Sunday, March 15, 2026

थिरुअन्नीयुर येथील श्री अग्नीपुरीश्वरर मंदिर

हे मंदिर मयीलादुथुराई-थिरुवारुर मार्गावर मयीलादुथुराईपासून २८ किलोमीटर्सवर वर, पेरलम पासून १८ किलोमीटर्सवर, थिरुपांपुरं पासून १२ किलोमीटर्सवर, थिरुवारुर पासून ३५ किलोमीटर्सवर आणि कुंभकोणमपासून २५ किलोमीटर्स वर आहे. ह्या पाडळ पेथ्र स्थळाची स्तुती शैव संत अप्पर ह्यांनी त्यांच्या पवित्र स्तोत्रांमधे गायली आहे. हे स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आणि अरिसीलारू ह्या कावेरी नदीच्या उपनदीच्या उत्तर काठावर आहे. 

मूळ मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. कालांतराने चोळा राजांनी ह्या मंदिराला दगडी बांधकामामध्ये रूपांतरित केले. ह्या मंदिराचा सांभाळ विजयनगर आणि मराठा राजे तसेच नागरथारांनी केला.

मूलवर: श्री अग्निपुरीश्वरर, श्री अग्नीश्वरर
देवी: श्री गौरी, श्री पार्वती
पवित्र तीर्थ: अग्नी तीर्थ
पवित्र वृक्ष: शमी वृक्ष
पुराणिक नाव: थिरुअन्नीयुर, थिरुवन्नीयुर
वर्तमान नाव: अन्नीयुर

क्षेत्र पुराण:

१.  प्रजापती दक्ष राजाने यज्ञ आयोजित केला होता. ह्या यज्ञामध्ये त्याने सर्व देवांना आमंत्रित केले पण त्यातून आपली पुत्री आणि जावई म्हणजेच श्री पार्वती देवी आणि भगवान शिव ह्यांना वगळले. पार्वती देवींना ह्या यज्ञात सहभागी होण्याची इच्छा होती. भगवान शिवांनी त्यांना यज्ञाला न जाण्याचा सल्ला दिला. पण पार्वती देवींनी त्याकडे दुर्लक्ष करून त्या यज्ञात सहभागी होण्यासाठी गेल्या. यज्ञस्थळी त्यांच्या पितांनी म्हणजेच दक्ष राजाने पार्वती देवी आणि भगवान शिवांचा अपमान केला. हा अपमान सहन न होऊन पार्वती देवींनीं यज्ञकुंडामध्ये उडी मारून आत्मदहन केलं. भगवान शिवांना हे ज्ञात झाल्यावर त्यांना प्रचंड क्रोध आला आणि त्यांनी वीरभद्र आणि भद्रकाली ह्यांना यज्ञाचा विध्वंस करण्याची आज्ञा केली. वीरभद्र आणि भद्रकालींनी यज्ञाचा विध्वंस केला आणि त्याचबरोबर यज्ञात सहभागी झालेल्या देवांना पण शिक्षा दिली. अग्नीदेव ह्या यज्ञामध्ये सहभागी झाले होते म्हणून त्यांना शिक्षा म्हणून भगवान शिवांनी त्यांनी शाप दिला कि त्यांची सर्व शक्ती लोप पावेल आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही यज्ञामध्ये सहभागी होता येणार नाही. अग्निदेवांनी आपली शक्ती गमावल्यामुळे पृथ्वीवर यज्ञ संपन्न होणे थांबले आणि ह्याचा परिमाण म्हणून पृथ्वीवर दुष्काळ पडला आणि सर्व जीव कष्टी झाले. आपल्या चुकीचा परिहार करण्यासाठी म्हणून अग्निदेव ह्या स्थळी आले. त्यांनी एक तीर्थ निर्माण केलं, एक शिवलिंग निर्माण केलं आणि ह्या लिंगाची त्यांनी शमीच्या पत्रांनी पूजा केली. भगवान शिवांच्या कृपेने त्यांची शापातून मुक्ती झाली. म्हणून ह्या स्थळाला अन्नीयुर असे नाव प्राप्त झाले. कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन ते वन्नीयुर असे झाले. (तामिळ मध्ये वन्नी म्हणजे शमी). आणि भगवान शिवांना अग्नीपुरीश्वरर असे नाव प्राप्त झाले. अग्निदेवांनी निर्माण केलेल्या तीर्थाचे नाव अग्नी तीर्थ झाले.

२. भगवान शिवांशी विवाह करण्यासाठी श्री पार्वती देवींनी कात्य ऋषींची कन्या म्हणून जन्म घेतला. त्यांनी ह्या ठिकाणी तपश्चर्या केली आणि तपश्चर्येच्या अंती भगवान शिव त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी कृपावर्षाव केला. पुढे थिरुविळीमिळलै इथे दोघांनी विवाह केला.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

श्री ब्रह्म, श्री अग्नी, अगस्त्य ऋषी, सनत कुमार, सनातन ऋषी आणि श्री पार्वती देवी

वैशिष्ट्ये:

१. बाहेरील मंडपामध्ये पितळी पट्टीवर स्थळ पुराणे चित्रित करणारी उठावदार चित्रे आहेत.

२. इथल्या द्वारपालकांच्या मूर्ती लहान आहेत.

३. श्री दुर्गादेवींच्या देवालयाजवळ काही ऋषींची शिल्पे आहेत.

४. असा समज आहे कि इथले क्षेत्र वृक्ष १६०० वर्षे जुने आहे.

५. आवनी आणि पंगूनी ह्या तामिळ महिन्याच्या १८व्या, १९व्या आणि २०व्या दिवशी सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात.

६. असा समज आहे की इथून जवळ असलेल्या आठ शिव मंदिरांमध्ये अष्टदिक्पालांची पूजा केली जाते. त्यात हे स्थळ म्हणजेच वन्नीयुर पण आहे.

७. ह्या मंदिरात २ चंडिकेश्वरांच्या मूर्ती आहेत.


मंदिराबद्दल माहिती:

मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ, अर्धमंडप आणि खुला मुखमंडप आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्याला दोन स्तरांचं राजगोपुर आहे आणि एक परिक्रमा आहे. इथे ध्वजस्तंभ नाही. इथे प्रवेशावर नंदीमंडपामध्ये बलीपीठ आणि नंदी आहेत. इथले स्वयंभू लिंग पूर्वाभिमुख आहे. 

कोष्ठ मूर्ती: श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्म आणि श्री दुर्गादेवी.

परिक्रमेमध्ये पुढल्या मूर्ती आणि देवालये आहेत - श्री गणेश, श्री सुब्रह्मण्य त्यांच्या पत्नींसमवेत, शैव संत नालवर, अनेक शिवलिंगे, श्री भैरव, श्री सूर्य, श्री चंद्र आणि श्री शनीश्वर. 

ह्या मंदिरात दोन चंडिकेश्वरांच्या मूर्ती आहेत. परिक्रमेमध्ये श्री सोमस्कंदर आणि श्री नटराज ह्यांच्यापण मूर्ती आहेत. इथे पंचमूर्ती आहेत आणि त्या सुंदर आणि प्रसिद्ध आहेत. भगवान शिवांच्या देवालयाच्या प्रवेशावर द्वारपालकांची दगडी शिल्पे आहेत. गाभाऱ्याच्या भिंतींवर पुढल्या मूर्ती आहेत - शैव संत अप्पर, श्री अग्नी, श्री गौरीदेवी, शिवलिंग, शिवलिंगावर आपल्या आचळांमधून दुधाचा अभिषेक करणारी कामधेनू आणि श्री ऋषभारूढर. ह्या सगळ्या मूर्ती एका रेषेत आहेत. परिक्रमेमध्ये श्री गणेश, श्री बालसुब्रमण्य आणि श्री गजलक्ष्मी देवींची देवालये आहेत. नालवर ह्यांच्या मूर्ती मुखमंडपामध्ये आहेत. श्री अंबिकादेवींचे देवालय भगवान शिवांच्या देवालयाच्या उजव्याबाजूला आहे. श्री अंबिका देवींची मूर्ती छोटी पण खूप सुंदर आहे. ह्या स्थळाच्या भोवती आठ मंदिरे ज्यांना अष्टदिक्पालांची मंदिरे असं म्हणलं जातं. ह्या मंदिरांमध्ये पूजा करणं हे खूप शुभ मानलं जातं. ती आठ मंदिरे अशी आहेत

दिक्पाल

स्थळाचे नाव

इंद्र

अंगमबाडी

अग्नी

वन्नीयुर

यम

करुवेली

नैऋत्य

वयलूर

वरूण

शिवनगरम

वायू

अकलंगम

कुबेर

दक्षिण पुडूर

इशान

नल्लवुर


प्रार्थना:

१. भाविक जन इथे विवाहातल्या अडचणींचा परिहार करण्यासाठी प्रार्थना करतात.

२. भाविक जन इथे उष्णतेने निर्माण झालेल्या रोगांचे तसेच उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या रोगांचे निरसन करण्यासाठी अग्नी तीर्थामध्ये स्नान करून भगवान शिवांची पूजा करतात.

३. हे वास्तुदोष परिहार स्थळ असल्याकारणाने भाविक जन इथे वास्तुदोषांच्या परिहारासाठी पूजा करतात

४. इमारतीचे बांधकाम सुरु करण्याआधी भाविक जन इथे सात विटा घेऊन येतात आणि पूजा करतात. आणि मग इमारतीचे बांधकामाची सुरुवात ह्या सात विटांनी करतात. 


पूजा:

सर्व दैनंदिन पूजा, प्रदोष पूजा, अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष पूजा.


मंदिरात साजरे होणारे सण:

वैकासि (मे-जून): वैकासि विशाखं

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई दीपम

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री


मंदिराच्या वेळा: सकाळी ८ ते दुपारी १२, संध्याकाळी ५ ते रात्री ८


मंदिराचा पत्ता:

श्री अग्नीपुरीश्वरर मंदिर,
ऍट पोस्ट वन्नीयुर (अन्नीयुर),
तालुका: कूडवासल,
जिल्हा: थिरुवारुर,
तामिळनाडू ६१२२०१


पुरोहिताचा संपर्क: श्री गणेश गुरुक्कल - +९१४३५२४४९५७८ 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

Thursday, March 12, 2026

Shri Agnipureeshwarar Temple at Anniyur (Vanniyur)

This place is at a distance of about 28 kms from Mayiladuthurai on Mayiladthurai-Thiruvarur route, 18kms from Peralam, 12 kms from Thirupampuram, 35 kms from Thiruvarur and 25 kms from Kumbhakonam. This Padal Petra Sthalam was revered by Shaiva Saint Appar in his sacred hymns. This is on the southern bank of Kaveri and on the northern bank of Arisilaru tributary of Kaveri. 

