाळीचा अखेरचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

ज्याप्रमाणे रक्षाबंधनास बहिण भावाकडे जाते, त्याचप्रमाणे भाऊबीजेला भाऊ बहिणीकडे जातो. भाऊबीज हा दिवस यम द्वितीयाअसा सुद्धा ओळखला जातो. कारण ह्याच दिवशी यम यमीकडे जातो व यमी त्याला स्नान घालून मिष्टान्नांचे भोजन देऊन ओवाळते.
"औक्षण करणे" ह्या कृतीमागे दोन उद्देश आहेत. एक म्हणजे भावाने बहिणीचे संरक्षण करावे व दुसरा उद्देश बहिण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत व्हावे, असा आहे. भाऊबीजेला यम यमीकडे गेला असल्याने त्याचा दरबार भरत नाही; त्यामुळे ह्या दिवशी मृत्यू पावणाऱ्या कोणत्याही जीवास यमराज नसल्याने स्वर्गप्राप्ती होते असे गरुड पुराणात उल्लेखलेले आहे.

Wednesday, October 5, 2011

दसरा (विजयादशमी)

("आपले सण - एक सुलभ संकल्पना" - वेदमूर्ती विनायक वासुदेव भातखंडे व विलास मोरेश्वर कर्णिक, एम. ए, ह्यांच्या पुस्तकातून)

वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा होय. अश्विन शुद्ध दशमीला येणारा दसरा हा इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे साधारणतः ऑक्टोबर मध्ये येतो.

जरी हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक असून बहुतेक शुभकार्यासाठी योग्य असला तरी विवाहासाठी तसेच मुंजीसाठी हा मुहूर्त चालत नाही. आषाढी एकादशीपासून तुलसीविवाह पर्यंतचा काळ विवाहास अयोग्य समजला जातो. तसेच व्रतबंधन उत्तरायणातच करावयाचे असते. ही दोन कार्ये सोडता इतर कोणत्याही शुभकार्यासाठी दसरा हा शुभ मुहूर्त आहे. 

विजयादशमी साजरी करण्याची कारणे व ती साजरी करण्याच्या प्रथा निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आढळतात. महाराष्ट्रामध्ये नवरात्रात बसलेली देवी दशमीला उत्थापन करून सीमोल्लंघन करते, त्याच्याप्रीत्यर्थ दसरा साजरा केला जातो. तसेच ह्या दिवशी क्षत्रिय लढाईसाठी निघण्यापूर्वी अपराजिता ह्या देवीची तसेच शमीवृक्षाची आणि अश्मंतक (आपटावृक्ष) ह्या वृक्षाची पूजा करीत असत. ह्या दिवशी आपट्याच्या पानांच्या रूपाने सोने लुटण्याची प्रथा पडली. शमीची पाने दुर्मिळ असून काटेरी असतात तर आपट्यांची पाने सहजगत्या उपलब्ध असल्यामुळे प्रतिकात्मक सोने म्हणून आपट्याची पाने वाटण्याची प्रथा पडली आहे.

सीमोल्लंघन कारणे ह्या प्रथेला सध्याच्या युगात काहीही अर्थ उरलेला नाही, परंतु आपट्यांची पाने वाटून सर्वांना शुभेच्छा देणे हे मात्र अजूनही कटाक्षाने लोक करतात. शस्त्रपूजन कारणे ह्या परंपरेला सुद्धा पूर्वीच्या काळा इतका अर्थ आता राहिला नसला तरी सरस्वतीपूजन, ग्रंथपूजन, नाममात्र शस्त्रपूजन व यंत्रपूजन, वाहनपूजन अवश्य करावे. 

ह्या संदर्भात सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आपट्याची उरलेली पाने दुसऱ्या दिवशी कचऱ्यामध्ये न टाकता त्यांचे यथासांग विसर्जन करावे अथवा आपटा व शमीची पाने वाळवून त्यांचा धूर करावा. त्यायोगे अनिष्ट शक्तींचा नाश होऊन भरभराट होते. एखादे आपट्याचे पान सोन्याचा संग्रह करतो त्याजागी ठेवल्यास सुवर्ण वृद्धिंगत होण्यास मदत होते. 

उत्तर भारतामध्ये हा सण रामाने केलेल्या रावणाच्या पराभवासाठी साजरा केला जातो. त्या निमित्ताने रामलीला वगैरे कार्यक्रम संपूर्ण नवरात्रात करून, विजयादशमीला रावणाची प्रतिमा सार्वजनिकरीत्या दहन केली जाते. 

