Friday, May 26, 2017

Ballaleshwar - fifth incarnation of Lord Vinayaka

अवतार पांचवा - बल्लाळेश्वर (तसेच मयुरेश्वर) - अध्याय १३ ते १६

यात शंखासूर दैत्य व कमलासूर दैत्य यांनी वेदादि ग्रंथ नष्ट करून विद्येचा लोप केला. त्यावेळी विनायकाने दशभुज रूप धारण करून कमलासुराशी युद्ध करून त्याचा वध केला. मयुरेश्वर क्षेत्राची स्थापना केली (मोरगाव).

दिव्य भीमकाय शरीर, दहा बाहु, भयानक रूप, पाश, अंकुश, परशु, कमळ, चक्र ही आयुधे उजव्या हातात, तर गदा, खङग, त्रिशूल, तोमर, डमरू ही आयुधे डाव्या हातात असे त्याचे स्वरूप आहे.

एकदा ब्रह्मदेव तपश्चर्येत मग्न असतांना शंखासूर दैत्य अचानक तेथे आला व त्याचे वेद, शास्त्रे, पुराण ग्रंथ त्याने चोरून नेले व सागरात ठेवले. ध्यान संपल्यावर ब्रह्मदेवांना जेव्हां हे समजले तेव्हा त्यांना फार दुःख झाले. हे शंखासुराचे कृत्य आहे हे त्यांना कळले. ते चिंतेत पडले. वेदशास्त्र पठण व ब्राह्मणांची नित्यनैमित्तिक कर्मे बंद झाली. ब्रह्मदेव क्षीरसागरी विष्णूंकडे गेले. तेथे श्री विष्णूंना योगनिद्रेत पाहून ते ही समस्या घेऊन कैलास पर्वतावर गेले. तेथे श्रीशंकरांना साष्टांग नमस्कार करून सर्व वृत्तांत सांगितला. श्री शंकर म्हणाले "योगनिद्रेतून बाहेर आल्यावर श्री विष्णू शंखासुराला मारतील व कमलासूराला मारण्यासाठी विनायक अवतार घेतील."

श्री ब्रह्मदेव स्वस्थानी परत गेले व ओंकाराचा एकाक्षरी मंत्र जपून त्यांनी विनायकास प्रसन्न करून घेतले. विनायकाने चारी वेद शास्त्रे पुराणे चोरणाऱ्या शंखासुराचे कृत्य मला कळले असून, त्याच्या बंधूचा कमलासूराचा मी वध करीन असे आश्वासन ब्रह्मदेवांना दिले. तसेच सर्व वेदादि ग्रंथ मी परत आणीन, ब्राह्मणांची नित्यनैमित्तिक कर्मे पूर्ववत सुरु होतील असे पाहीन व या करीता मी जो अवतार तो घेईन तो "मयुरेश्वर" या नावाने प्रसिद्ध होईल. असे बोलून विनायक अंतर्धान पावला.

पुढे विनायकाने स्वतःच्या मायेने पुन्हा वेदशास्त्रे पुराणे यांची निर्मिती केली. स्नान, संध्या, जप, हवन, स्वाध्याय, देवतार्चन, वैश्वदेव, अतिथीपूजन ही अष्टकर्मे लोप पावल्याने ब्राह्मण, ऋषी चिंतीत झाले होते. तोच त्यांच्या समोर विनायक ब्राह्मण रूपाने अत्यंत तेजस्वी रूप घेऊन उभा राहिला. त्याने त्यांची शास्त्रे पुराणे वेदादि ग्रंथ त्यांना परत केले व ब्राह्मणांना त्यांची नैमित्तिक कर्मे परत सुरु करण्यास सांगितले. ऋषी ब्राह्मणांस अत्यंत आनंद झाला. त्यांनी त्या बल्लाळास आसनावर बसवून त्याचे पूजन स्तवन केले. पृथ्वीवर परत सर्व कर्मे यथासांग सुरु झाली.

दूतांकरवी हे वर्तमान कमलासूराला काळातच तो क्रोधीत झाला व शंखासुराच्या आज्ञेने प्रचंड सैन्यासह घोड्यावर बसून बल्लाळास (ब्राह्मणास) मारण्यासाठी निघाला. हे वृत्त ऐकताच ऋषी मुनी संतत्प झाले व त्यांनी बल्लाळास हे वृत्त कळवले. बल्लाळाने त्यांना शांत केले व स्वतःच प्रचंड सैन्य निर्माण केले व स्वतः दहा बाहुंचे भीमकाय शरीर प्रकट केले. दहा हातात दहा आयुधे होती. बल्लाळास व त्याच्या सेनेस बघून कमलासूर सेना भयकंपित झाली पण कमलासूराने त्यांना धीर दिला. घनघोर युद्ध झाले. कमलासूराने सर्पास्त्र सोडून सर्व बल्लालसैन्यामध्ये हा:हा:कार माजवला. कित्येक जण विषाग्निने मेले. उरले ते भीतीने पळू लागले. स्वतःच्या सैन्याची अशी दशा बघून बल्लाळाने रागाने स्वतःच्या बाणाने एक चक्र सोडले. त्यातून असंख्य चक्रे निर्माण झाली व त्याचे दैत्यसैन्य कुणाचे शीर, कुणाचे हातपाय तुटून बरेच जण धारातीर्थी पडले. ते पाहून कमलासूराने गदायुद्धाचे आव्हान बल्लाळास दिले. परंतु कमलासुराचे देवापुढे काही चालेना. शेवटी त्याने रणातून पलायन केले. बल्लाळ आश्रमात परत आला. स्वतःचे इतके सैन्य रणांत पडलेले पाहून प्रथम त्यास फार वाईट वाटले, पण ऋषींच्या प्रार्थनेनुसार त्याने संजीवनी मंत्र जपून पुन्हा आपल्या सैन्यास नवनवीन दिले. ऋषींनी बल्लाळास हवन करण्यास सांगितले. यज्ञाची सांगता होताच त्यातून मयूर उत्पन्न झाला. त्या मयूरावर विनायक आरूढ होऊन कमलासूराचा वध करण्यासाठी निघाला. मयूरावर बसला म्हणून त्याला "मयुरेश्वर" नाव पडले. 

मयुरेश्वर-विनायक सिद्धी बुद्धीसहित रणांगणावर निघाला. बुद्धीने स्वतः कमलासूराला माशीसारखा मारीन, मला आज्ञा द्या अशी विनायकास प्रार्थना केली. विनायकाने आनंदाने ते मान्य केले.  बुद्धी भयंकर देह धारण करून व मायेने प्रचंड सैन्य निर्माण करून ती रणांगणावर पोहोचली. पण कमलासूर व त्याच्या सैन्यापुढे तिचा टिकाव लागेना. तिने पुन्हा सैन्य निर्माण केले. पण तेही पराजित होऊ लागले. शेवटी बुद्धीने "लाभ" नामक मानसपुत्र निर्माण केला. तो धनुर्विद्या निपुण होता. बुद्धीला विचारून ऋषींच्या आश्रमात जाऊन मयूरावर आरूढ झालेल्या आपल्या पित्याचे विनायकाचे दर्शन घेऊन तो युद्धास निघाला. 