The original temple must have existed before the seventh century. Later on it was converted into a stone structure by Chola kings. This temple was maintained by Vijayanagara kings, Maratha kings and Nagarathars.

Moolavar: Shri Agnipureeshwarar, Shri Agnishwarar
Devi: Shri Gauri, Shri Parvati
Sacred Theertha: Agni Theertha
Sacred Vruksha: Shami tree
Puranik name: Thiruanniyur, Thiruvanniyur
Present name: Anniyur

Kshetra Purana:

1. King Daksha had invited everyone for the yagnya except his son-in-law and daughter (Lord Shiva and Goddess Parvati). Lord Shiva advised Goddess Parvati not to attend the function but still she went to the yagnya against Lord Shiva’s advice. It was there that both she and her husband were insulted. Goddess Parvati jumped into the yagnya fire. Hence Veerabhadra and BhadraKaali punished those who attended yagnya on the orders of Lord Shiva. As Lord Agni had attended the yagnya, he was cursed by Lord Shiva to lose all his power so that he can not participate in any yagnya. As Lord Agni lost his power no yagnya could be conducted on the earth. This resulted in famine and hardship for all living beings. For an atonement for his mistake Lord Agni came to this place, created a theertha, made a Shiva linga, installed it and worshiped it with Shami leaves. By the grace of Lord Shiva, he got rid of his curse. Hence the place got the name Anniyur which in course of time became Vanniyur (Vanni in tamil means Shami). And Lord Shiva is known as Agnipureeshwarar. Theertha created by Agni is called Agni Theertha.

2. Goddess Parvati took birth as the daughter of Sage Katya to marry Lord Shiva. She did penance at this place and finally Lord Shiva appeared before her and blessed her. Later they married nearby Thiruveezhimizhalai.

Those who worshiped at this place

Lord Brahma, Lord Agni, Sage Agastya, Sanath Kumar, Sanatan Rishis and Goddess Parvati.

Salient features:

1. On the walls of the outer mandap we find Brass-relief of Sthala Purana.

2. Dwarapalakas idols are small. 

3. Near Goddess Durga’s shrine, there are some sculptures of Sages.

4. The Kshetra Vruksha is believed to be more than 1600 years old.

5. The rays of the Sun fall on Shiva Linga on eighteenth, nineteenth and twentieth days in the Tamil month of Aavani and Panguni.

6. It is believed that the Ashtadikpalas are worshiped in eight nearby Shiva sthalam including Vanniyur.

7. There are two Chandikeshwarar idols in the temple.

About the temple:

The temple consists of the Sanctum Santorum, Antarala, Ardhamandap and an open Mukhamandap.

This is an east facing temple with a two tiered Rajagopuram and single prakaram. There is no Dhawajastambha. At the entrance we have Balipeeth and Nandi in the Nandimandap. The Swayambhu Linga is facing the east. 

Koshta Murtis: Lord Dakshinamurti, Lord Lingothbhavar, Lord Brahma and Goddess Durga. 

In the prakaram we come across following shrines and idols - Lord Ganesha, Lord Subramanya with his consorts, Shaiva Saints Nalvar, a number of Shiva lingas, Lord Bhairava, Lord Surya, Lord Chandra and Lord Shanishwarar. There are two Chandikeshwarar idols in the shrine. We also come across in the prakaram Lord Somaskandar and Lord Nataraja. There are pancha murtis and they are very beautiful and famous. The Dwarapalakas at the entrance of Lord Shiva’s shrine are sculptured in stone. On the walls of the Sanctum Sanctorum there are idols of Shaiva Saint Appar, Lord Agni, Goddess Gauri, Shiva Linga, Celestial Cow Kamadhenu pouring milk on a Shiva Linga from its udder and Lord Rishabharudhar. They are placed in a single line. There are shrines of Lord Ganesha, Lord Balasubramanya and Goddess Gajalakshmi in the prakaram. The shrine of Nalvar is in the front mandap. The shrine of Ambika is to the right of Lord Shiva’s shrine. The idol of Goddess Ambika is small but very beautiful. 

There are 8 temples around this place which are considered as the temples of Asthadikpalakas. It is considered to be very auspicious to worship at these temples. The temples are 

Dikpal

Name of the place

Indra

Angambadi

Agni

Vanniyur

Yama

Karuveli

Nairutya

Vayalur

Varun

Sivanagaram

Vayu

Aklangam

Kubera

S.Pudur

Eeshan

Nallavur


Prayers

1. Devotees worship at this place to get rid of obstacles in marriage. 

2. Devotees worship Lord Shiva after taking a dip in Agni theertha to get rid of heat related problems and blood pressure ailments. 

3. People worship here for the removal of Vastu dosha as this temple is a parihar sthala for Vastu dosha.

4. Devotees bring seven bricks to the temple before starting construction of the building. After performing the pooja they start building their house first with these seven bricks.

Poojas

All daily rituals, pradosa pooja, special poojas on new moon and full moon days.

Important festivals:

Vaikasi (May-June): Vaikasi vishakham
Maasi (Feb-March): Mahashivaratri
Margazhi (Dec-Jan): Thiruvathirai
Karthigai (Nov-Dec): Thiru Karthigai deepam
Aipassi (Oct-Nov):Annabhishek
Aavani (Aug-Sept): Ganesh Chaturthi

Timings: 8 am to 12 noon, 5 pm to 8 pm

Address

Shri Agnipureeshwarar Temple,
at post Vanniyur (Anniyur)
Taluka: Kudavasal,
District: Thiruvarur,
Tamil Nadu 612201

Contact of priest: Shri Ganesh Gurukkal - 91-4352449578 

Courtesy: Various websites and blogs

Sunday, March 8, 2026

थिरुवीळीमिळलै येथील श्री नेत्रपाणेश्वरर मंदिर

हे मंदिर मयीलादुथुराई - थिरुवारुर मार्गावर मयीलादुथुराई पासून २७ किलोमीटर्स वर, पुंथोट्टम पासून १० किलोमीटर्स वर, पेरलम पासून १४ किलोमीटर्स वर, कारैक्कल पासून ३६ किलोमीटर्स वर, कुंभकोणम पासून ३० किलोमीटर्स वर, थिरुपांपुरं पासून ७ किलोमीटर्स वर आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिणकाठावर आहे. हे विवाहातल्या अडचणींसाठी परिहार स्थळ आहे. शैव संत संबंधर, अप्पर आणि सुंदरर ह्यांनी ह्या मंदिरातील भगवान शिवांची स्तुती गायली आहे. हे मंदिर अरिसिलारू ह्या कावेरी नदीच्या उपनदीच्या उत्तर काठावर आहे. पूर्वी इथे विपुल प्रमाणात फणस, चंदन, चंपक आणि कवठाचे वृक्ष होते. म्हणून ह्या स्थळाला वीळीवन असं नाव आहे. 

हे मंदिर साधारण २००० वर्षे जुने आहे. हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. ह्या मंदिराचे दगडी बांधकाम करून पुनर्निर्माणाचे काम चोळा राजांनी केले आणि विस्तार विजयनगर राजांनी केला. इथे कुलोथंगन I ह्या चोळा राजाच्या काळापासूनचे ६८ शिलालेख आहेत. ह्या शिलालेखांमध्ये विजयनगर आणि चोळा राजांनी दिलेल्या देणग्या आणि भेटवस्तूंचे उल्लेख आहेत. 

मूलवर: श्री नेत्रपाणेश्वरर, श्री वीळीनाथरस्वामी, श्री वीळीअळगेसर, श्री कल्याणसुंदरमूर्ती
देवी: श्री सुंदरभुजांबिका, श्री कात्यायनी
पवित्र तीर्थ: विष्णू तीर्थ, दामोदर तीर्थ आणि इतर २५ तीर्थे
क्षेत्र वृक्ष: वीळी वृक्ष

क्षेत्र पुराण:

१. कात्यायन ऋषी आणि त्यांच्या पत्नीनें त्यांच्या पोटी श्री पार्वती देवींनी जन्म घ्यावा ह्यासाठी प्रखर तपश्चर्या केली. ह्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन श्री पार्वती देवींनी त्यांच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्यांना कात्यायनी असं नाव प्राप्त झालं. जेव्हा कात्यायनी विवाहयोग्य झाली त्यावेळी कात्यायन ऋषींनी भगवान शिवांना कात्यायनीबरोबर विवाह करण्याची प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन भगवान शिवांनी चित्राई ह्या तामिळ महिन्याच्या मघा नक्षत्र दिवशी कात्यायनीबरोबर विवाह केला. कात्यायन ऋषींनी भगवान शिवांना कात्यायनीसमवेत इथे विवाहाच्या पोशाखात राहून सर्वांना दर्शन देत राहावे अशी प्रार्थना केली. म्हणून भगवान शिव इथे श्री पार्वती देवींसमवेत विवाहाच्या पोशाखात इथे प्रकट झाले.  

२. स्थळ पुराणानुसार ह्या स्थळी कवठ, चंपक आणि फणसाचे वृक्ष विपुल प्रमाणात होते. म्हणून ह्या स्थळाला वीळीवनम असे नाव होते. मीळलै नावाचा पारधी भगवान शिवांना रोज एक कवठाचे फळ अर्पण करून पूजा करायचा. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्याला दर्शन दिलं आणि त्याला अष्टमहासिद्धी प्रदान केल्या. मीळलैने तपश्चर्या करून तो सिद्धमुनि झाला. इथे त्याचे स्वतंत्र देवालय आहे. म्हणून ह्या स्थळाला थिरुवीळीमिळलै असं नाव प्राप्त झालं. आणि भगवान शिवांना थिरुवीळीनाथर असं नाव प्राप्त झालं.