अयोध्येमध्ये रामाने मिळविलेल्या रावणावरील विजय साजरा करण्यासाठी घरोघरी तोरणे लावली होती. 'दशहरा' म्हणजे दहा शिरे असलेल्या रावणाचे निर्दालन करून, देवांसकट सर्वांना भयमुक्त केल्याबद्दल देवांनीसुद्धा श्रीरामांवर पुष्पवृष्टी केली होती. म्हणूनच आज सुद्धा घरादारांना पुष्पमालेची तोरणे लावण्याची प्रथा पडली आहे.

Thursday, September 29, 2011

शारदीय नवरात्रोत्सव



("आपले सण - एक सुलभ संकल्पना" - वेदमूर्ती विनायक वासुदेव भातखंडे व विलास मोरेश्वर कर्णिकएम. एह्यांच्या पुस्तकातून)

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवाची पूर्वपीठीका प्रथम जाणून घेऊ. 


देवीची साडेतीन पीठे (गाद्या) आहेत. त्यांचा क्रमच लावावयाचा झाल्याससर्व प्रथम येते ती कोल्हापूरची अंबाबाई अर्थातच श्री महालक्ष्मी. ही देवी सात्विकतेचे द्योतक आहे व कोल्हापूरचे पीठ हे पूर्णपीठ मानले जाते. त्यानंतर राजसपणाचे प्रतिक म्हणजेच तुळजापूरची भवानी. हे दुसरे पूर्ण पीठ होय. माहुरची महामाया रेणुका ही परशुरामाची माता तसेच जमदग्नींची पत्नी असून तिचे स्थान हे तिसरे पूर्ण पीठ आहे. नाशिकची (वणीची) सप्तश्रुंगी जगदंबा अथवा अंबाजोगाईची योगेश्वरी ह्यांना अर्धपीठ समजले जाते. कुलाचाराप्रमाणे ह्या दोन्ही देविंपैकी एका देवीला अर्धपीठ मानणारे लोक आहेत. देशामध्ये इतर ठिकाणी असलेल्या देवी ह्या साडे तीन पिठाच्या देवीचीच रूपे आहेत. नवरात्रामध्ये पूजन केल्या जाणाऱ्या देविंमध्ये त्यामुळेच भिन्नभिन्नता आढळते.


देवी बसते म्हणजे काय?


शुंभ-निशुंभमधु-कैटभचंड-मुंडमहिषासुर आदि असुरांचा संहार करण्यास देवीला घनघोर युद्ध करावे लागले. निरनिराळ्या शक्तींचा प्रयोग केल्यावरच ह्या भयानक राक्षसांचा पाडाव होऊ शकला. त्यामुळे श्री विष्णू आदि देवांना देवीस विश्रांती देणे जरुरीचे आहे असे प्रकर्षाने वाटू लागले. नवखंडांतील शत्रूंचा नाश केल्यावर आलेला शीण घालवण्यासाठी प्रत्येक खंडासाठी एक रात्र अशा एकूण नऊ रात्री देवीनी विश्रांती घ्यावी ह्या हेतूने श्री विष्णुंनी देवीला स्थानापन्न व्हावे असे सांगितले. अशा प्रकारे स्थानापन्न झालेल्या देवीला 'देवी बसलीअसे म्हणतात. संपूर्ण नवरात्रीच्या काळात देवीला स्थानभ्रष्ट करू नयेम्हणजेच तिच्या विश्रांतीला धक्का लावू नयेअसा संकेत आहे.


देवी बसविण्याच्या भिन्न-भिन्न पद्धती 


नवरात्र हा जसा सण आहे तसेच ते व्रतसुद्धा आहे. कुलाचाराप्रमाणेजाती-जमाती प्रमाणेप्रदेशाप्रमाणे वगैरे विभिन्न पद्धती यासंबंधी आचरणात आणल्या जातात. जातीनिहाय उहापोह करणे शक्य नाही पण काही ज्ञाती अवलंबित असलेल्या प्रथा येथे उद्धृत केल्या आहेत.


नवरात्र याचा शब्दश: अर्थ नऊ रात्री असा आहे. म्हणजेच देवी नऊ रात्री बसलेल्या (विश्राम घेत असलेल्या) असावयास हव्यात. हा अर्थ धरल्यास अश्विन शुद्ध प्रतिपदेला बसलेली देवी ही दसऱ्याच्या दिवशीच उठवली गेली पाहिजेपरंतु कुलाचाराप्रमाणे काही ज्ञातीत नवमीची पूजा झाल्यावर देवीला उठविले जाते. त्याचप्रमाणे काही कुटुंबामध्ये फक्त कुलस्वामिनीची स्थापना करून तिला नऊ दिवस झेंडूच्या फुलाच्या माळा बांधल्या जातात. त्यांच्याकडे घटस्थापना आणि धान्याचे रोह लावण्याची प्रथा नसते. तसेच कुमारिका व सुवासिनी पूजन सुद्धा फक्त देवी बसता-उठता केले जाते. अखंड दीपप्रज्वलन मात्र असतेच असते. अशा मर्यादित स्वरुपात नवरात्र उत्सव काहीजणांकडे केला जातो. 