तो कोवळा कुमार पाहून कमलासूर प्रथम उपहासाने हसला व त्याला स्वगृही परत जाण्यास, पण तोपर्यंत लाभाने कमलासुराचे असंख्य सैनिक मारले. कमलासूराने मोहिनी अस्त्राचा मंत्र जपून लाभाच्या सैन्याला मोहनिद्रेत नेले. एकटा लाभ व विनायक सोडून सर्व सैन्य मोहनिद्रेत गेले. विनायकानेही लाभाची परीक्षा घेण्यासाठी मोहनिद्रेत गेल्याचे नाटक केले. लाभ शोकाकुल झाला. पण त्याला हे संकट दूर करण्याची युक्ती आठवली. त्याने मोहिनीअस्त्राचा संहार करणारा मंत्र जपून मोहनिद्रेत गेलेल्या सैन्यास उठवले. पण विनायक काही उठला नाही. ते पाहून लाभ अत्यंत दुःखी झाला व त्याने आत्मदहन करण्याचे ठरवले. त्याने सैनिकांकडून लगेच काष्ठे जाणवली व त्यास अग्नी लावून चितेत उडी मारणार तोच विनायकाने आपले नाटक संपवून लाभास आवरले. लाभाला अत्यंत आनंद झाला. नंतर विनायक मयूरावर बसून प्रचंड सैन्यासह परत कमलासुरावर चाल करून गेला. 

विनायकाने विशाल रूप धारण केले. त्याचे मस्तक आकाशापर्यंत उंच पोहोचले. ते पाहून कमलासूराने त्याची निर्भत्सना करण्यास सुरुवात केली. तेव्हा क्रोधीत होऊन विनायक म्हणाला "एका नेत्रकटाक्षात पूर्ण त्रैलोक्याचा मी संहार करीन. तुझ्यासारखे दैत्य मरण्यासाठीच माझा अवतार झाला आहे." दोघांत घनघोर युद्ध झाले. कमलासूर देवासमोर उभा न राहता सैन्यात शिरला व बाणाने अनेक शूरवीर मारले. ते पाहून लाभ धावून आला व कमलासुरावर मुष्टिप्रहार केला. कमलासूराने आकाशात उड्डाण केले व शुक्राचार्यांनी दिलेला मंत्र जपून योगसामर्थ्याने आकाशातच राहिला. तेथून त्याने बाणांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. विनायकाने पाश टाकून कमलासूरास आपल्यासमोर आणले. दैत्याने केलेल्या गदेचा प्रहार मोडून काढत त्याने कमलासुरावर अमोघ शास्त्रे सोडली व त्यास मारले. पण जेथे जेथे कमलासुराचे रक्त सांडे तेथे तेथे परत प्रति कमलासूर उत्पन्न होई. ते पाहून देवाच्या साहाय्यासाठी सिद्धी बुद्धी त्वरित धावून आल्या. त्यांनी आपल्या सामर्थ्याने दहा हजार किरात निर्माण केले व शत्रुसैन्यावर सोडले. शत्रुसैन्यात हा:हा:कार माजला. ते सैरावरा पळू लागले. सिद्धीबुद्धीने नवकोटी भूतगण निर्माण केले व दैत्यसैन्यास भक्षिण्यास सांगितले. भूतगण दैत्यसैन्यास भक्षू लागले. त्यांनी  प्रति कमलासुरांचेही भक्षण करण्यास सुरुवात केली. रणांगण पूर्ण रिकामे झाले. कमलासूराचा रक्तबिंदू पडतांना दिसताच तो जमिनीवर पडण्याआधीच भूतगणाने वरच्यावर चारण्यास सुरुवात केली. शेवटी एकटा कमलासूर रणांगणात उरला. तरीही त्याने धीर सोडला नाही. दोघांत घनघोर युद्ध झाले. सरतेशेवटी विनायकाने त्रिशुळाने आघात करून कमलासुराच्या देहाचे तीन तुकडे केले. जेथे कमलासुराचे शीर पडले तेथे विनायकाने आपले क्षेत्र निर्माण केले. 

कमलासूराचा वध झालेला पाहून सर्व देवांना आनंद झाला. सर्व देवादिकांनी विनायकाची पूजा केली. पूजा करीत असताना नकळत ब्रह्मदेवाचा कमंडलू कलंडला व तेथे नदी निर्माण झाली. तिला कमंडलू तीर्थ म्हणतात. 

ते स्थान त्या दिवसापासून "मोरगाव" क्षेत्र म्हणून विख्यात झाले व विनायक मयुरेश्वर नांवाने प्रसिद्ध झाला. 

Friday, May 19, 2017

Vighneshwar - fourth incarnation of Lord Vinayaka

अवतार चौथा - विघ्नेश्वर - अध्याय ११ व १२ - श्री विनायक विजय

या अध्यायात विनायकाने विघ्नासुराचा पराभव केला. त्याने प्रार्थना केल्याने देवाने विघ्नराज हे धारण केले. मूषक हे वाहन आरोहणासाठी घेतल्याने "मूषकवाहन" नांव पडले.

चतुर्भुज, पाश, अंकुश, परशु, कमल ही आयुधे धारण केलेला, मूषकावर आरूढ झालेला असे विनायकाचे या अवतारात स्वरूप आहे.

पूर्वी हिमालयात सौभरी नांवाचे ऋषी रहात होते. त्यांच्या भार्येचे नांव सुशीलमति. ते दोघेही कंदमुळे व शेतातील एकेक दाणा जमवून त्यावर उदरनिर्वाह करीत. एके दिवशी एक गंधर्व त्यांच्या पर्णकुटीत आला. ऋषीपत्नी सुशीलमतिला पाहून तो मोहित झाला व तिला आपल्याबरोबर चलण्याविषयी बोलू लागला. सुशीलमतिने क्रोधाने म्हटले "माझा हात सोड नाहीतर मी तुला शाप देईन". तेवढ्यात सौभरीं ऋषीही तेथे आले व क्रोधीत होऊन "तू मूषकरूप होशील" असा शाप दिला. गंधर्वाने शापवाणी ऐकताच तो घाबरला व उ:शाप मागू लागला. ऋषींना दया आली व त्याला उ:शाप दिला "तू पार्श्वाश्रमाजवळ राहशील व जेव्हां परमात्मा विनायक अवतार घेईल तेव्हां नित्य त्यांच्या चरणाजवळ वास करशील!". उ:शाप मिळवून गंधर्वाने प्रयाण केले व ऋषी भार्येसह आश्रमात परतले.

एकदा स्वर्गात नारद इंद्राला भेटायला इंद्रसभेत आले. त्यांनी इंद्राला सांगितले "भूतलावर अभिनंदन नावाचा राजा आहे. त्याने ब्राह्मणांना यज्ञयागात इंद्राला हविर्भाग देऊ नका असे सांगितले आहे." हे ऐकताच इंद्राला राग आला व त्याने काळशक्तीला आवाहन केले. तिच्या साहाय्याने त्याने विघ्नदैत्य निर्माण केला. विघ्नदैत्याने भूतलावर यज्ञयागाचा विध्वंस करण्यास सुरुवात केली. ब्राह्मण त्रासले व सर्व मिळून जगन्नाथाला शरण गेले. त्याची प्रार्थना केली. स्तुती केली. ते ऐकून देव प्रकट झाला व वरेण्य राजाच्या घरी अवतार घेऊन मी विघ्नदैत्याचा नाश करीन असे त्याने सांगितले" अशी अभयवाणी ऐकताच ब्राह्मण निश्चिन्त झाले.