३. पुराणानुसार दधिची ऋषींबरोबरच्या युद्धामध्ये भगवान महाविष्णूंनी त्यांचे सुदर्शन चक्र वापरले होते. पण दधिची ऋषींच्या शरीराशी त्या चक्राचा स्पर्श होताच त्या चक्राची शक्ती लोप पावली. ह्या चक्राची शक्ती पूर्ववत होण्यासाठी महाविष्णूंनी इतर देवांना सल्ला विचारला. तेव्हा इतर देवांनी त्यांना भगवान शिवांकडे जाण्याचा सल्ला दिला कारण भगवान शिवांनी जालंधर असुराचा वध करण्यासाठी चक्राचा वापर केला होता. महाविष्णू इथे गाभारा आणि विमान घेऊन आले. त्यांनी त्याच्या आत शिवलिंगाची स्थापना केली आणि दररोज १००० कमळांनी त्याची पूजा केली. भगवान शिवांनी महाविष्णूंची परीक्षा बघण्यासाठी एक दिवस एक कमळ फुल कमी केले. त्याची भरपाई करण्यासाठी महाविष्णूंनी फुलाच्या जागी आपलं एक नेत्र अर्पण केलं. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी महाविष्णूंचं नेत्र पूर्ववत केलं आणि त्यांना सुदर्शन चक्र प्रदान केलं. म्हणून महाविष्णूंना इथे कमलकन्नन (कमळासारखे नेत्र असलेला) असं नाव प्राप्त झालं. शैव संत अप्पर आणि संबंधर ह्यांच्या पवित्र स्तोत्रांमधे ह्या घटनेचा उल्लेख आहे.

४. स्थळ पुराणानुसार एकदा शैव संत अप्पर आणि सुंदरर इथे आले. त्यावेळी इथे प्रखर दुष्काळ पडला होता. अप्पर आणि सुंदरर ह्यांनी भगवान शिवांकडे दुष्काळ दूर होण्यासाठी प्रार्थना केली. भगवान शिवांनी त्या दोघांना रोज एक पडीकासू द्यायला चालू केलं जे वापरून ते दुष्काळात लोकांना मदत करू शकतील (तामिळ मध्ये पडी म्हणजे भत्ता आणि कसु म्हणजे सुवर्णमुद्रा). संबंधरांना त्यांची सुवर्णमुद्रा ध्वजस्तंभाच्या जवळ महामंडपात मिळायची आणि अप्परांना त्यांची सुवर्णमुद्रा पश्चिमेकडील परिक्रमेच्या जवळ पीठावर मिळायची. संबंधरांना वाटलं कि त्यांना मिळणारी मुद्रा अप्परांना मिळणाऱ्या मुद्रेपेक्षा कमी शुद्ध आहे म्हणून त्यांनी भगवान शिवांना प्रार्थना केली. भगवान शिवांनी संबंधरांना सिरकाळी येथे दर्शन दिलं आणि अप्परांना वीळुवन येथे दर्शन दिलं.

५. उत्तरेकडच्या श्वेतकेतु राजाला ज्योतिषांनी सांगितलं कि त्याचं आयुष्य हे फक्त १८ वर्षेच उरलं आहे. त्याने विचिध ज्योतिषांची सल्लामसलत केली तेव्हा ज्योतिषांनी त्याला इथे येऊन भगवान शिवांची प्रार्थना करायचा सल्ला दिला. श्वेतकेतु इथे आला आणि ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार त्याने भगवान शिवांची प्रार्थना केल्यावर भगवान शिवांनी त्याचं यमदेवांपासून रक्षण केलं. म्हणून इथे कालसंहारमूर्ती आहे. 

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

वसिष्ठ ऋषी, अगस्त्य ऋषी, कामदेव, रती देवी, मनू, शैव संत संबंधर, श्वेतकेतु राजा, सिद्धमिळलै, कात्यायन ऋषी आणि श्री महाविष्णू.

वैशिष्ट्ये:

१. हे मंदिर किल्ल्यासारखे बांधले आहे.

२. हे मंदिर माड कोविल सारखे आहे.

३. इथला गाभारा खूप सुंदर आहे.

४. हे अशा सहा स्थळांपैकी एक स्थळ आहे जिथे उपासना केल्याने मृत्यूचे भय निघून जाते. उरलेली पांच स्थळे अशी आहेत - थिरुकडयूर, थिरुवैयारू, थिरुवेंगाडू, थिरुवैकावूर आणि थिरुवांचिअम.

५. इथे गाभाऱ्याला एक छिद्र आहे. असा समज आहे ह्या छिद्रातून रोज एक पोपट येतो आणि भगवान शिवांची पूजा करतो.

६. मुख्यमंडपाचे प्रवेशद्वार वटवाघुळाच्या कपाळासारखे आहे.

७. इथे एक १०० स्तंभांचा मंडप आहे.

८. हे विवाहातल्या अडचणींसाठी परिहार स्थळ आहे. 

९. हे अशा ४४ पाडळ पेथ्र स्थळांपैकी एक आहे जिथे मूवर (तीन श्रेष्ठ नायनमार) ह्यांनी पवित्र स्तोत्रे गायली आहेत.

१०. ह्या मंदिरात कोष्ट मूर्ती नाहीत.

११. गाभाऱ्यावरचे विमान १६ सिंहांच्या आधाराने उभे आहे.

१२. उत्सव मूर्तींनी हातामध्ये तराजू घेतला आहे तर पार्वती देवींनी माप मोजण्याचे भांडे (तामिळ मध्ये पडी, मराठीमध्ये पायली) हातामध्ये घेतले आहे. 

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर पूर्वाभिमुख असून ४ एकरवर पसरले आहे. मुख्य मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ, अर्धमंडप आणि मुखमंडप आहेत. ह्या मंदिराला पांच स्तरांचं राजगोपुर आहे आणि तीन परिक्रमा आहेत. एक बलीपीठ पूर्वेला आहे आणि एक बलीपीठ पश्चिमेला आहे. ध्वजस्तंभाजवळ एक स्वतंत्र शिवलिंग आहे ज्याचे नाव थिरुमूलनाथर असे आहे. हे मंदिर किल्ल्यासारखे बांधले आहे. दिसायला हे मंदिर माड कोविल सारखे आहे. गाभाऱ्यावरचे विमान अशा रीतीने शिल्पीले आहे कि १६ सिंह हे विमान धरून आहेत असा भास होतो. ह्या विमानाला विन्नळीविमानम असं नाव आहे. असा समज आहे कि हे विमान श्री महाविष्णूंनी स्वर्गातून आणले. इथले शिवलिंग स्वयंभू आहे. इथे जमिनीच्या पातळीच्या खाली एक नंदी आहे ज्याचे नाव पाताळनंदी असे आहे. असा भास होतो कि पूर्ण मंदिरच नंदीच्यावरती बांधले आहे. इथे एक मंडप आहे ज्याचा आकार वटवाघुळाच्या शिरासारखा आहे. ह्या मंडपामध्ये १०० स्तंभ आहेत. ह्या मंडपात सुंदर शिल्पे आहेत. ह्या मंदिरामध्ये कोष्ठ मूर्ती नाहीत. गाभाऱ्याच्या प्रवेशाला थोड्या पायऱ्या आहेत. प्रवेशावरचे स्तंभ एखाद्या केळ्याच्या पानांशिवाय असलेल्या विवाह मंडपासारखे भासतात. शिवलिंगाशिवाय इथे भगवान शिव आणि श्री पार्वती देवींची मानवी रूपातील १५ फूट उंच मूर्ती आहे. ते नवविवाहित दाम्पत्यासारखे दिसतात. (ह्या मूर्तीला तामीळमध्ये मप्पीलैस्वामी असे नाव आहे). आंतले गोपुर रथाच्या आकाराचे असून भगवान शिव रथामध्ये बसले आहेत आणि इंद्रदेव सारथ्य करीत आहेत असे दृश्य आहे. मंदिराच्या दक्षिणेला श्री विनायकांची मूर्ती आहे ज्याचे नाव श्री पडिकासुविनायक असे आहे (पडी म्हणजे माप, मराठी मध्ये पायली आणि कासू म्हणजे मुद्रा). मंदिराच्या पश्चिमेला श्री सोमस्कंदर, श्री मुरुगन आणि श्री महालक्ष्मी ह्यांची देवालये आहेत. मंदिराच्या उत्तरेला श्री चंडिकेश्वरर आणि श्री शिवगामीसमवेत श्री नटराज ह्यांची देवालये आहेत. ह्याशिवाय परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती बघावयास मिळतात - श्री भिक्षादनर, श्री कालसंहारमूर्ती, श्री त्यागराज, श्री दक्षिणामूर्ती, शैव संत नालवर, श्री थुंडीविनायक, श्री बाल गणपती, श्री बालसुब्रमण्यम, शिवलिंगे, श्री मुक्तादेवी, श्री एकांबरेश्वरर, श्री अरुणाचलेश्वरर, श्री वैद्यनाथर, श्री मयूरनाथर, श्री सूर्य आणि श्री भैरव. 

श्री पार्वती देवींचे देवालय एका स्वतंत्र परिक्रमेमध्ये आहे. ह्या देवालयाच्या प्रवेशाला श्री गणेश आणि श्री मुरुगन ह्यांच्या मूर्ती आहेत. 

श्री कल्याणसुंदरेश्वरर ह्या मिरवणुकीच्या मूर्तीमध्ये श्री महाविष्णू आपले नेत्र अर्पण करत आहेत असे दृश्य आहे. 

प्रार्थना:

१. हे विवाहातल्या अडचणींसाठी परिहार स्थळ आहे. म्हणून इथे विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी इथे भाविक जन प्रार्थना करतात.

२. भाविक जन इथे अपत्यप्राप्तीसाठी, ज्ञानप्राप्तीसाठी तसेच शिक्षणात प्राविण्य प्राप्त करण्यासाठी इथे प्रार्थना करतात.

पूजा:

दररोज ५ पूजा केल्या जातात. तसेच नियमित प्रदोष पूजा पण केली जाते.

