Sunday, August 2, 2026

नागपट्टीनं येथील श्री कायारोहणेश्वरर मंदिर

कावेरी नदीच्या दक्षिण काठावर असलेलं हे मंदिर नागपट्टीनं शहरामध्ये आहे. सप्त विडंग स्थळांपैकी हे एक मंदिर आहे. इथल्या विडंगाचे नाव सुंदर विडंग असे आहे. शैव संत थिरुज्ञानसंबंधर, अप्पर आणि सुंदरर ह्यांनी ज्या मंदिरांची स्तुती गायली आहे त्या पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे एक स्थळ आहे. वर्तमान स्थितीतलं मंदिर २००० वर्षे जुनं आहे आणि ते चोळा आणि पल्लव राजांनी बांधलं. हे मंदिर ६व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. मूळ मंदिर लाकोलिसा समाजाने बांधलं असा समज आहे. ह्या समाजाचा उगम गुजरात मध्ये आहे. गुजरातमधल्या कायारोहण मंदिराचे हे हुबेहूब मंदिर आहे. 

मूलवर: श्री कायारोहणेश्वरर
उत्सवर: श्री चंद्रशेखरर
देवी: श्री नीलायदाक्षी
पूजा / आगम: कामिग आगम
पवित्र तीर्थ: पुंडरीकाक्ष तीर्थ
क्षेत्र वृक्ष: आंबा
पुराणिक नाव: नागायकरोणम
वर्तमान नाव: नागपट्टीनं
जिल्हा: नागपट्टीनं, तामिळनाडू

क्षेत्र पुराण:

१. दशरथ राजाला जेव्हा कळालं कि शनीदेवांच्या रोहिणी नक्षत्रातील भ्रमणामुळे दुष्काळ पडणार आहे तेव्हा त्यांनी शनिदेवांशी युद्ध करण्याचं ठरवलं. पण सूर्यदेवांनी त्यांना थांबवलं आणि युद्ध करण्याऐवजी शनिदेवांना त्यांची पूजा करून प्रस्सन करण्याचा सल्ला दिला. सूर्यदेवांच्या सल्ल्यानुसार दशरथ राजाने शनिदेवांची पूजा करून त्यांना प्रसन्न केले. त्यामुळे दशरथ राजाच्या इच्छेनुसार त्या काळामध्ये दुष्काळाचा त्रास कमीत कमी झाला. म्हणून इथे सर्व नवग्रह पश्चिमाभिमुख आहेत.

२. इथे अतिपथर नावाचा एक कोळी होता जो भगवान शिवांचा उत्कट भक्त होता. जेव्हा तो मासे पकडायचा तेव्हा त्याला एक सवय होती कि तो पहिला पकडलेला मासा नेहमी भगवान शिवांना अर्पण करण्याच्या भावनेने परत समुद्रात अर्पण करायचा. एकदा त्याची परीक्षा घेण्याकरता भगवान शिवांनी एके दिवशी त्याच्या हातात फक्त एकच मासा येईल अशी व्यवस्था केली. पण सवयीनुसार अतिपथरने कशाचीही पर्वा न करता तो एकमेव मिळालेला मासा समुद्राला म्हणजेच भगवान शिवांना अर्पण केला. त्यानंतर एकदा भगवान शिवांनी त्याला एक सुवर्णाचा मासा दिला. बाकीच्या कोळ्यांनी त्याला तो मासा ठेवायचा सल्ला दिला. पण अतिपथरने नेहमीप्रमाणे तो मासा समुद्राला अर्पण केला. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्रो पार्वती देवी आणि भगवान शिवांनी त्याला दर्शन दिले आणि त्याला मुक्ती प्रदान केली. त्याला नायनमारांमध्ये मध्ये समाविष्ट केलं. ह्या मंदिरामध्ये त्याचं स्वतंत्र देवालय आहे.