विनायकाने वरेण्यराजाच्या घरी पुष्पिका राणीच्या पोटी जन्म घेतला. जन्मताच गजवदन असलेली व चतुर्भुज, सुनयन असलेली बालमूर्ती पाहताच पुष्पिका राणी घाबरली व तिने रडत रडत राजाला बोलावले. असे विचित्र बालक पाहताच राजाही घाबरला व त्याने बालकाला अरिष्ट समजून सैनिकांना सरोवरात सोडून देण्यास सांगितले. सैनिकांनी बालकास पाण्यात सोडून दिले. दुसरे दिवशी पार्श्वमुनी तळ्यावर स्नानास गेले असतांना त्यांना ते विचित्र बालक दिसले.  पार्श्वमुनी प्रथम भयचकीत झाले पण नंतर सावध होऊन स्वतःशीच विचार करू लागले "कुणी अभाग्याने अरिष्ट समजून हे बालक या सरोवरात सोडून दिले खरे, पण मला मात्र हे जपतपाचे फळ द्यायला आलेले सुखदायक बालक वाटते आहे. असं वाटत आहे की अधर्माचा नाश करून धर्मस्थापनेसाठी परमात्म्यानेच अवतार घेतला आहे." ऋषींनी बालक आश्रमात नेऊन आपल्या पत्नीला दीपवत्सेला दाखवला. ती म्हणाली "हा बालक सूर्यासारखा तेजस्वी आहे. आपल्या तपाचे फळ देण्यासाठी प्रत्यक्ष विनायकच अवतरला आहे." पुत्रजन्माचा सोहळाच त्या दोघांनी अनुभवला.

विनायक त्या आश्रमातच वाढू लागला. इकडे सौभरीऋषींच्या शापाने तो गंधर्व तत्काळ मूषक झाला व पार्श्वमुनींच्या आश्रमात येऊन गुप्त रूपाने राहिला. त्याने आपल्या दातांनी जागोजागी खणले. यज्ञवेदिकेत बिळे केली. कुरतडून वृक्षही पाडले. यज्ञपात्रे चावून चावून खराब केली. या उपद्रवांनी पार्श्वमुनी त्रस्त झाले. विनायक जवळच खेळत होता. त्याने जवळच्या पाशाने मूषकाला जवळ ओढून आणले. मूषकाने विनायकाला मिळालेल्या शापाबद्दल व उ:शापाबद्दलही सांगितले व त्याच्या चरणांजवळ जागा मागितली. विनायकाने मूषकाला आनंदाने आपले वाहन म्हणून स्वीकारले व त्याच्यावर आरूढ झाला. पार्श्वमुनी विनायकाच्या या लीलेने आश्चर्यचकित झाले. विनायकाने विघ्नासुराचा वध करून, अधर्माचा नाश करून, धर्मस्थापनेचे कार्य करून देवांना सुखी करीन असे आश्वासन दिले.

पृथ्वीवरचे ब्राह्मण, ऋषी विघ्नासुराच्या त्रासाने भयभीत होऊन ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने "पार्श्वमुनींच्या आश्रमातील विनायक या विघ्नासुराचा वध करील" असे सांगितले.

सर्व ब्राह्मण ऋषी विनायकाच्या दर्शनाकरिता व पार्श्वमुनींना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेले. सर्व वेदतुल्य ऋषी, ब्राह्मण एकत्र आलेले पाहून पार्श्वमुनींना आनंद झाला. त्यांचा योग्य तो आदरसत्कार करून त्यांनी सर्वांना एकत्र येण्याचे कारण विचारले. तितक्यात विनायकही तेथे आला. ऋषींनी येण्याचे कारण सांगितले व विघ्नासुराचा नाश करण्यास विनायकास विनविले. चतुर्भुज विनायक मूर्ती चारही हातात आयुधे घेऊन, मूषकावर आरूढ होऊन ब्राह्मणांसमवेत निघाली.

विनायकाने ब्राह्मणांना युद्ध पाहण्यास सांगून विघ्नासुरावर आपला अंकुश सोडला. तो अंकुश त्याच्या कंठाला लागून तो विनायकाजवळ खेचला गेला. त्याचे अक्राळविक्राळ रूप, भयानक दात-दाढा, लोंबणारी लांब लाल जिव्हा पाहून ऋषी चकीतच झाले.

तोच विघ्नासुराने जलरूप होऊन सर्व त्रैलोक्य व्यापले. विनायकाने ते सर्व जल प्राशन केले. विघ्नासुराने पक्ष्याचे रूप घेतले तर विनायकाने त्याच्यावर कमल सोडले. विघ्नासुराने अग्नीचे रूप घेऊन ब्रह्माण्ड जाळण्यास सुरुवात केली तो विनायकाने मेघ वर्षवून अग्नीस शांत केले. विघ्नासुराने वायूचे रूप घेऊन मेघांना पळवून लावले तर विनायकाने वायूस अडवण्यासाठी पर्वत निर्माण केले. दैत्य वज्ररूप झाला व त्याने सर्व पर्वतांचे चूर्ण केले. विनायकाने निर्वाणशक्ती सोडली. ती भक्षिण्यासाठी दैत्याने आपले मुख पसरले. ती सूर्यासारखी तेजस्वी क्रूर शक्ती पाहून दैत्याने आपले नेत्र झाकले व त्याचा सर्व गर्व उतरला. तो विनायकास शरण आला व त्याची स्तुती करू लागला. त्याची क्षमा मागू लागला. दैत्याची स्तुती ऐकून विनायकास संतोष झाला. तो म्हणाला "तूला मी ठार मारणार होतो, पण तू शरण आलास म्हणून मी तुला जीवदान देतो. परंतु माझे एक वचन तुला पाळले पाहिजे. जेथे जेथे माझे नामस्मरण चालू असेल, भक्तिभावाने पूजा होत असेल ते स्थान तू तत्काळ सोडले पाहिजेस" विघ्नासुराने मान्य करून विनायकास मागणे मागितले "तुझ्या नावाच्या आधी माझे नांव आले पाहिजे" विनायकाने त्याचे मागणे मान्य केले व विनायक "विघ्नेश्वर" या नांवाने ओळखला जाऊ लागला.

हे वर्तमान ऐकताच राजा वरेण्यही आपल्या पत्नीसह तेथे आला. विनायकाने त्यासही अनेक वर दिले. विघ्नेश्वराच्या नावाने विनायकाचा सर्वजण जयजयकार करीत असतानाच विनायक अंतर्धान पावला.

असा हा विनायकाचा विघ्नेश्वर अवतार अध्याय समाप्त! 

Thursday, May 11, 2017

Gajanan - third incarnation of Lord Vinayak

अवतार तिसरा - गजानन - अध्याय ७ ते १० - श्री विनायक विजय

या अवतारात विनायकाने सिंदुरासूराचा वध केला. शस्त्राने त्याला मरण नसल्यामुळे विनायकाने दोन्ही हातांनी धरून त्याचे मर्दन केले. पिळून त्याचे चूर्ण करून तो सिंदूर आपल्या सर्वांगाला लावला. तेव्हांपासून देवाला सिंदूर आवडू लागला.