मंदिरामध्ये साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): १० दिवसांचा चित्राई उत्सव
आडी (जुलै-ऑगस्ट): आडीपुरम - पूर्वा फाल्गुनी नक्षत्र दिवशी उत्सव
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी, मूळ नक्षत्र दिवशी उत्सव
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

मंदिराच्या वेळा : सकाळी ८ ते दुपारी १२, संध्याकाळी ५ ते रात्री ८

मंदिराचा पत्ता:

श्री नेत्रपाणेश्वरर मंदिर (श्री वीळीनाथर मंदिर)
ऍट पोस्ट थिरुवीळीमिळलै,
तालुका कूडवासल,
तामिळ नाडू ६०९५०५

दूरध्वनी: ०४३६६-२७३०५०, ९४४३९२४८२५

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

Thursday, March 5, 2026

Shri Nethrapaneshwarar Temple at Thiruveezhimizhalai

This Shiva temple is at a distance of 27 kms from Mayiladuthurai on Mayiladuthurai-Thiruvarur route, at a distance of about 10 kms Poonthottam, 14 kms from Peralam, 36 kms from Karaikkal, 30 kms from Kumbhakonam and 7 kms from Thirupampuram. This is a Padal Pethra Sthalam on the southern bank of Kaveri. This is a parihaar sthala for marriage obstacles. Shaiva Saints Sambandhar, Appar and Sundarar have sung sacred hymns on Lord Shiva of this temple. This is on the northern bank of River Arisilaru which is a tributary of Kaveri. In the good old days, this place was abundant with jackfruit, sandalwood, champak and wood apple trees. Hence this place was known as Veezhi forest. This temple is about 2000 years old. The temple must have existed even before the 7th century. It was reconstructed as a stone structure by Chola king and extensions were made by Vijayanagar kings. There are 68 stone inscriptions, from the period of the Chola King Kulothungan-I. They give an account of endowments and gifts made by Chola and Vijayanagar kings.

Moolavar: Shri Nethrapaneshwarar, Shri Veezhinatharswami, Shri Veezhiazhagesar, Shri Kalyansundar Moorti 
Devi: Shri Sundarbhujanmbika, Shri Kathyayani
Sacred Theertha: Vishnu Theertha, Damodar Theertha and 25 others
Kshetra Vruksha: Veezhi tree

Kshetra Purana

1. Pleased with the severe penance of Sage Kathyayana and his wife for a child, Goddess Parvati was born as their daughter Kathyayani. When she became eligible for marriage, Sage Kathyayana prayed to Lord Shiva to marry her. Heeding to the prayer of the Sage, Lord Shiva married her on a day of Magha nakshatra in the Tamil month of Chitrai. The Sage requested the Lord to give darshan to one and all on that day in the wedding attire at this place. Hence Lord Shiva appeared with Goddess Parvati at this place in their wedding attire. 

2. According to the Sthala Purana, once this place was abundant with wood apple, champak and jackfruit trees and was known as Veezhivanam. A hunter Mizhalai used to worship the Lord by offering a wood apple daily. Pleased with his devotion Lord gave him darshan and blessed him with Ashtamahasiddhi. He performed penance and attained the status of Siddhamuni. There is a separate shrine for him in the parikrama. The place got the name ThiruVeezhimizhalai. Lord Shiva is praised here as Thiruveezhinathar. 

3. According to the Purana, Lord Mahavishnu had used his discus in his battle against Sage Dhadhichi. The discus lost its power on coming into contact with Sage’s body. Lord Mahavishnu consulted other gods so that his discus could regain the lost power. They advised him to approach Lord Shiva as he has a discus with him which he had used against demon Jalandhar to destroy him. Lord Mahavishnu came to this place carrying a Sanctum Tower. He placed Lord Shiva’s idol (Shiva Linga) inside it and worshiped him daily, by offering 1000 lotus flowers. To test Lord Mahavishnu’s devotion, one day Lord Shiva caused the shortage of one lotus flower. To compensate for the loss of one lotus flower, Lord Mahavishnu plucked one of his eyes and offered it as the 1000th flower. Pleased by his devotion Lord Shiva restored Lord Mahavishnu’s vision and gave him his Sudarshan Chakra. Hence Lord Mahavishnu is named as Kamalkannan (Lotus eyed). This incident finds mention in the sacred hymns of Shaiva Saint Appar and Sambandhar. 

4. According to the Kshetra Purana, there was a severe drought when Shaiva Saint Appar and Sundarar once came to this place. They prayed to Lord Shiva for relief. He gave them daily one Padi-kasu (Padi – allowance; Kasu = gold coin) so that they could use it for granting relief to the people. Sambandhar got this gold coin in the Mahamandap near the flag post while Appar got it near the peetha near the west parikrama. The gold coin received by Sambandhar was less pure who prayed to Lord Shiva to grant him the same sort of gold coin as that of Appar. He granted him his darshan as Sirkazhi Thoniappar at this place. 

5. A King named Shwetaketu from the north was informed by his astrologers that he had a span of only 18 years. He took the advice of various sages who advised him to praise Lord Shiva at this place. He came to this place to worship Lord Shiva and was saved from Lord Yama. Hence we come across the idol of Kaalsamharmoorthi at this place. 

Those who worshiped at this place: Sage Vashistha, Sage Agastya, Kamadeva, Rati Devi, King Manu, Shaiva Saint Sambadhar, King Shwetaketu, Siddhamizhiali, Sage Kathyayana and Lord Mahavishnu.

Special Features:

1. The temple is built like a fort.

2. The temple resembles a Maada Kovil.

3. The Sanctum Sanctorum is very beautiful.

4. This is one of the 6 places where one can get relief from the fear of death (the others are Thirukadayur, Thiruvaiyaru, Thiruvenkadu, Thiruvaikavur, Thiruvanchiam).

5. There is a hole in the sanctum through which a parrot is believed to come every day to worship Lord Shiva.

6. The entrance of the main hall is shaped like the forehead of a bat. Bats cannot enter the temple and stay on the roof.

7. There is a 100 pillared mandap.

8. This is a Parihar sthala for marriage obstacles.

9. This is one of the 44 Padal Pethra Sthalam where the three Shaiva Saints (Moovar) have sung sacred hymns.

10. In this temple there is no Koshta murti.

11. The Vimaanam over the sanctum is supported by sixteen lions.

12. The Utsav Moorti is holding a balance while Goddess Partvati is holding a measuring vessel (known as Padi in Tamil, Payali in Marathi).

About the temple

The temple is facing the east and is spread over 4 acres. The main temple consists of Sanctum Sanctorum, Antarala, Ardhamandap and Mukhamandap. It has a 5 tiered Rajagopuram and 3 parikramas. The balipeeth is on the east and west side of the temple. There is a separate Shiva Linga near the Dhwajastambha praised as Thirumoolanathar. The temple is built like a fort. It resembles a Maada Kovil. The Sanctum Sanctorum tower is sculptured in such a way, it looks as if 16 Lions are holding it. This is known as Vinnazhivimanam believed to have been brought from the celestial world by Lord Mahavishnu. The Shiva linga is a Swayambhoo Linga. There is a nandi below the ground level known as Patalnandi. It appears as if the whole temple is built on the Nandi. There is a mandap which resembles the bat head with a 100 pillared hall. It has a lot of beautiful sculptures. There are no Koshtha moorties in this temple. The entrance path to the sanctum has a few steps. The pillars at the entrance resemble a marriage hall without banana trees. Apart from Shiva Linga there is an idol of Lord Shiva and Goddess Parvati (in human form) which is 15 feet tall. They are present as a newly wedded couple (known as Mappillai Swami in Tamil). The inner gopuram is in the shape of a chariot with Lord Shiva seated on it and Lord Indra as his charioteer. On the southern side there is a shrine of Lord Ganesha praised as Lord Padikasuvinayaka (Padi – a measure, payali in Marathi, Kasu means coins). On the west side we come across the shrines of Lord Somaskanda, Lord Muruga and Goddess Mahalaxmi. On the northern side we have the shrines of Lord Chandikeshwarar and Lord Nataraja with Goddess Shivagami. Besides these we come across shrines and idols of Bhikshadanar, Kaalsamharmoorthi, Tyagaraja, Lord Dakshinamoorti, Shaiva Saint Naalvar, Lord Thundi Vinayaka, Lord Baal Ganapati, Lord Baal Subramanyam, Shiva lingas, Goddess Mukta devi, Lord Ekambareshwarar, Lord Arunachaleshwarar, Lord Vaidyanadar, Lord Mayurnadar, Lord Surya, Lord Bhairava in the parikrama. 

Goddess Parvati is in a separate shrine with a separate parikrama. At the entrance of the shrine, we have idols of Lord Muruga and Lord Ganesha. The procession of Lord Kalyansundareshwarar can be seen with Lord MahaVishnu offering his eye. 

Prayers

1. Devotees pray here for removal of marriage obstacles as this is a parihaar sthala for marriage obstacles.

2. Devotees worship at this place for child boon, knowledge and excellence in education.

Pooja: 5 times a day and pradosha puja

Festivals

Chitrai (April-May): 10 days Chitrai festival 

Aadi (July-Aug): Puram (Pooja on Poorva Phalguni nakshatra day)

Aavani (Aug-Sept): Shri Ganesh Chaturthi, Pooja on Mula nakshatra day

Purattasi (Sept-Oct): Navaratri

Aaipassi (Oct-Nov): Annabhisheka, Skanda Shashthi

Karthigai (Nov-Dec): Thirukarthigai

Margazhi (Dec-Jan): Thiruvathirai

Maasi (Feb-Mar): Mahashivaratri

Timing: 8am -12 noon and 5pm - 8pm

Address

Shri Nethrapaneshwarar (Shri Veezhinadar) Temple, 
at Post Thiruveezhimizhilai, 
Taluka Kudavasal, 
Tamil Nadu 609505

Temple phone number: 04366-273050; 9443924825

Courtesy: Various websites and blogs

Sunday, March 1, 2026

चिरूगुडी येथील श्री सूक्ष्मपुरीश्वरर मंदिर

हे मंदिर कारकथी पासून ५ किलोमीटर्स वर आहे. कारकथी गाव मयीलादुथुराई-कारैक्कल मार्गावर कुंभकोणमपासून २८ किलोमीटर्स वर आहे. पेरलम पासून मयीलादुथुराई-थिरुवारुर मार्गावर ९ किलोमीटर्स वर आहे. थिरुपांपूरं पासून १ किलोमीटर वर आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. ह्या मंदिराची स्तुती शैव संत संबंधर ह्यांनी गायली आहे. ह्या स्थळाचे ऐतिहासिक नाव सूक्ष्मपुरी / सिरूपुरी असे आहे. मूळ मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. चोळा राजांनी ह्या मंदिराचे दगडी बांधकाम केले आणि विजयनगर आणि मराठा राजांनी ह्या मंदिराचा विस्तार केला. इथल्या शिलालेखांमध्ये विविध राजांनी मंदिरासाठी दिलेल्या देणग्यांचा उल्लेख आहे. हे स्थळ पानन ह्यांचं जन्मस्थळ आहे. पानन हे किल्लीवनन राजाचे मित्र होते. ते त्यांच्या परोपकारी कार्यासाठी प्रसिद्ध होते. अरणनुरू आणि पुराणरुर ह्या संगम काळातल्या साहित्यामध्ये त्यांची स्तुती केली आहे. हे मंदिर चार पाडळ पेथ्र स्थळांच्या मध्यभागी आहे. ह्या मंदिराच्या पूर्वेला थिरुपांपूरं आहे, दक्षिणेला थिरुवीळीमाली आहे, पश्चिमेला अन्नीयुर आहे आणि उत्तरेला थिरुथेरूचेंदूर आहे. 