३. अळूगुणी सिद्धर: जशी लहान मुलं आपला हट्ट पुरविण्यासाठी आईसमोर रडतात तसेच हे सिद्ध श्री पार्वती देवींच्या समोर मुक्तीचा हट्ट धरुन रडायचे. शेवटी भगवान शिवांच्या संमतीने पार्वती देवींनी त्यांना मुक्ती देवविली. इथे अळूगुणी सिद्धर ह्यांची जीव समाधी आहे. वैकासि ह्या तामिळ महिन्यामध्ये विशाखा नक्षत्र दिवशी तसेच पौर्णिमेच्या दिवशी इथे विशेष पूजा केली जाते आणि नैवेद्य म्हणून खीर (पायसम) अर्पण केली जाते.

४. पुंडरीकाक्ष ऋषींनी इथे मुक्ती प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली. भगवान शिवांनी त्यांना दर्शन दिलं आणि आलिंगन देऊन मुक्ती प्रदान केली. सहसा मुक्ती आत्म्याला मिळते शरीराला नव्हे, पण इथे भगवान शिवांनी ऋषींच्या शरीराला (काया) आलिंगन (आरोहण) देऊन मुक्ती दिली म्हणून इथे भगवान शिवांना कायरोहणर असे संबोधले जाते.

५. एकदा नागांच्या राजाने भगवान शिवांची पूजा केली आणि त्या पूजेच्या प्रभावाने त्याला एक कन्यारत्न प्राप्त झाले. पण ह्या कन्येला तीन स्तने होती. भगवान शिवांनी राजाला आश्वासन दिलं कि जेव्हा सूर्य राजवंशातील एक राजा त्याला भेट देईल त्यावेळी ह्या कन्येचे तिसरे स्तन अदृश्य होईल. जेव्हा शाळीसुहन राजा इथे आला त्यावेळी त्या कन्येचे तिसरे स्तन अदृश्य झाले. नागराजाने आपल्या कन्येचा विवाह शाळीसुहन राजाशी करविला. इथे नागराजाने भगवान शिवांची उपासना केली म्हणून ह्या स्थळाला नागायकरोणम असे नाव प्राप्त झाले.

६. पुराणानुसार मुचुकुंद राजाने इंद्र देवांना त्यांच्या असुरांबरोबरच्या युद्धामध्ये मदत केली म्हणून इंद्र देवांनी त्यांना सात शिव लिंगे भेट दिली. ही शिव लिंगे खूप छोटी आहेत. त्यांना विडंग असे म्हणतात. राजाने हि लिंगे सात विविध स्थळी स्थापित केली. ह्या सात स्थळांना एकत्रित सप्त विडंग असं म्हणतात. हे मंदिर त्या सप्त विडंग स्थळांमधलं आहे. इथले शिव लिंग माणिक रत्नाचे बनले आहे. हे शिव लिंग खूप सुंदर आहे, म्हणून भगवान शिवांना इथे सुंदर विडंग असे संबोधले जाते.

७. एकदा भगवान शिवांनी नंदींना कन्या रूपातल्या अंबिका देवींचे रक्षण करण्याचा आदेश देऊन त्यांच्याकडे लक्ष द्यायला सांगितलं. पण नदींनी भगवान शिवांकडे इच्छा व्यक्त केली कि पार्वती देवींचे रक्षण करताना पण त्यांचं (नंदींचं) लक्ष भगवान शिवांकडे असावं. भगवान शिवांनी नंदींची इच्छा मान्य केली. म्हणून इथे नंदींची मान थोडी वळली आहे, त्यांचा एक डोळा भगवान शिवांकडे आहे तर दुसरा डोळा पार्वती देवींकडे आहे. म्हणून इथे नंदींना एरट्टाई पर्वाई नंदी (दोन दृष्ट्या असलेला नंदी).