शंकर पार्वतीच्या पुत्राला गजासुराचे मस्तक लावल्याने देवांनी व ऋषींनी गजानन नाव ठेवले. किरीट कुंडले धारण केलेला, पितांबर नेसलेला, चतुर्बाहु, दिव्य आयुधे धारण केलेला असे ह्या गजाननाचे स्वरूप आहे. जवळ सिद्धी बुद्धी आहेत. विराट रूप म्हणून "विकट" नाव. भव्य देह म्हणून "महाकाय". शंकराने प्रेमाने आपली चंद्रकला त्याच्या मस्तकावर ठेवली म्हणून "भालचंद्र" अशी नावे पडली. जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला!

एकदा ब्रह्मदेवांना जांभई आली. तेव्हां त्यांच्या मुखातून एक रक्तवर्णाचा, क्रूर चेहरा असलेला पुरुष बाहेर पडला. त्याच्या शरीराला येणाऱ्या सुगंधाने दाही दिशा व्यापल्या होत्या. ब्रह्मदेवाने आश्चर्याने विचारले "तू कोण? कुठून आलास?" त्या पुरुषाने उत्तर दिले "मी तुमचाच पुत्र आहे. तुमच्या मुखातून मी जन्म घेतला आहे. आता माझे नाव ठेवा व मला राहण्यासाठी उत्तम स्थान द्या. तुमच्या कृपेने माझा चरितार्थ मी स्वतः चालवीन."

ब्रह्मदेव म्हणाला "तुझे नांव सिंदूर. पृथ्वीवर हव्या त्या स्थानी तू रहा. तुला मी आणखी एक वर देतो. तुला शस्त्रास्त्रांपासून, विष्णू इंद्र आदी देवांपासून मृत्यूचे भय नाही. तू ज्याला मिठी मारशील त्याचे तात्काळ भस्म होईल!" सिंदुराला आनंद झाला. जे तपश्चर्येने व यज्ञ करूनही मिळायला अवघड असे दुर्लभ वर त्याला विनासायास मिळाले होते.

परत फिरताना त्याला दुर्बुद्धी सुचली व तो आपल्या वराची प्रचिती पाहण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला मिठी मारायला निघाला. ब्रह्मदेवाला आता वर दिल्याचा पश्चात्ताप झाला. तो क्रोधाने म्हणाला "तुझा संहार करण्यासाठी विनायक अवतार घेईल". या शापाने भयभीत न होता सिंदूर पुढे सरसावला. ब्रह्मदेव आपल्या आसनासहित वैकुंठमार्गाने श्री विष्णूंकडे निघाला. मागोमाग सिंदुरही गेला. ब्रह्मदेवाने सर्व वृत्तांत श्री विष्णूला कथन केला.  श्री विष्णू म्हणाले "तुम्ही जरी अविचाराने वर दिला तरी तो खोटा होंणार नाही. हा दैत्य सर्व त्रैलोक्याचा नाश करेल. जर विनायकाने अवतार घेतला तरच याचा नाश होईल." इतक्यात सिंदूर दैत्य तेथे पोहोचला व त्याने श्री विष्णू व ब्रह्मदेव यांना युद्धाचे आव्हान दिले. श्री विष्णू म्हणाले "मी सत्वापासून निर्माण झालो आहे. निर्गुण, निरिच्छ आहे. ब्रह्मदेव वेदशास्त्रसंपन्न आहेत. आम्हाला दोघांनाही युद्धात स्वारस्य नाही. तू श्री शंकरांकडे जाऊन त्यांना युद्धाचे आव्हान दे"

उन्मत्त असा तो सिंदूर दैत्य कैलासावर गेला. शिवमंदिरात पोहोचला. भस्म चर्चित, गजचर्म परिधान केलेली, हातात खट्वाङ्ग असलेली, जटेत गंगा असलेली चंद्रमौळी श्री शंकरांची ध्यानस्थ सुंदर मूर्ती बघून, सिंदूर दैत्याचे मन फिरले. त्याला वाटले त्याला मिठी मारण्यापेक्षा याच्या मांडीवर बसलेल्या पार्वतीलाच न्यावे. त्याने पार्वतीची वेणी ओढून तिला जबरदस्तीने घेऊन जाऊ लागला. भयभीत होऊन पार्वतीने आक्रोश केला. श्री शंकरांची कळवळून प्रार्थना केली पण श्री शंकर ध्यानातून जागे झाले नाहीत.

ध्यानातून जागे झाल्यावर शिवगणांनी श्री शंकरांना सर्व वृत्त सांगितले. अत्यंत क्रोधित होऊन श्री शंकर हातात डमरू व त्रिशूल घेऊन नंदीवर बसून सिंदूर दैत्याकडे निघाले. त्याने आपल्या डमरूचा प्रहार सिंदुरावर केला. सिंदूर क्षणभर थांबला व श्री शंकरांना मिठी मारायला निघाला, तितक्यात एक दिव्य ब्राह्मण दोघांमध्ये प्रकट झाला. तो ब्राह्मण सिंदुराला म्हणाला "तू माझ्या समक्ष शंकरांना जिंकलेस तर पार्वती तुझी झाली." बोलता बोलता ब्राह्मणाने गुप्त परशु सिंदुरासुरावर सोडला. तो लागताच सिंदुरासूर शक्तिहीन झाला. दिव्य ब्राह्मणाने म्हटले "सिंदुरासुरा आता प्राण वाचवायचे असतील तर सत्वर पलायन कर, नाहीतर श्री शंकरांच्या त्रिशुळाच्या आघाताने तू मरशील" ते ऐकून पार्वतीला सोडून देऊन, पण क्रोधाने सिंदूर दैत्य पृथ्वीवर परतला.

पार्वतीने ब्राह्मणाला विचारले "या दुष्टापासून मला सोडवलेत. आपण कोण आहात?" उत्तरादाखल ब्राह्मण आपल्या मूळ रूपात प्रकट झाला. पार्वती समोर सगुण रूपात विनायक प्रकट झाला. चतुर्भुज, किरीट कुंडले घातलेली, सिद्धी बुद्धी दोन बाजूस असलेली, सिंहावर आरूढ झालेली अशी विनायकाची मूर्ती बघताच पार्वतीला आनंद झाला. विनायक पार्वतीला म्हणाला "तुला दुःख देणाऱ्या सिंदूर दैत्याचा मी नाश करिन. त्याकरता मी तुझ्याच पोटी जन्म घेईन" हे बोलून विनायक अंतर्धान पावले.

इकडे सिंदुरासुराने सर्वांना त्रास देण्यास सुरुवात केली. कित्येकांना मिठी मारून भस्म केले. कित्येक ब्राह्मणांना जीवे मारले. कित्येक क्षत्रियांचा वध केला. कित्येकांचे पुत्र मारले. यज्ञयागांचा विध्वंस केला. देव ब्राह्मण संत संन्यासी, पृथ्वीवरील शूर राजे, कुणालाच सोडले नाही. शेवटी सर्व देवांनी विनायकाची प्रार्थना केली. विनायकाने पार्वतीच्या पोटी जन्म घेऊन सिंदुरासुराचा वध करेन असे आश्वासन दिले.