मूलवर: श्री सूक्ष्मपुरीश्वरर, श्री मंगळनाथर, श्री चिरूगुडीश्वरर, श्री कल्याणसुंदरेश्वरर
देवी: श्री मंगळनायकी
पवित्र तीर्थ: मंगळ तीर्थ, सूर्य तीर्थ
पवित्र वृक्ष: बिल्व

क्षेत्र पुराण:

१. एकदा भगवान शिव आणि श्री पार्वती देवी द्यूत खेळत होते. जेव्हा श्री पार्वती देवी जिंकायच्या बेतात होत्या त्यावेळी भगवान शिव अकस्मात अदृश्य झाले. श्री पार्वती देवी चिंतीत झाल्या आणि भगवान शिवांना सर्व ठिकाणी शोधू लागल्या. त्यांना भगवान शिव कुठे सापडले नाहीत. शेवटी त्या एका स्थळी आल्या जे स्थळ बिल्व वृक्षांनी घनदाट भरले होते. त्यांनी मंगळ तीर्थ नावाचे तीर्थ निर्माण केले आणि तिथल्या मूठभर वाळूने एक शिवलिंग तयार केले. त्यांची भक्ती पाहून भगवान शिवांनी त्यांना दर्शन दिलं आणि ते परत त्यांना कैलासावर घेऊन गेले. श्री पार्वती देवींनी तयार केलेले लिंग हे मूठभर वाळूने तयार केले होते म्हणून ह्या लिंगाला सिरूपीडी (तामिळ मध्ये सिरू म्हणजे मूठभर) असं नाव प्राप्त झालं. कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन सिरूकुडी असं नाव झालं आणि अजून अपभ्रंश होऊन ते चिरूगुडी असं झालं. ह्या शिवलिंगावर अजूनही हाताची चिन्हे दिसतात. भगवान शिव अकस्मात प्रगट झाले म्हणून त्यांना श्री सूक्ष्मपुरीश्वरर असे संबोधले जाते. इथले पवित्र तीर्थ श्री पार्वती देवींनी निर्माण केले म्हणून ह्या तीर्थाला मंगळतीर्थ असे नाव प्राप्त झाले आणि श्री पार्वती देवींना श्री मंगळनायकी असे नाव प्राप्त झाले.

२. इथल्या स्थळपुराणानुसार कूनपांडियन नावाचा राजा मदुराईवर राज्य करत होता. तो काही जैन साधूंच्या शिकवणुकींना प्रभावित झाला. त्याची पत्नी मंगैयारक्करसियार हीने आपल्या पतीला परत शैव धर्मामध्ये आणण्यासाठी शैव संत संबंधर आणि अप्पर ह्यांच्याकडे मदतीची विनंती केली. संबंधरांनी ही विनंती मान्य केली आणि मदुराईला जाण्याचं ठरवलं. त्यावेळी संबंधर आणि अप्पर इथे राहत होते. अप्पर ह्यांना वाटलं की मदुराईला भेट देण्यासाठी वेळ योग्य नाही आणि म्हणून त्यांनी संबंधरांना मदुराईची भेट पुढे ढकलण्याचा सल्ला दिला. संबंधर त्यावेळी खूप तरुण होते. ते म्हणाले शिवभक्तांवर कुठल्याही ग्रहदशेचा परिणाम होत नाही. त्यांनी ग्रहदशेचे प्रतिकूल परिणाम होऊ नयेत म्हणून पडीगम (तामिळ मधले लिहिलेली पवित्र स्तोत्रे) गायलं आणि ते मदुराईकडे निघाले आणि तिथे सुरक्षित पोचले. त्यांनी जैन साधूंचा पराभव केला. आणि त्यांनी कूनपांडियन राजाला कुबडेपणातून पण बरे केले. आणि त्याला परत शैव धर्मामध्ये परत आणले. हि कथा इथे नवग्रह संनिधीमध्ये चित्रित केली आहे जिथे श्री विष्णू, श्री ब्रह्म आणि संबंधर ह्यांच्या मूर्ती आहेत.

३. मंगळ ग्रहाने इथे भगवान शिवांची उपासना करून शापापासून मुक्ती मिळविली.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

श्री सूर्य, विश्वरीश, गंधर्व, श्री पार्वती देवी, अंगारक, गरुड, शैव संत अप्पर आणि संबंधर.

वैशिष्ट्ये:

१. श्री आलिंगनमूर्तींची मिरवणुकीसाठी जी मूर्ती आहे ती अतिशय सुंदर आहे.

२. इथले शिवलिंग वाळूचे आहे आणि त्याला कवच आहे.

३. नवग्रह संनिधीमध्ये श्री विनायक, श्री भैरव आणि शैव संत संबंधर ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री शनीश्वरर आणि श्री सूर्य एकमेकांच्या जवळ आहेत.

४. शैव संत संबंधरांनी भगवान शिव आणि श्री पार्वती देवींच्या स्तुतीपर कोलारू पडीगम गायलं. ग्रहांच्या प्रतिकूल परिणामांपासून वाचण्यासाठी त्यांनी हे गायलं. ह्या पडीगमनुसार जे भाविक जन इथे भगवान शिवांची उपासना करतील ते मुक्ती पावतील आणि शिवलोकामध्ये वास्तव्य करतील.

५. हे अंगारक दोषांचे परिहार स्थळ आहे.

मंदिराबद्दल माहिती:

मुख्य मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ, अर्धमंडप आणि महामंडप आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्याला तीन स्तरांचं राजगोपुर आहे आणि एक परिक्रमा आहे. हे मंदिर भिंतींनी पूर्ण आच्छादलेले आहे. इथे ध्वजस्तंभ नाही. राजगोपुराच्या पुढे बलीपीठ आणि नंदी आहेत जे गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. शिवलिंग वाळूचे बनलेले आहे आणि स्वयंभू आहे. ह्या लिंगावर हाताची चिन्हे आहेत. असा समज आहे की ही चिन्हे श्री पार्वती देवींची आहेत. इथले शिवलिंग सतत कवचाने आच्छादलेले असते. ह्या शिवलिंगावर अभिषेक होत नाही.अभिषेक अवूदयारवर होतो (पीठ ज्यावर शिवलिंग स्थापिलेले आहे). शिवलिंगाला कधी कधी सिवेट लावले जाते. गाभाऱ्यावरचे विमान तीन स्तरांचे आहे. 

कोष्ट मूर्ती: श्री विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री महाविष्णू, श्री ब्रह्म, श्री अर्धनारीश्वरर. श्री चंडिकेश्वरांचे देवालय नेहमीच्या स्थानी आहे. 

गाभाऱ्याच्या डावीकडे मुख मंडपामध्ये श्री अंबिका देवींचे पूर्वाभिमुख देवालय आहे. त्या उभ्या मुद्रेमध्ये आहेत आणि त्याचे हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत. शिवलिंगाच्या ऐवजी श्री पार्वती देवींवर अभिषेक केला जातो. श्री संतोषआलिंगन मूर्ती ही उत्सव मूर्ती आहे. ह्या मूर्तीमध्ये आनंदी मनःस्थितीमध्ये भगवान शिव श्री पार्वती देवींना आलिंगन देत आहेत.

इतर देवालये:

मुख मंडपामध्ये नवग्रह संनिधी ज्यामध्ये शैव संत संबंधर, श्री नर्दन विनायक आणि श्री भैरव ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री अंगारक (मंगळ), श्री मंगळ विनायक, श्री वल्ली आणि श्री दैवानै समवेत श्री सुब्रह्मण्य, श्री सूर्य आणि श्री शनीश्वरर ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत. 

प्रार्थना:

१. हे अंगारक दोषांसाठी परिहार स्थळ आहे. जे मंगळ ग्रहाच्या प्रतिकूल परिणामांमधून जात असतील त्यांनी इथे उपासना केल्यास त्यांना ह्या परिणामांतून मुक्ती मिळते.

२. भाविक जन इथे विवाहातल्या अडचणी तसेच इतर रोगांपासून मुक्ती मिळविण्यासाठी पूजा करतात. तसेच इथे दांपत्याचे पुनर्मीलन व्हावं म्हणून पण इथे भाविक जन पूजा करतात.

३. असा समज आहे कि मासी ह्या तामिळ महिन्याच्या मंगळवारी इथे मंगळ ग्रहाची पूजा केल्यास विभक्त दाम्पत्याचे पुनर्मीलन होते आणि विवाहातल्या अडचणी पण दुर होतात. त्यावेळी पवित्र तीर्थातील पाणी आणि बिल्व पत्रांनी विशेष पूजा केली जाते.

४. मंगळवारी इथे श्री मंगळांबिकांची पूजा करणे अतिशुभ मानलं जातं.

पूजा:

नियमित दैनंदिन पूजा तसेच प्रदोष पूजा केल्या जातात.