ज्यांच्याकडे विस्तृत स्वरुपात नवरात्र साजरे केले जाते त्यांची सर्वसाधारण पद्धती अशी आहे की कुलस्वामिनीची स्थापना करून त्याचबरोबर घटस्थापना तसेच घटाभोवती माती पसरून त्यात सप्त धान्ये (सालासह भात, ज्वारीबाजरीगहूकांगजवसचणे) पेरली जातात. कुलस्वामिनीचा टाक तसेच श्रीफळ ठेवलेला घट ह्यांच्यावर झेंडूची फुलेतिळाची फुले अथवा नागवेलीची पाने ह्यांच्या माळा नवरात्रीचे सर्व दिवस बांधल्या जातात. माळाच काएखादे पुष्प का नाहीह्याला तसा शास्त्रीय आधार काही नाही. फक्त टाक लहान असून एक-एक फुल जरी नऊ दिवस वाहिले तरी टाकाचे दर्शन होणार नाही म्हणून माळा बांधण्याची पद्धत अस्तित्वात आली असावी. तसेच ज्या विभागात जी फुले मुबलक त्या फुलांच्या माळा करण्याची पद्धत आली असावी. अखंड दीपप्रज्वलन हे सुद्धा आलेच.


नवरात्रीच्या व्रतामध्ये कुमारी पूजनाचे महत्व विशेष आहे. यथासांग नवरात्र साजरे करणाऱ्या कुटुंबामध्ये नवरात्रीचे सर्व दिवस कुमारिका व सुवासिनींचे पूजन केले जाते. तसेच अष्टमीला नऊ सुवासिनींची ओटी भरून विशेष हळदी कुंकू करण्याची प्रथा आहे. नवरात्रीमध्ये आपण करणार असू त्याचा संकल्प गुरुजींकडून पूजा करताना सोडावा लागतो. नऊ दिवस कुमारिका पूजन केल्यास शास्त्राप्रमाणे पृथ्वीचे राज्य मिळतेतर फक्त देवी बसता-उठता कुमारिकेचे पूजन केल्यास भोग व मोक्षप्राप्ती होते.


श्री देवी महात्म्यात सांगितल्याप्रमाणे एक वर्षाच्या कन्येचे पूजन करू नये. कुमारिका दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतची असावी. दोन वर्षाच्या मुलीची कुमारिका म्हणून पूजा करावीतीन वर्षाच्या कन्येची त्रिमूर्ती म्हणूनचार वर्षाची कल्याणीपाच वर्षाची रोहिणीसहा वर्षाची कालीसात वर्षाची चंडिकाआठ वर्षाची शांभवीनऊ वर्षाची दुर्गा आणि दहा वर्षाची सुभद्रा म्हणून पूजा करावी. घरातील कर्त्या माणसांनी उपवास करावेत. नवरात्रीच्या नऊ दिवसात श्री देवी महात्म्याचे वाचन करावे. ते शक्य नसल्यासअष्टमीच्या दिवशी बारावा अध्याय वाचावा अथवा नवार्णव मंत्राचा १०८ वेळा होम करावा.काही ज्ञातीमध्ये कुलदेवतेबरोबरच कुलस्वामींना सुद्धा पुष्पमाला घालण्याची पद्धत आहे. 


काही ज्ञातीमध्ये सप्तमीला घरातील कर्ती स्त्री डाळ-तांदुळाचा जोगवा पाच घरी मागूनतो शिजवून त्याचाच नैवेद्य देवीला दाखवते. देवीला वरण-पुरणाचा नैवेद्य नित्यनेमाने दाखवून चालतोपरंतु शास्त्राप्रमाणे कुमारिकेला दररोज नूतन वस्त्र देऊन तिचा सन्मान करावा व नैवेद्याच्या जेवणात खाली दिल्याप्रमाणे पदार्थ ठेवावेत. शक्य झाल्यास उत्तम फलप्राप्तीसाठी खाली दिलेले दिवस व त्याखाली दिलेल्या वारांची सांगड घालून नैवेद्य तयार करावा. 


नवरात्रीतील दिवस क्रमांक
नैवेद्यातील पदार्थ
अपेक्षित फलप्राप्ती
१ ला
तूप
निरोगीपणा
२ रा
साखर
दीर्घायुष्य
३ रा
दुध
दु:खनाश
४ था
अनारसे
विघ्ननाश
५ वा
केळी
बुद्धीवृद्धी
६ वा
मध
तेजवृद्धी
७ वा
गुळ
शोकनाश
८ वा
नारळाचे पाणी
तापनाश
९ वा
लाह्या
इहलोक सुख


वारांप्रमाणे नैवेद्यातील पदार्थ व त्यामुळे होणारी फलप्राप्ती खालीलप्रमाणे आहे.