पार्वतीला डोहाळे लागले. दिवसेंदिवस गर्भ वाढू लागला. एकदा पृथ्वीवर रमणीय उपवनात जाऊन कांही दिवस राहावे असे वाटू लागले. तिने श्री शंकरांना सांगितले. दोघेही नदीवर बसून पृथ्वीवर आले. तिथले दाट, सुगंधी झाडांनी वेलींनी युक्त असे रमणीय पर्यळी उपवन त्यांना दिसले. त्यांनी आपल्या सर्व शिवगणांसह तिथेच मुक्काम करण्याचे ठरवले.

एकदा गजासुर नावाच्या श्री शंकरांच्या भक्ताने, जो हत्ती होता, त्याने पर्यळी उपवनात शिवगणांनी खास पार्वतीकरता उभारलेला मंडप आपल्या सोंडेने उध्वस्त केला. हा गजासुर गतजन्मात महेश नांवाचा राजा होता. अत्यंत देवभक्त, पुराणे ऐकणारा, जपजाप्य करणारा, असा त्रिभुवनात प्रख्यात होता. एकदा त्याच्या राजवाडयात देवगुरु बृहस्पती आले. त्यांची राजाने यथाविधी  पूजा केली. त्यांच्या पायावर स्वतःचे मस्तक ठेऊन त्यांना वंदन केले. बृहस्पतीने त्याच्या आदरातिथ्याने भारावून जात त्याला आशीर्वाद दिला "जे मस्तक माझ्या पायावर ठेवलेस ते मस्तक तिन्ही जगतात सर्व देव ऋषींना पूज्य होईल. पुढच्या जन्मी तू गजराजाच्या योनीत जन्माला येशील तेव्हां तुझे मस्तक छेदून स्वतः श्री शंकर तुला मुक्ती देतील. 

एकदा महेश राजाने मार्गाने जात असलेल्या नारदमुनींना वंदन केले नाही. तेव्हां रागावून नारदमुनींनी त्याला पुढच्या जन्मी तुझे मुख हत्तीचे होईल व शंकर तुला कैलासात नेतील असा शाप देऊन निघून गेले. 

पुढे महेश राजा मरण पावला व पर्यळी वनात गजमुखाने जन्मला. हत्तीचे मुख सोडल्यास देह नराचा होता. देव राक्षस गंधर्व कुणीच त्याच्या बरोबरीला नव्हते. असा हा गजासुर! त्याने मंडप तोडला. शिवगण त्याला पाहून भयभीत होऊन सैरावैरा पळू लागले. पार्वतीने हे श्री शंकरांना सांगताच श्री शंकरांनी क्रोधीत होऊन त्रिशुळाने त्याचे मस्तक छेदले. अंतःसमयी त्या गजासुराने "ॐ नमः शिवाय" म्हणून प्राण सोडला. 

श्री शंकर म्हणाले "मग मी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला मुक्ती दिली व त्याचे गजमुख माझ्या पूजास्थानी ठेवले. त्याचे चर्म मी स्वतः पांघरले. त्याचे चर्म पांघरले म्हणून माझे नांव महेश पडले."

इकडे सिंदुरासूर गर्वाने म्हणत होता "मला देव मनुष्य राक्षस यांपासून मृत्यू नाही." तोच आकाशवाणी झाली "मुर्खा तुझा वध करण्याकरता स्वतः परमात्मा विनायकाने पार्वतीच्या पोटी जन्म घेतला आहे. तिच्या उदरात त्याचा गर्भ वाढतो आहे." ते ऐकून क्रोधीत होऊन गर्भातच शत्रूचा नाश करण्यासाठी  तो कैलासावर गेला. तेथे कुणी नाही हे पाहून पर्यळी उपवनात आला. श्री शंकर व पार्वती निद्रिस्त होते हे पाहून तो वायुरूपाने पार्वतीच्या उदरात शिरला व नखाने गर्भाचे शिर तोडून बाहेर आला. ते शिर त्याने नर्मदेच्या कुंडात टाकले. त्यामुळे नर्मदेतील पाषाणही रक्तासारखे लाल झाले. सर्व लाल पाषाण नर्मदी गणपती म्हणून प्रसिद्ध झाले. तो दैत्य आपले काम करून गेला. पण निद्रावस्थेत असल्याने कुणाला काही कळले नाही. 

काही दिवस उलटल्यावर पार्वतीच्या इच्छेनुसार सर्व परत कैलासावर पोहोचले. नऊ मास भरल्यावर पार्वतीने एका बालकास जन्म दिला. पण ते बालक मस्तकविरहित होते. ते पाहून पार्वतीस अनावर शोक झाला व तिने शंकरांना बोलावले. श्री शंकरही दुःखाने व्याकुळ झाले व नंदीला बोलावून त्यांनी सर्व देवांना हे मस्तक विरहित बालक बघण्यास बोलावले. 

सर्व देव धावून आले. ते मस्तक विरहित बालक बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले. तेवढ्यात ते बालक बोलू लागले. "सिंदुरासुराचा वध करण्यासाठी मी पार्वतीच्या पोटी जन्म घेतला आहे." बृहस्पतीने त्याच्या मस्तकाविषयी विचारले असता विनायकाने बृहस्पतीस महेश राजाची आठवण दिली व श्री शंकरांच्या पूजास्थानीचे गजमुख लावण्यास सांगितले. आपले मस्तक सिंदुरासुरानेच कुणाच्याही नकळत गर्भावस्थेतच नखाने छेदले हेही सांगितले. 

नारदाने सांगितले "आम्ही कुणीच गजमुख लावण्याच्या योग्यतेचे नाही. केवळ आपल्या प्रभावानेच ते शक्य होईल." असे सांगितल्यावर काहीच क्षणात गजमुख धारण केलेले विनायक, चतुर्भुज अवतारात, सिद्धीबुद्धी सह प्रकट झाले. 

नारदांनी सिंदुरासुराकडे जाऊन त्याला तुझ्या शत्रूचा जन्म कैलासावर झाला आहे असे सांगितले. सिंदुरासूर क्रोधीत झाला व आपल्या शत्रूला मारण्यासाठी कैलासावर चाल करून गेला. विनायकाला बालरुपात पाहून "तू अंगणात खेळण्याऐवजी इथे कसा आलास?" असे विचारले. ते ऐकून विनायकाने महाकाय रूप प्रकट केले. ते पाहून सिंदुरासूर भयकंपित झाला. विनायकाने दोन्ही हातांनी सिंदुरासुराचे मर्दन केले व त्याच्या सर्व रक्तांगाचे चूर्ण करून आपल्या अंगास लावले. सर्व दिशांत सुगंध भरून राहिला. सर्व देव ऋषी यांना आनंद झाला. सर्वांनी विनायकाचे पूजन केले. तोच सर्वांदेखत गजानन अवतार धारण केलेला विनायक अंतर्धान पावला. असा हा गजानन अवतार अध्याय समाप्त! 

Thursday, April 13, 2017

Kapil Chintamani - second incarnation of Lord Vinayak

अवतार दुसरा - कपिल चिंतामणी - अध्याय २ ते ६ - विनायक विजय


या अवतारात श्री गणेशाने द्रविडदेशीचा राजा अभिजित व राणी गुणवती यांचा पुत्र गणदैत्य, ज्याने कपिल ऋषींच्या आश्रमातून त्यांचा चिंतामणी नावाचा रत्नमणी जबरदस्तीने हिरावून घेतला, त्याच्याशी युद्ध करून व त्याचा वध करून कपिलऋषींना त्यांचा चिंतामणी त्यांना परत आणून दिला. कपिलऋषींनी तोच चिंतामणी श्री गणेशाच्या कंठात घातला, म्हणून सर्व ऋषींनी त्याचे नाव चिंतामणी असे ठेवले.