मंदिरात साजरे होणारे सण:

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
कार्थिगई (नोव्हेबंर-डिसेंबर): थिरुकार्थिगई
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री, मासीमाघम

मंदिराच्या वेळा: सकाळी ६.३० ते ११.३०, दुपारी ४.३० ते संध्याकाळी ७.३०

मंदिराचा पत्ता:

श्री सूक्ष्मपुरीश्वरर मंदिर
पुंथोट्टम मार्गे,
तालुका कूडवासल,
जिल्हा थिरुवारुर,
तामिळनाडू ६०९५०३

दूरध्वनी: +९१-४३६६२९१६४६

पुरोहिताचा संपर्क: श्री मुथूसुब्रह्मण्य गुरुकल +९१-९५८५१६०६६०

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

Thursday, February 26, 2026

Shri Sukshmapureeshwarar Temple at Chirugudi

This place is at a distance of 5 kms from Karakathi which is at a distance of 28 kms from Kumbhakonam on Kumbhakonam-Karaikkal route. It is about 9 kms from Peralam on Mayiladuthurai-Thivarur route. It is about 1 km from Thiruppampuram. This is a Padal Pethra Sthalam on southern bank of Kaveri revered by Shaiva Saint Sambandhar. The historical name of this place was Sukshmapuri / Sirupuri. The original temple existed before the seventh century. It was reconstructed as a stone structure by Chola king and the extensions were done by Vijayanagara kings and Maratha kings. There are stone inscriptions in the temple which give an account of endowments made by various kings. This place is considered to be the birthplace of Paanan who was a landlord and a friend of King Killivalavan. He was famous for his philanthropic activities. He is praised in the sangam literature Arananuru and Puranarur. This temple is at the center of four Padal Pethra Sthalam namely - on the east Thirupampuram, on the south Thiruveezhimali, on the west Anniyur and on the north Thirutherezhundur. 

Moolavar: Shri Sukshmapureeshwarar, Shri Managalanathar, Shri Chirugudeeshwarar,  Shri Kalyanasundareshwarar
Devi: Shri Mangalanayaki
Sacred Theertha: Mangala Theertha / Surya Theertha
Sacred Vruksha: Bilva

Kshetra Puran:

1. According to the Puran, Lord Shiva and Goddess Parvati were playing a game of dice. Suddenly Lord Shiva disappeared when Goddess Parvati was about to win. She was worried by his disappearance and started searching for him everywhere. She was unable to find him and finally she came to a place which was dense with bilva trees. She created a theertha named Mangala Theertha, made a Shiva Linga with a handful of sand and worshiped it. Pleased with her worship Lord Shiva appeared before her and took her back to Kailash. As Shiva Linga was made from handfuls of sand it was known as Sirupidi (handful in Tamil). This got corrupted to Sirukudi and later to Chirugudi. The handprints are visible on the Shiva Linga even now. As Lord Shiva appeared suddenly, he was praised as Shri Sukshmapureeshwarar. As the sacred theertha was made by Goddess Parvati, it is praised as Mangala Theertha. Goddess Parvati is praised as Shri Mangala Nayaki.

2. According to the Sthala Puran, Pandya King Koonpandiyan who was ruling Madurai, came under the influence of Jain monks. The queen Mangayarkkarasiyar sought help from Shaiva Saint Sambandhar and Appar for getting the king back into Shaivism. Sambandhar accepted her request and decided to visit Madurai. They were staying at this place at that time. Appar felt that the time was not auspicious for the trip and advised Sambandhar to postpone it. Sambandhar was very young and stated that planets cannot do any harm to the devotees of Lord Shiva. Then he sang a sacred hymn (Pathigam in Tamil) to nullify the ill effects of the planets. He left for Madurai and reached there safely. He defeated the jain monks in the debate. He also cured the hunchback of the king and converted him into Shaivism. This is depicted in the Navagraha shrine where we come across Lord Vishnu, Lord Brahma and Sambandhar. 

3. Angaraka (planet Mars) worshiped Lord Shiva at this place and got rid of his curse. 

Those who worshiped here:

Lord Surya, Vishwarish, Gandharva, Goddess Parvati, Angaraka, Garuda, Shaiva Saints Appar and Sambandhar. 

Special features:

1. The procession idol of Shri Alingana Murti is very beautiful.

2. The Shiva Linga is made of sand and is covered by a kavach.

3. There are idols of Lord Vinayaka, Lord Bhairava and Shaiva Saint Sambandhar in a Navagraha shrine. Lord Shainishwarar and Lord Surya are near one another.

4. Sambandhar has sung Kolaru Pathigam at this place praising Goddess Parvati and Lord Shiva for seeking relief from adverse effects of planets.

5. According to this hymn those who worship Lord Shiva at this place will attain moksha and will reside in Lord Shiva’s abode.

6. This is a parihar sthala for Angaraka dosha.

About temple:

The main temple consists of Sanctum Sanctorum, Antarala, Ardhamandap and Mahamandap. This is an east facing temple with three tiered Rajagopuram having one prakaram. It is completely enclosed by a wall. There is no Dhwajastambha. The Balipeeth and Nandi are after Rajagopuram facing the sanctum. The Shiva Linga is a Swayambhu Linga of sand. It has the hand imprints on it presumed to be that of Goddess Parvati. The Shiva Linga is always kept covered with a kavach. No abhishekam is done for the Shiva Linga but Abhishekam is done for Avudayar. Only civet is applied to Shiva Linga once in a while. The Viman over the Sanctum is three tiered. 

Koshtha Murtis: Lord Vinayaka, Lord Dakshinamurti, Lord Mahavishnu, Lord Brahma, Lord Ardhanarishwarar. Lord Chandikeshwarar shrine is in its usual position. 

Goddess Ambika is housed in a separate east facing shrine in the Mukhamandap to the left of Sanctum. She is in a standing posture with Abhaya and Varada mudra. Abhishek is performed to Goddess Parvati instead of the Shiva Linga. The Utsav Murti is Santosha Alingan Murti i.e. Lord Shiva embracing Goddess Parvati in a joyful mood. 

Other shrines:

In the mukha mandap there is a Navagraha shrine. Shaiva Saint Sambandhar, Lord Nardana Vinayaka, Lord Bhairav are also in the Navagraha shrine. There are separate shrines for Lord Angaraka (Mangal), Lord Mangala Vinayaka, Lord Subramanya with Valli and Deivanai, Lord Surya and Lord Shanishwarar

Prayers:

1. This temple is a parihar sthala for Angaraka dosha. Those who are having adverse effects of planet Mars get relief by worshiping at this place. 

2. Devotees worship here to overcome the obstacles in marriage and for other illnesses. People worship at  this place for the reunion of couples. 

3. It is stated that worshiping the planet Mars on Tuesdays in the Tamil month of Masi is beneficial for reunion of estranged couples and for removal of marriage obstacles. At that time special poojas are held with bilva leaves and teertha from the sacred teertha. 

4. Worship of Goddess Mangalambika on Tuesdays is considered to be very very auspicious. 

Poojas:

Pradosha pooja and other daily rituals are conducted.

Festivals:

Avani (Aug-Sept): Ganesh chaturthi
Karthigai (Nov-Dec): Thiru Karthigai
Margazhi (Dec-Jan): Thiruvathirai
Masi (Feb-March): Mahashivaratri, Masi Magham

Timing: 6.30 am to 11.30 am, 4.30 pm to 7.30 pm

Address:

Sri Sukshmapureeswarar Temple,
Chirugudi,
At post Sarabhoji Rajapuram,
Via Poomthotam,
Taluka Kudavasal,
District Thiruvarur,
Tamil Nadu 609503

Phone: +91-4366291646

Contact number of priest: Shri Muthusubramanya Gurukal +91-9585160660 

Courtesy: Various websites and blogs

Sunday, February 22, 2026

थिरुपांपूरं येथील श्री शेषपुरीश्वरर / श्री पांपूनाथर मंदिर

हे शिव मंदिर कुंभकोणम-कारैक्कल मार्गावर कुंभकोणम पासून ३० किलोमीटर्स वर असलेल्या थिरुपांपूरं ह्या गावात वसले आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत अप्पर आणि संबंधर ह्यांनी आपल्या काव्यांमध्ये इथल्या भगवान शिवांची स्तुती गायली आहे. हे मंदिर चोळा साम्राज्याच्या राजांनी ६व्या शतकाच्याही आधी बांधलं असावं. वर्तमान बांधकाम साधारण १३०० वर्षे जुनं आहे. इथे २८ शिलालेख आहेत ज्यामध्ये चोळा, पांड्या आणि मराठा राजांनी मंदिरासाठी केलेल्या कामाचे तसेच त्यांनी दिलेल्या देणग्यांचे उल्लेख आहेत.

मूलवर: श्री शेषपुरीश्वरर, श्री पाम्बीसर, श्री पांपुरेश्वरर (तामिळ मध्ये पांपु म्हणजे नाग किंवा साप)
देवी: श्री ब्रम्हाम्बिका, श्री मामलयत्ति, श्री वंदूपुंकुळली
क्षेत्र वृक्ष: शमी वृक्ष
पवित्र तीर्थ: आदिशेष तीर्थ, नाग तीर्थ
पुराणिक नाव: शेषपुरी, थिरुपांपूरं, पम्पारनंनगर

क्षेत्र पुराण:

१. अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, शंखपाल, कुलीग, पद्म, महापद्म हे अष्टनाग आहेत. एकदा भगवान विष्णू भगवान शिवांची पूजा करत असताना भगवान शिवांच्या गळ्यातील वासुकी नागाच्या मनात अभिमान जागृत झाला. त्याला असं वाटलं भगवान विष्णू त्याची पण पूजा करत आहेत. भगवान शिवांना ह्याची जाणीव झाली आणि त्यांनी सर्व नागांना शाप दिला कि त्यांची विषशक्ती लोप पावेल. तेव्हा अष्टनाग भगवान शिवांकडे आले आणि त्यांनी विनंती केली कि केवळ एका नागाच्या चुकीमुळे सर्व नागांना त्याचा परिणाम भोगायला लागू नये. त्यांनी भगवान शिवांना ह्या शापाचं विमोचन करण्यासाठी उपाय विचारला. भगवान शिवांनी त्यांना पृथ्वीवर जाऊन महाशिवरात्रीच्या रात्री चार प्रहारांमध्ये चार ठिकाणी - कुंभकोणम, थिरुनागेश्वरम, थिरुपांपूरं आणि नागोर - पूजा करण्याचा सल्ला दिला. आदिशेषांच्या नेतृत्वाखाली हे अष्टनाग पृथ्वीवर आले आणि त्यांनी भगवान शिवांच्या आज्ञेनुसार भगवान शिवांची चार ठिकाणी पूजा करून शापापासून मुक्ती मिळविली. आदिशेषांनीं श्री शेषपुरिश्वरांची महाशिवरात्रीच्या रात्री तिसऱ्या प्रहरामध्ये पूजा केली. त्या रात्री पूजा करण्यासाठी फुले उपलब्ध नव्हती म्हणून त्यांनी वडाच्या झाडाला अगस्तीची फुले बांधून त्याची पूजा केली. असा समज आहे की अष्टनागांनी दर महाशिवरात्रीला इथे पूजा केली. इथल्या स्थानिक लोकांच्या समजूतीनुसार अगस्ती फुले हि परत फुलत नाहीत आणि वडाच्या झाडाची देठे जमिनीला टेकत नाहीत आणि ह्या काळात ते आधार देतात.