वार
पदार्थ
फलप्राप्ती
रविवार
पायस (खीर)
सुखसमृद्धी
सोमवार
गाईचे दुध
प्रगल्भता
मंगळवार
केळी
सुबुद्धी
बुधवार
लोणी
स्वर्गलोक
गुरुवार
खडीसाखर
सुखप्राप्ती
शुक्रवार
सीताफळ
(शीतलता देणारे फळ)
दु:खनाश
शनिवार
हरभऱ्याचा पदार्थ
नेत्रदोष नष्ट 


नवरात्रीचा २ रा दिवस बुधवारी आल्यास दुसरा दिवस म्हणून साखर व बुधवार म्हणून लोणी घ्यावे. ज्या लोकांची देवी शत्रूंचे निर्दालन करून राज्य उपभोगणारी आहेअशा देवींना अष्टमीला बळी लागतो. तसेच अष्टमीलाच घागर फुंकण्याची सुद्धा प्रथा आहे. ह्याच दिवशी काही ज्ञातींमध्ये लग्नापासून पाच वर्षे नवविवाहिता पुत्रप्राप्ती व ऐश्वर्यासाठी खड्यांच्या महालक्ष्मीची सुद्धा पूजा करतात. 

हल्ली जर चार भाऊ वेगवेगळे राहत असतील तर एकाकडेच नवरात्र करतातपरंतु हे अयोग्य असून चारही भावांकडे स्वतंत्र नवरात्र होणे आवश्यक आहे. सार्वजनिक नवरात्र हा प्रकार तर सर्वथा अयोग्य आहे. गुजरात मध्ये असलेल्या ह्या प्रथेचा तेथून महाराष्ट्रात आलेल्या समाजाने चालू केलेल्या ह्या उत्सवास समाज विघातक असे वळण मिळालेले आपणाला दिसेल. ओळीने नऊ रात्री अती कर्कश वाद्यांच्या साथीने गरबा खेळून शांतता भंग करणेकितपत योग्य आहेयाचा संबंधीतांनी विचार करावा. 


पुरवणी 


नवरात्रीत आपण ज्या दुर्गेची आपण पूजा करतो तिची नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी निरनिराळी रूपे असतात. अर्थातच देवीचे पूजन करताना तिची खालील नामरूपे लक्षात ठेवावीत. 


प्रथमेस - शैलपुत्री 
द्वितीयेस - ब्रह्मचारिणी 
तृतीयेस - चंद्रघंटा 
चतुर्थेस - कुष्माण्डा
पंचमीस - स्कंदमाता 
षष्ठीस - कात्यायनी 
सप्तमीस - काळरात्री
अष्टमीस - महागौरी 
नवमीस - सिद्धदात्री 



नवरात्रीतील पंचमीस 'ललिता पंचमीम्हणतात व काही कुटुंबात तेव्हा उपांगललिता हे व्रत केले जाते. हे व्रत पुत्रपौत्र प्राप्तीधनधान्यसमृद्धीकौटुंबिक स्वास्थ्य ह्यासाठी कुटुंबप्रमुखाने करावयाचे आहे. ह्या व्रतासाठी पूर्ण रात्रभर असलेली पंचमी घ्यावी. ह्या व्रतात ललीतादेविला ४८ दुर्वांची एक जुडी ह्याप्रमाणे ४८ जुड्या वहाव्यात. ह्यासाठी पंचमीला ललीतागौरीची स्थापना व दुसरे दिवशी विसर्जन करावे लागते. 


नवरात्रीमध्येच येणाऱ्या सप्तमीस 'सरस्वतीशयन सप्तमीअसे म्हणतात. श्रीदेवी महात्म्यामध्ये सांगितल्या प्रमाणे सप्तमीपासून दशमी पर्यंत पठण-पाठणलेखन ह्या गोष्टी ह्या काळात बंद ठेवाव्यात कारण सरस्वतीने शयन केलेले असते. ह्या संदर्भात हे लक्षात घ्यावे की गुरुकुलात शिकत असलेल्या शिष्यांसाठी हा उपदेश आहे. नित्यनेमाने करावयाच्या वाचन-लेखनाला हरकत नाही.


नवरात्री व्रत हे वास्तविक पहाता नऊ रात्रींचे व्रत आहे पण सध्याच्या वेगवान जगात ९ दिवस यथासांग पूजन करण्यास वेळ मिळणे सुद्धा नव्या पिढीला कठीण आहे. अशा परिस्थितीतशास्त्रानेच सर्व पूजा वगैरे विधी नवमीला करण्याची सोय ठेवली आहे. त्याला 'एकदिवसीय नवरात्रअसे म्हणतात. ह्या एका दिवसातच नऊ दिवस होणारे सर्व कुलाचार पार पाडावे लागतात.