या अवतारात श्री गणेश सिंहावर बसलेला, दिव्यवस्त्रे व अलंकार धारण केलेला, चतुर्भुज - चार हातात परशु, कमल, मोदक व गदा हि आयुधे धारण केलेला, असा आहे. कपिल मुनींच्या अनुष्ठानाने यज्ञकुंडातून प्रकट झाला म्हणून याचे नाव कपिल, असा हा कपिल चिंतामणी अवतार.


पूर्वी द्रविड देशात अभिजित नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या राणीचे नांव गुणवती. दोघेही धर्मशील, व्रती आणि दानशूर होते. राज्यात सुख, समृद्धी व समाधान होते. प्रजा सुखी होती. एकच दुःख होते. राजाला मुलबाळ नव्हते. विविध व्रते, दाने, होम हवन करूनही उपयोग झाला नाही. शेवटी तपाकरिता आपण अरण्यात जावे असा विचार करून प्रधानावर राज्य सोपवून राजाराणी बाहेर पडले. फिरता फिरता एका उपवनात एक शोभिवंत आश्रम त्यांनी पाहिला. तो वैशंपायन ऋषींचा आश्रम होता. राजाने त्यांना साष्टांग नमस्कार केला. वैशंपायन ऋषींनी अंतर्ज्ञानाने राजाचे दुःख जाणले व त्या दोघांना सिंधुतीरी जाऊन तिथल्या सरोवराकाठी हवन व जप करण्यास सांगितले. चार महिने व्रतस्थ राहून मग घरी जाण्यास सांगितले. वैशंपायन ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने सरोवराच्या तीरावर जप होम हवन केले. चार महिने दोघे व्रतस्थ राहिले. मध्यंतरीच्या काळात ब्रह्मदेव वासनांध होऊन आपल्याच कन्येच्या सरस्वतीच्या मागे लागला. पण नंतर त्याला पश्चात्ताप होऊन त्याने आपले दुर्वीर्य त्या सरोवराच्या पाण्यात टाकून दिले. योगायोगाने त्याच सरोवरतीरी राहणाऱ्या गुणवती राणीने ते पाणी प्यायले व तिला गर्भ राहिला. राजाला फार आनंद झाला. चार महिनेही पूर्ण झाले होते.  दोघेहीजण हर्षभरित होऊन नगरात परतले. नऊ मास पूर्ण झाल्यावर गुणवतीला पुत्र झाला. त्याचे नाव गण असे ठेवले. लहानपणापासूनच तो बलाढ्य होता. पूर्वसुकृतानुसार गणाला वनात जाऊन तपश्चर्या करावेसे वाटले. आई वडिलांची आज्ञा घेऊन तो घोर अरण्यात गेला. “ॐ नमः शिवाय” या पंचाक्षरी जपाने त्याने एकाग्रमनाने तपश्चर्येला प्रारंभ केला. दहा वर्षे एका पायावर उभे राहून व तितकीच वर्षे वायुभक्षण करून व तीस वर्षे केवळ पाणी पिऊन काढली. थंडी वारा ऊन पाऊस यांची पर्वा केली  नाही. गणाचे उग्रतप बघून इंद्राला आपलेच इंद्रपद जाईल अशी भीती वाटली व सर्व देव मिळून शिवशंकराला शरण गेले व त्यांना सर्व हकीकत निवेदन केली. शिवशंकर तप करणाऱ्या गणाजवळ गेले व संतुष्ट होऊन त्यास वर मागण्यास सांगितले. त्याने तुझी कृपादृष्टी माझ्यावर नेहमीच राहो असा वर मागितला. शंकराने तो वर तर दिलाच शिवाय तू त्रैलोक्यात विजयी होशील, तुला देवांकडून मरण येणार नाही असा वर देऊन शंकर अंतर्धान पावले. गणाला अत्यंत आनंद झाला. नगरात परत जाऊन त्याने आपल्या आईवडिलांना हे वृत्त सांगितले. अभिजित राजानेही आनंदून त्याच्यावर सर्व राज्यकारभार सोपविला. राजा होताच गण दैत्य उन्मत्त झाला. त्यात शंकराचे वरदान असल्याने तो स्वतःला अजेय समजू लागला. त्याने आपले सैन्य अपरिमित वाढविले. शस्त्रास्त्रांनी परिपूर्ण केले. त्याला कुणाचीच भीती वाटेनाशी झाली.


एकदा त्याने स्वर्गावर वारी करून इंद्रालाही हरवले व परत त्याला त्याचे इंद्रपद देऊन टाकले. दिवसेंदिवस गणदैत्य अहंकारी व उन्मत्त झाला. एकदा तो सैन्य घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला. तिथे त्याने कपिलमुनींचा आश्रम पाहिला. तो कपिलमुनींना भेटण्यास गेला. त्याने कपिलमुनींच्या कंठात दिव्य रत्नमणी पाहिला. त्या रत्नमणीच्या तेजाने सर्व आश्रम उजळला होता. त्या रत्नमणीचे नाव चिंतामणी असे होते. कपिलमुनींचे दर्शन घेऊन गणदैत्याने परत जाण्याची अनुज्ञा मागितली. कपिलमुनींनी मध्यान्ह समय असल्याने दैत्यराजाला जेऊन जाण्यास सांगितले. दैत्यराजाने आपले सैन्य बरोबर असल्याने सैन्याला उपाशी ठेऊन भोजन करणे योग्य नाही असे सांगितले. त्यावर कपिलमुनींनी दैत्यराजाला ससैन्य भोजनाचे निमंत्रण दिले व सर्वांना चविष्ट भोजनही दिले. गणदैत्याला आश्चर्य वाटले. मग त्याला समजले कि हि त्या चिंतामणीची किमया आहे. त्याने तो चिंतामणी कपिलमुनींजवळ मागितला. कपिलमुनींनी नकार दिला. गणदैत्याने रागावून जबरदस्तीने तो चिंतामणी हिरावून घेतला. कपिलमुनींनी क्रोधीत होऊन गणदैत्याला शाप दिला “त्रैलोक्याला छळणारा तू कृतघ्न आहेस. माझ्या आश्रमात तू मला छळण्यासाठी का आलास? तुझा वध करण्यासाठी परमात्मा अवतार घेईल. लवकर तुझे तोंड काळे कर, नाहीतर भस्म होशील.” शापवाणी ऐकून गणदैत्य खिन्न झाला, पण तो दिव्य चिंतामणी घेऊन तो नगरात परत आला. आश्रमातील वृत्त ऐकून अभिजित राजाला दुःख झाले, पण गणदैत्य मात्र निर्भयपणे राज्यकारभार करीत होता. त्यात तो चिंतामणी मिळाल्याने तो पूर्ण ब्रह्माण्डात प्रसिद्ध झाला. इकडे आश्रमात चिंतामणी पळवून नेल्याने कपिलमुनी दुःखाने मूर्च्छित झाले. सावध झाल्यावर पूर्ण एकाग्रतेने ध्यानास बसले. त्यांच्यापुढे आदिमाया प्रकट झाली. शंकरांनी त्रैलोक्यात अजिंक्य होशील असा वर दिल्यानेच गणदैत्य उन्मत्त झाला आहे असे तिने सांगितले. परमात्मा विनायकच त्याचा नाश करेल असेही सांगितले. कपिलमुनींनी विचारले कि त्याला किती अवधी लागेल? आदिमायेने कपिलमुनींना “गं” या मंत्राचा उपदेश दिला. कपिलमुनींनी अहोरात्र एकाग्र मनाने हा जप केल्यास होमकुंडातून स्वतः विनायकाची चतुर्भुज मूर्ती प्रकट होईल असे सांगितले. आदिमायेने सांगितल्याप्रमाणे कपिलमुनींनी अनुष्ठान सुरु केले. अहोरात्र हवन, जप, ब्राह्मण भोजन सुरु ठेवले. शेवटी होमकुंडातून दैदिप्यमान विनायकमूर्ती प्रकट झाली. त्रैलोक्यास पिडणाऱ्या, देव संन्यासी ब्राह्मण व संत सज्जनांना छळणाऱ्या गणदैत्याचा नाश करून तुझा चिंतामणी तुला परत आणून देण्यासाठीच मी अवतार घेतला आहे असे विनायकाने सांगितले.