२. असा समज आहे की गंगादेवी तुला ह्या तामिळ महिन्यामध्ये इथे आल्या आणि त्यांनी कार्थिगई महिन्यामध्ये कुंभकोणम इथे येऊन महामागम तीर्थामध्ये स्नान केलं. गंगेमध्ये सर्वजण आपली पापे धुवायला स्नान करतात जी अर्थातच गंगादेवी आपल्यामध्ये शोषून घेतात. म्हणून गंगादेवींनी इथे स्नान केल्यामुळे त्यांनी शोषून घेतलेल्या पापांचं क्षालन झालं.

३. दक्ष राजाने भगवान शिवांचा अपमान केल्याने वीरभद्रांनी त्याचा शिरच्छेद केला. पार्वती देवींच्या विनंतीवरून भगवान शिवांनी दक्षाच्या शरीराला मेंढीचे शीर लावून त्याला सजीव केलं. इथल्या स्थळ पुराणानुसार मेंढीचे शीर असलेला दक्ष राजा इथे आला आणि भगवान शिवांची पूजा केली ज्यामुळे त्याच्या पापांचे क्षालन झाले.

४. कोचेंगट चोळा राजाला रक्ताचा कर्करोग झाला होता. त्याने इथे येऊन इथल्या पवित्र तीर्थामध्ये स्नान केलं आणि भगवान शिवांची पूजा केली ज्यामुळे तो बरा झाला.

५. एका आधीच्या ब्लॉगमध्ये आम्ही आदिशेष आणि वायुदेव ह्यांच्यामधल्या द्वंद्वाबद्द्ल उल्लेख केला होता. त्यांच्या द्वंद्वामुळे सर्व देव त्रासले होते. शेवटी इंद्रदेवांच्या नेतृत्वाखाली सर्व देव आदिशेषांकडे आले आणि त्यांनी त्यांना हे द्वंद्व थांबविण्यासाठी मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण वायुदेवांनी द्वंद्व चालूच ठेवलं. भगवान शिवांना ह्याचा राग आला आणि त्यांनी दोघांना मेंढी होण्याचा शाप दिला. जेव्हा त्या दोघांनी भगवान शिवांकडे क्षमायाचना केली तेव्हा भगवान शिवांनी वायुदेवांना वैगाई नदीच्या उत्तरेला आणि मदुराईच्या पूर्वेला असलेल्या स्थळी तपश्चर्या करण्याची आज्ञा दिली. आदिशेषांना भगवान शिवांनी १२ वर्षे तपश्चर्या करण्याची आज्ञा दिली. आदिशेषांनी एक पवित्र तीर्थ निर्माण केलं आणि १२ वर्षे तपश्चर्या करून ते शापापासून मुक्त झाले. 

६. पुराणानुसार आदिशेष हे सर्व विश्वाचा भार आपल्या माथ्यावर घेतात. एकदा त्यांना हा भार सहन न होऊन ते आजारी पडले. भगवान शिवांना त्यांनी ह्यावर उपाय विचारला. भगवान शिवांनी त्यांना महाशिवरात्रीच्या रात्री कुंभकोणम येथील नागेश्वर मंदिरात तसेच इथल्या नागनाथर मंदिरामध्ये उपासना करण्याची आज्ञा दिली. तसे करून आदिशेष स्वस्थ झाले.

७. सुनीथन ह्या काशीच्या राजाला वशिष्ठ ऋषींनी स्वप्नांत येऊन ह्या स्थळी येऊन भगवान शिवांची पूजा करण्याची आज्ञा केली. त्या आज्ञेप्रमाणे पूजा करून सुनीथन अपस्मारापासून मुक्त झाला.

८. श्री ब्रह्मदेवांनी तिलोत्तमा ह्या स्वर्गीय अप्सरेला निर्माण केले. तिलोत्तमा श्री ब्रह्मदेव आपले पिता आहेत असे मानून त्यांच्याकडे गेली. पण ब्रह्मदेव तिच्यावर मोहित झाले. तिलोत्तमाने भगवान शिवांकडे धाव घेतली. भगवान शिवांनी श्री ब्रह्मदेवांना त्यांची सृष्टी निर्माण करण्याची शक्ती लोप पावेल असा शाप दिला. ऋषीमुनी आणि भगवान शिवांच्या सल्ल्याने श्री ब्रह्मदेव ह्या स्थळी आले. त्यांनी ब्रह्म तीर्थ निर्माण करून एक वर्ष इथे तपश्चर्या केली आणि ते शापापासून मुक्त झाले.

९. श्री इंद्रदेवानी गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिच्या बरोबर गैरवर्तन केले म्हणून गौतम ऋषींनी इंद्रदेवांना शाप दिला कि त्यांच्या शरीरावर १००० नेत्र निर्माण होतील. ह्या शापापासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी भगवान शिवांच्या आज्ञेवरून इंद्रदेव इथे आले आणि त्यांनी १२ वर्षे तपश्चर्या केली. भगवान शिवांनी शिवरात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये दर्शन दिलं आणि शापापासून मुक्त केलं.

१०. एकदा खेळीमेळीच्या मनःस्थितीमध्ये श्री उमादेवींनी भगवान शिवांच्या डोळ्यावर आपले हात ठेवून ते बंद केले. त्यामुळे सर्व विश्वामध्ये अंधार झाला आणि विश्वातलं सर्व जीवन थांबलं. ह्या कृत्याबद्दल भगवान शिवांनी उमादेवींना त्यांच्यापासून विभक्त व्हायला सांगितलं. ह्या चुकीचा परिहार करण्यासाठी भगवान शिवांनी उमादेवींना ह्या स्थळी येऊन १२ वर्षे तपश्चर्या करण्याची आज्ञा केली. उमादेवींनी इथे १२ वर्षे तपश्चर्या केली. आणि भगवान शिवांनी त्यांना शिवरात्रीच्या चौथ्या प्रहरी दर्शन दिलं आणि शापापासून मुक्त केलं. 

११. एकदा कैलासावर अगस्त्य ऋषी आणि इतर ऋषी ह्यांच्यामध्ये तामिळ आणि संस्कृत ह्यामध्ये श्रेष्ठ भाषा कुठली ह्यावर वाद उठला. अगस्त्य ऋषींचं दोन्ही भाषा समान पातळीवर आहेत असं मत होतं. पण इतर ऋषींना ते मान्य नव्हतं म्हणून त्यांनी अगस्त्य ऋषींना मूक होण्याचा शाप दिला. भगवान शिव आणि भगवान विष्णू हे दोघेही अगस्त्य ऋषींशी सहमत होते पण त्यांनी ह्या वादामध्ये हस्तक्षेप केला नाही. अगस्त्य ऋषींनी भगवान शिवांकडे प्रार्थना केली. भगवान शिवांनी अगस्त्य ऋषींना त्यांची एक वर्ष सेवा करण्याची आज्ञा दिली. अगस्त्य ऋषी इथे आले आणि त्यांनी एक वर्ष भगवान शिवांची सेवा केली. महाशिवरात्रीच्या पहिल्या प्रहरी भगवान शिवांनी अगस्त्य ऋषींना दर्शन दिलं आणि त्यांची गेलेली वाचा त्यांना परत दिली. भगवान शिवांनी त्यांना पोडिगाई टेकडीवर जायला सांगितलं आणि तामिळ भाषेचा प्रसार करायची आज्ञा दिली.

१२. अग्निदेवांनी दक्ष यज्ञामध्ये सहभाग घेतला म्हणून वीरभद्रांनी त्यांना शिक्षा दिली. वीरभद्रांनी अग्निदेवांचे हात कापले आणि त्यांना लाथ मारली. अग्निदेवांनी भगवान शिवांकडे प्रार्थना केली. भगवान शिवांनी त्यांना इथे येऊन ३ वर्षे उपासना करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे उपासना करून अग्निदेव पूर्ववत झाले.

१३. एकदा सूर्यदेवांनी नैमिषारण्यामध्ये येऊन ऋषींकडे त्यांच्या तेजाचा स्रोत कुठे आहे ह्याची चौकशी केली. ऋषींनी त्यांना व्यासमुनींकडे पाठवले. व्यासमुनींनी सूर्यदेवांना इथे येऊन भगवान शिवांची उपासना करायला सांगितले. सूर्यदेव पहिल्यांदा काशीमध्ये गेले आणि तिथे त्यांनी गंगेमध्ये स्नान केलं. त्यानंतर त्यांनी मयीलादुथुराई येथे येऊन मयूरनाथर ह्यांची उपासना केली. त्यानंतर ते इथे आले आणि इथे त्यांनी १२ वर्षे रोज १००० फुले अर्पण करून भगवान शिवांची उपासना केली. १२ वर्षानंतर चित्राई ह्या तामिळ महिन्याच्या पौर्णिमेला भगवान शिवांनी त्यांना वरदान दिलं कि त्यांचं तेज अबाधित राहील.