इकडे गणदैत्याला स्वप्न पडले. एका चतुर्भुज दिव्य तेजस्वी पुरुषाने, ज्याच्या हातात परशु कमल मोदक अशी आयुधे विजेसारखी लवलवत आहेत, त्याने कपिलमुनींसह येऊन माझे सर्व सैन्य भक्षण केले व माझे मस्तक छेदले. स्वप्नाने भयकंपित होऊन गणदैत्याने आपल्या प्रधानांना व पुत्रांना आपले स्वप्न सांगितले. प्रधानांच्या व पुत्रांच्या इच्छेनुसार गणदैत्य क्रोधीत होऊन स्वतःच प्रचंड सैन्य घेऊन वडिलांच्या विरोधाला न जुमानता, कपिल मुनींच्या आश्रमावर चाल करून गेला. वेदिकेमध्ये त्याने चतुर्भुज, विक्राळ शरीराचा, चारही हातात आयुधे असलेला, रक्तरंगी वस्त्र नेसलेला, रक्तरंगी पुष्पे धारण केलेला, सिंहावर बसलेला गणपती पाहिला जो त्याने स्वप्नात पाहिला होता. गणपतीसहित बसलेल्या सिध्दीने युद्ध करण्याची अनुज्ञा गणपतीस मागितली. गणपतीने ती आनंदाने दिल्यावर सिध्दीने रणांगणात जाऊन तीन पायांचे, चार पायांचे, तसेच चतुर्मुखी, पंचमुखी, बारामुखी असे अक्राळविक्राळ देहाचे प्राणी शस्त्रांसहित निर्माण केले. परंतु सिद्धीच्या सैन्याचा गणदैत्याच्या सैन्यापुढे टिकाव लागेना. तेंव्हा सिध्दीने मानससुत निर्माण केला. त्याचे नाव लक्ष. हा महाशूर होता. त्याने आपल्या दिव्य अस्त्रांनी असंख्य दैत्य मारले. त्याच्या बाणांनी अवघे आकाश भरले. सूर्यालाही त्यांनी व्यापून टाकले. दैत्यसैन्य धारातीर्थी पडू लागले. उरलेसुरले सैन्य सैरावैरा पळू लागले. गणदैत्याचे फक्त दोन पुत्र रणांगणावर उरले, सुलभ व शूलपाणी. तेही पलायनाचा विचार करू लागले., तेवढ्यात वाऱ्याच्या गतीने लक्ष धावला, त्यांच्या रथासहित त्या दोघांना पकडून त्याने स्वतःच्या सैन्यात आणले. पित्याला वंदून लक्ष म्हणाला, “आपण गणदैत्याला ठार करून ह्यांना राज्यावर बसवावे”


इकडे रणांगणावर कुणीही दैत्यसैन्य उरले नाही. एका सैनिकाने ही सर्व वार्ता व दोन्ही पुत्रांना धरून नेल्याची वार्ता गणदैत्यास सांगितली. गणदैत्यावर वज्राघात झाला. तो मूर्च्छित झाला. दुःखाने व्याकुळ झाला. परंतु त्याच्या प्रधानांनी त्याला समजावल्यावर त्वेषाने पुन्हा सैन्य घेऊन रणांगणावर गेला, ती मी मरेन अथवा मारिन अशी प्रतिज्ञा करूनच. कपिलमुंनींच्या आश्रमात जाऊन बघितले असता त्याने ती चतुर्भुज मूर्ती पाहिली. त्याच्या दोन्ही बाजूस सिद्धीबुद्धी होत्या व ती सूर्याहूनही अति तेजस्वी अशी विनायकाची मूर्ति सिंहावर आरूढ झाली होती. ती मूर्ति पाहताक्षणी गणदैत्याची सेना भयकंपित झाली. गणदैत्याने कपिलमुनींना क्रोधाविष्ट होऊन विचारले “हा पुरुष कोणीकडून आला आहे? सांग नाहीतर एकाच बाणाने तुम्हा दोघांचा मी प्राण घेईन.” ते ऐकून कपिल ऋषी क्रोधाने म्हणाले “दुष्टा, तू सर्व देव, गायी, ब्राह्मण, संत, सज्जन ह्यांना छळलेस, त्याची फळे भोग! तुला मारण्यासाठी हा प्रत्यक्ष परमात्मा अवतरला आहे!” हे ऐकून क्रोधीत होऊन गणदैत्याने पांच बाण विनायकावर सोडले. दोन वाया गेले. तीन विनायकाला लागले. विनायकाने मूर्च्छित झाल्याचे नाटक केले. ते बघून दैत्याने विजयाची आरोळी मारली. त्या संधीचा फायदा घेऊन विनायकाने परशुने त्याला कंठस्नान घातले. त्याचा शिरच्छेद केला. त्याचे मस्तक आभाळात उडाले व धड धरणीवर पडले. ऋषी जयजयकार करू लागले. दैत्यसैन्यात हा:हा:कार माजला.


गणदैत्य रणांगणावर पडल्याचे समजल्यावर त्याच्या पित्याला राजा अभिजीतला अतोनात दुःख झाले. पण ही पुत्राच्याच कर्माची फळे आहेत हे त्याने जाणले. अभिजित राजा तो चिंतामणी घेऊन स्वतः कपिलमुनींच्या आश्रमात गेला व विनायक आणि कपिलमुनींना दोघांना वंदन करून त्याने तो चिंतामणी कपिलमुनींच्या हवाली केला. कपिलमुनींनी विनायकाच्याच गळ्यात तो चिंतामणी घातला व म्हटले “तू दुष्ट दैत्याला मारून हा चिंतामणी माझ्याकरता परत मिळविलास म्हणून आजपासून चिंतामणी ह्या नावाने ब्रह्माण्डात ख्यात होशील”

हा चिंतामणी स्वर्गाचा राजा इंद्र ह्याला श्री विष्णूंनी दिला होता. इंद्राने कपिलमुनींच्या आश्रमातील आतिथ्याने प्रसन्न होऊन त्यांना हा चिंतामणी दिला होता. हे कथानक ऐकल्याने श्रवण करणाऱ्यांची पापे नष्ट होतात. त्यांचे दोष नष्ट होतात. व त्यांना सुख लाभते. असा हा “चिंतामणी” अध्याय समाप्त.