१४. पुराणानुसार बृहस्पती ऋषी जेव्हा त्यांच्या आश्रमात नव्हते तेव्हा चंद्र देवांनी बृहस्पती ऋषींची पत्नी वनतारा हिच्याशी अवैधरित्या संबंध जोडला. ह्या संबंधातून त्यांना बुध हा पुत्र झाला. बृहस्पतींनी चंद्राला क्षयरोग जडेल अशा शाप दिला. इंद्रदेव आणि इतर देवांनीं बृहस्पतींकडे चंद्रदेवांना शापापासून मुक्ती कशी होईल हि विचारणा केल्यावर बृहस्पतींनी चंद्रदेवांना इथे येऊन भगवान शिवांची उपासना करण्याचा सल्ला दिला. चंद्रदेव इथे आले आणि त्यांनी १२ वर्षे दररोज १००० फुलांनी भगवान शिवांची उपासना केली. थै ह्या तामिळ महिन्याच्या पौर्णिमेला त्यांची शापातून मुक्ती झाली.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

श्री ब्रह्मदेव, श्री इंद्रदेव, श्री पार्वती देवी, अगस्त्य ऋषी, श्री चंद्रदेव, दक्ष राजा, श्री गंगादेवी, श्री सूर्यदेव, श्री अग्निदेव, सुनीथन, कोचेंगट चोळा राजा, आदिशेष इतर सात नागांसमवेत.

वैशिष्ट्ये:

१. इथे राहू आणि केतूची एकच शरीर असलेली मूर्ती आहे. ह्या मूर्तीमध्ये ते भगवान शिवांची हात जोडून पूजा करत आहेत. हे स्थळ राहू-केतू परिहार स्थळ आहे.

२. ह्या मंदिरामध्ये रविवारी आणि मंगळवारी सर्प हिंडताना दिसतात. असा समज आहे की ते भगवान शिवांची पूजा करण्यासाठी येतात. 

३. असा समज आहे की ह्या मंदिराची पुढील मंदिरांबरोबर एकत्रित पवित्रता आहे - थिरुनागेश्वरम, नागोर, किळपेरूमपल्लम (केतू देवाचे मंदिर), कालहस्ती, कुंभकोणम येथील नागनाथर. म्हणून पुराणानुसार हे स्थळ सर्व-दिशा-निवारण-स्थळ आहे.

४. हे बहुतेक एकच मंदिर आहे जिथे आदिशेषांची उत्सव मूर्ती आहे. 

५. इथे गाभाऱ्यामध्ये आदिशेष भगवान शिवांची पूजा करत आहेत हे दृश्य अद्वितीय आहे.

६. इथे श्री पार्वती देवींची मूर्ती भगवान शिवांच्या डावीकडे आहे. ही विवाह मुद्रा दर्शवते.

७. इथे अनेक लोकांनी मोठ्या सर्पांना कात टाकताना बघितले आहे. ह्या दाव्याला पाठिंबा देणारी छायाचित्रे इथे आहेत. उदाहरणार्थ २१ मार्च २००२ दिवशी ७.५ फूट लांब सर्पाने श्री पार्वती देवींच्या मूर्तीवर कात टाकली. २६ मे २००२ला ८.३ फूट लांब सापाने भगवान शिवांवर कात टाकली. ह्या गावामध्ये सर्पाच्या दंशाने कोणी मृत्यू पावल्याची कुठेही नोंद नाही.

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि ह्या मंदिराला तीन स्तरांचं राजगोपुर आहे आणि दोन परिक्रमा आहेत. इथे आणि राहू आणि केतूंची स्वतंत्र देवालये नाहीत. ते एकाच मूर्तीमध्ये आहेत आणि हात जोडून भगवान शिवांची प्रार्थना करत आहेत असे चित्रित केले आहे. त्यांचं एकच शरीर असल्याकारणाने हे राहूदोष आणि केतूदोष ह्या दोन्ही दोषांचे परिहार स्थळ आहे. ही मूर्ती मंदिराच्या ईशान्येला आहे. इथे एक पंचलिंग आहे जे भगवान शिवांच्या पांच मुखांचं प्रतीक आहे (ईशान, वामदेव, सद्योजात, तत्पुरुष, अघोर).

प्रवेशाजवळ थोडेसे विस्कळीत झालेले ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदी आहेत. ध्वजस्तंभाच्या पायाशी श्री विनायकांची मूर्ती आहे जिचे नाव श्री कोडीमार विनायक असे आहे. इथे थिरुमलै (कैलास ईश्वरर) ह्यांचे देवालय आहे. भगवान शिवांचे देवालय पूर्वाभिमुख आहे आणि गाभाऱ्यामध्ये गाभारा, अर्धमंडप आणि महामंडप आहे. इथले शिव लिंग छोटे आहे पण सुंदर आहे. गाभाऱ्यामध्ये आदिशेषांची उत्सव मूर्ती आहे ज्यामध्ये ते भगवान शिवांची पूजा करत आहेत. महामंडपामध्ये पुढील उत्सव मूर्ती आहेत - श्री नटराज, श्री सोमस्कंद, श्री मुरुगन ज्यांच्या हातामध्ये वज्र आणि भाला आहे. अर्धमंडपाच्या उत्तरेला श्री दुर्गादेवींचे देवालय आहे. गाभाऱ्याच्या तीन बाजू खंदकाने आच्छादलेल्या आहेत. 

कोष्ट मूर्ती: श्री गणेश, श्री दक्षिणामूर्ती आणि श्री दुर्गादेवी

ह्याशिवाय इथे बऱ्याच नागांच्या मूर्ती आहेत. 

श्री पार्वती देवींचे देवालय पूर्वाभिमुख असून भगवान शिवांच्या डाव्या बाजूला आहे. त्या आपल्या चार हातांनी भक्तांवर कृपावर्षाव करतात. त्यांच्या चार हातांमध्ये कमल, वरद मुद्रा, अभय मुद्रा आणि रुद्राक्ष माला आहे. 

इतर मूर्ती आणि देवालये:

माड कोविलमध्ये जशी रचना असते त्याचप्रमाणे इथे श्री दक्षिणामूर्ती कोष्टाच्या दक्षिण भागात आहेत. माड कोविल सारखच इथे पण पायऱ्या चढून श्री सट्टाईनाथर ह्यांचे दर्शन घ्यायला लागते. हि मूर्ती स्टुक्कोची आहे. श्री स्थळ विनायकांचे देवालय पश्चिम भागात आहे. त्यांना राजराजा पिल्लैयार असे संबोधले जाते. श्री सुब्रह्मण्य ह्यांच्या मूर्तीमध्ये त्यांच्यासमवेत त्यांच्या दोन पत्नी आहेत. श्री चंडिकेश्वरर आणि श्री दुर्गा देवी ह्यांच्या मूर्ती मंदिराच्या कोपऱ्यात आहेत. इथले क्षेत्र वृक्ष २५० वर्षे जुने आहे. ह्या वृक्षाखाली पांच फणे असलेले आदिशेष आहेत. तसेच ह्या वृक्षाखाली मोरावर आरूढ झालेले श्री मुरुगन ह्यांची मूर्ती आहे. वृक्षाच्या बुंध्यामध्ये श्री आदिपांपुरेश्वरर ह्यांची मूर्ती आहे जिला श्री वनेश्वरर असे पण संबोधले जाते. मंदिराच्या पूर्वेला पुढील मूर्ती आहेत - श्री भैरव, श्री सूर्य, श्री विष्णू, श्री ब्रह्म, पंचलिंगे, आदिशेष, राहू आणि केतू, श्री शनीश्वरर आणि शैव संत नालवर. 

१२व्या शतकापासून १९व्या शतकापर्यंतच्या अनेक मूर्ती इथे सुरक्षित ठेवल्या आहेत. त्यातील काही मूर्ती अशा आहेत - श्री विनायक (ज्यांना श्री कन्नी  विनायक असे संबोधले जाते), भगवान शिव आणि श्री पार्वती देवी, श्री नटराज, श्री सुब्रमण्य ह्यांच्या त्यांच्या पत्नींसमवेत दोन मूर्ती, भगवान शिवांची एक भव्य मूर्ती ज्यामध्ये ते उभ्या मुद्रेमध्ये आहेत आणि असूरसंहार करत आहेत, पालीयारै (शयनगृह) चोक्कर, श्री चंडिकेश्वरर, शैव संत नालवर, श्री योगशक्ती अंबिका, श्री चोळादेवर, श्री मरी अम्मन, श्री चेल्लीअम्मन, श्री आदिपांपुरेश्वरर आणि श्री सोमस्कंदर. ह्या सगळ्या मूर्ती महामंडपामध्ये आहेत.

प्रार्थना:

१. भाविक जन इथे पुढील दोषांच्या परिहारासाठी प्रार्थना करतात - कालसर्पदोष, राहूकेतूदोष, कलत्र दोष, पुत्रदोष, विवाहातल्या अडचणी, कळत नकळत घडलेले सर्पहत्या दोष. जेव्हा सर्प हे वारंवार स्वप्नात येतात तेव्हा संध्याकाळी पांच च्या आत विशेष पूजा करतात.

२. भाविक जन इथे पुढील काळांमध्ये पूजा करतात -  राहूमहादशा (१८ वर्षे), केतूमहादशा (७ वर्षे), लग्न राशीपासून दुसऱ्या किंवा आठव्या घरात राहू आणि केतू असताना आणि राहू आणि केतूची अंतर्दशा चालू असताना.

३. शांती आणि समृद्धीसाठी भाविक जन इथे भगवान शिव आणि श्री पार्वतीदेवींची पूजा करतात.

पूजा:

दररोज चार पूजा होतात. राहू आणि केतूच्या देवालयामध्ये राहुकाळामध्ये पूजा केली जाते. राहू आणि केतू एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जात असताना विशेष पूजा केली जाते. ह्याशिवाय नियमित प्रदोष पूजा, पौर्णिमा आणि अमावास्येच्या दिवशी पूजा केल्या जातात.

मंदिरामध्ये साजरे होणारे सण:

चित्राई महिन्यापासून पंगूनी महिन्यापर्यंत सर्व उत्सव इथे साजरे होतात - मुख्यत्त्वेकरून मासी महिन्यात मासीमाघम आणि महाशिवरात्री, मारगळी महिन्यात अरुद्रदर्शन. 

मंदिराच्या वेळा: सकाळी ७.३० ते दुपारी १२.३०, दुपारी ४ ते रात्री ८

मंदिराचा पत्ता:

श्री शेषपुरीश्वरर / श्री पांपूरेश्वरर मंदिर,
थिरुपांपूरं,
तालुका: कूडवासल,
जिल्हा: थिरुवारुर
तामिळनाडू ६१२२०३

दूरध्वनी: +९१-४३५२४६९५५५, +९१-९४४३९४३६६५, +९१-९४४३०४७३०२, +९१-९९४३८४८१०७   

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.