Sunday, April 2, 2017

Pancha Mayana Sthalam

Mayanam in tamil means cremation ground. It is generally believed that Lord Shiva loves cremation ground. He resides there along with his Ganas. In Tamil Nadu, South India, temples were constructed in these places and were known as Mayanams. There are five such temples where according to Puranas there is a high cosmic energy and have highest spiritual importance. These five places together are known as Pancha Mayanas or Pancha Mayana Sthalams. 

Following are five Mayanams



Name of Mayanam
Name of the temple
Name of Lord Shiva
Name of consort
Sthala Vriksha
Location
Kanchi Mayanam
Ekambareshwar Temple
Ekambarnathan
Kamakshi Amman
Mango
Kanchipuram
Kazi Mayanam
Brahmapurishwarar Temple
Periyanayakar (Thoniyappar)
Periyanayaki
Parijatam
Sirkazhi (Tanjavur)
Veezhi Mayanam
Nethrarbaneswarar Temple
Nethrarbaneswarar (Veezhinathar)
Brahat Sundarakusambikai
Sandalwood tree, Jackfruit tree, Champak
Tanjavur (Thiruveezhimizhalai)1
Nallur Mayanam
Kalyanasundareshwarar Temple
Kalyanasundareshwar
Kalanasundari
Bilva
Kumbhakonam
Kadavur Mayanam
Amirthakadeswarar Temple
Amirthakadeswarar
Abirami Amman
Gulabi Chameli (Jaadhi Malli)
Thirukkadaiyur2

1Once this place was dense forest with sandalwood, jackfruit, champak and Vila (Kavatha trees). Hence this place is known as Veezhi

2Near this place, there is one more temple which is locally known as Mayanam i.e. Brahmapurishwarar temple. Water from this temple pond is taken to Thirukkadaiyur daily for abhishek. It is about 10 mins from Thirukkadaiyur.

Sunday, March 26, 2017

Pancha Aranya Sthalangal

There are 5 Shiva temples on the southern bank of river Kaveri which are collectively known as Pancha Aaranya (forest) Sthalangal. It is believed that if one visits all these temples in a single day (at the times mentioned in table below) that it is considered equivalent to having a darshan at Haridwar.

Now with all transportation available it has become easy to visit these places in a single day. We will try to give details of these temples in our blogs in future. At this time we list all these temples in table below.


Name of Place
Location
Name of Temple
Name of Forest (Vanam)
Sthalavruksha (Tree / Plant)
Name of Lord
Name of his Consort
Special Deity
Time of worship
Thirukkarugavur
Papanasam Taluka, Dist

Tanjore, TN
Shri Mullai
Vana
Nathar
Jasmine
Jasmine
Mullai Vana
Nathar
Karukatha-nayaki (Tamil)
Garbha-Raksha-Ambigai (Sanskrit)
Karpaga
Vinayagar
6 am
Avalivanallur
Papanasam Taluka, Dist

Tanjore, TN
Shri
Sakshi
Nathar
Temple
Trumpet
flower
tree
Trumpet
flower
Sakshi Nathar
Soundarya-nayaki
Murugan
8 am
Haridwaramangalam
Haridwaramangalam
Shri
Paathala
Eshwarar
Sami tree
Sami tree
Pataleshwarar
Alangaravalli
Pataleshwarar
Noon
Alangudi
Alangudi
Shri
Apath
Sahayar
Eshwarar

Silk
Cotton
tree
Silk Cotton
tree
Apath Sahayar
Eshwarar
Elavarkuzhali
Dakshina-moorthy
5.30 pm
Thirukkollambudhur
Nannilam, Taluka-
Tanjore, TN
Shri
Bilvavan
Eshwarar temple
Bilva
tree
forest
Bilva tree
forest
Bilvavaneshwarar
Soundarya-ambika
Natraj
8.30 pm

Saturday, March 18, 2017

Saptha Vidangam

The word Vidangam means something which is not chiseled or created by hand. The whole Lingam i.e the base and the top elliptical portion are in one piece i.e. Swayambhoo. There are 7 temples in South India around Thanjavur which are together known as Saptha Vidanga Sthalam. In all these places the Linga is made of either of Emerald or Jade. The main deity in all these temples is Lord Shiva known as Thyagaraja. As legend goes, to beget a son, Lord Vishnu prayed on an idol (moorthy) of Somaskanda (Shiva, Parvati and Skanda together). As a result He got Manmada (Kaama) as his son. During this period he also prayed on a Vidanga. Later on Lord Bramha got the Somaskanda moorthy along with Vidanga from Lord Vishnu who in turn gave it to Lord Indra. King Muchukunda (who has a face of monkey) helped Indra in defeating the Asuras. Indra wished to give a gift to Muchukunda for the help rendered by him. Being a staunch devotee of Lord Shiva, Muchukunda knew about the Thyagaraja moorthy (Vidanga Lingam) and asked for the same from Indra. Indra did not want to part with the same. So he made 6 more identical Vidangas and placed them before King Muchukunda and asked him to choose the real one from the lot. The King prayed to Lord Shiva and identified the correct one. So Indra gave all the 7 Vidangas to King Muchukunda. He kept all these moorthys in 7 temples which are together known as Saptha Vidanga which are listed below. A separate Sannidhi (Gabhara) is made for Somaskanda moorthy and the Vidanga is kept there. There will be Nandi in front of Somaskanda moorthy. These temples were in existence even before the installation of Vidanga lingam.  All these temples are located along river Kaveri. At present it is believed that only 2 of the original Vidangas are left. Hence there is a strict timing for taking their Darshan. The 2 places are namely Thiruvarur and Thirunallar.

(Ref. Wikipedia for further details)


Temple
Vidangar Temple
Name of Lord
Name of Goddess
Location
Dance Pose
Meaning
Thyagarajar
Temple
Vidhividangar
Valmikinadar
Kamalambikai
Thiruvarur
Ajaba Natanam
Dance without chanting, resembling the dance of Sri Thyagaraja resting on Lord Vishnu’s chest
Dharbaranyeswarar
Temple
Nagaravidangar
Dharbaranyeswarar
Pranaambikai
Thirunallar
Unmatha Natanam
Dance of an intoxicated person
Kayarohaswamy
Temple
Sundaravidangar
Kayarohanaswamy
Neelayadhakshi
Nagapattinam
Vilathi natanam
Dancing like waves of sea
Kannayariamudayar
Adhividangar
Sahastra-netranaada-swamy (Kannayira-nadar)
Kailashnayaki
Thirukkaravasal
Kukudanatanam
Dancing like a cock
Brahmapureeswarar
Temple
Avanividangar
Brahmapureeswarar
Brahmakujalambigai
Thirukuvalai
Brunga
natanam
Dancing like a bee that hovers over a flower
Vaimoornaathar Temple
Nallavidangar
Vaimoornaathar
Palinumnanmozhial
Thiruvaimur
Kamala

natanam
Dance like lotus that
moves in a breeze
Vedaranyeswarar Temple
Bhuvanivividangar
Vedaranyeswarar
Vedanayaki
Thirumaraikkadu (Vedaranyam)
Hamsapathanatanam
Dancing with the gait of
a swan