८.  क्षेत्र पुराणानुसार सलीजा महाराजांनी इथून जवळ असलेल्या सात स्थळांमध्ये भगवान शिवांची उपासना केली. ह्या त्यांच्या उपासनेच्या स्मृत्यर्थ भगवान शिवांची मिरवणूक सात गावांतून जाते - पोगैनल्लूर, पोरावाचेरी, सिक्कल, पलूर, वाडागुडी, थेटी आणि नागूर. मिरवणूक माड विधींमधून (मंदिराच्या भोवतालच्या रस्त्यांमधून) जाते. ह्या सात स्थळांना नागपटीनं चे सप्त स्थाने म्हणतात.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
सप्त ऋषी, मार्कंडेय, पुंडरीकाक्ष, अळुगुणी सिद्धर, अतिपथर कोळी, दशरथ राजा, नागराजा, सलीजा राजा.  

वैशिष्ट्ये:

१. गाभाऱ्याच्या मंडपावर १२ राशींची शिल्पे आहेत.

२. ह्या मंडपामध्ये भगवान शिवांची उपासना केल्याने ग्रहदोषांचे निवारण होते असा समज आहे.

३. इथे चार हत्ती, ज्यातील प्रत्येकाला चार दंत आहेत, ते श्री गजलक्ष्मी देवींची पूजा करत आहेत असे चित्रित केले आहे.

४. कोष्ट मूर्तींच्या बाहेर श्री दक्षिणामूर्तींचे स्वतंत्र देवालय आहे ज्यामध्ये त्यांच्या आजूबाजूला आठ शिष्य आहेत. सहसा चार असतात.

५. भगवान शिवांची स्तुती गायल्याने सुंदरर ह्यांना मोत्यांचा हार, हिऱ्यांचा हार, कस्तुरी आणि अश्व प्राप्त झाले.

६. नंदींची मान अशा तऱ्हेने वळली आहे कि त्यांचा एक डोळा भगवान शिवांकडे आहे तर दुसरा देवींकडे आहे.

७. श्री भैरवांचे इथे श्वानाच्या ऐवजी सिंह वाहन आहे.

८. आग्नेय दिशेच्या प्रकारामधून पाहिलं तर क्षेत्र वृक्ष नंदींसारखं भासतं.

९. इथल्या क्षेत्र वृक्षाच्या फळाला (आम्र वृक्ष) आम्ल, कडू, गोड आणि आंबट चवी आहेत.

१०. नवग्रह देवालयामध्ये सर्व नवग्रह तीन रांगेंमध्ये रचले आहेत.

मंदिराबद्दल माहिती:

जरी हे भगवान शिवांचं मंदिर असलं तरी ते श्री नीलायदाक्षी अम्मन कोविल म्हणून प्रसिद्ध आहे. मूळ मंदिर लाकोलीसा समाजाने बांधलं असा समज आहे. ह्या शिवाय त्यांनी जे मंदिर बांधलं ते कांचीपुरम मध्ये आहे. हे मंदिर शक्ती पिठांपैकीपण एक आहे. ह्या मंदिराला शिवराजधानी पण म्हणलं जातं कारण भगवान शिव इथे राज्य करतात. हे मंदिर समुद्र किनाऱ्यावर आहे.

हे मंदिर पूर्वाभिमुख असून इथे सात स्तरांचं राजगोपुर आहे. मंदिराच्या प्रवेशावर नंदींचे स्टुक्कोचे चित्र आहे. ह्याशिवाय इथे पांच स्तरांचं राजगोपुर आहे. ह्या पांच स्तरांच्या राजगोपुरापुढे ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदी आहेत. मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्धमंडप आहे.

इथले शिव लिंग स्वयंभू आहे. हे थोडे मोठे आहे आणि काळ्या रंगाचे आहे. हे मूळ लिंग नाही. मूळ लिंगाची बऱ्याच पूर्वी चोरी झाली. वर्तमान लिंग गोमेदचे बनले आहे.  शिव लिंगाच्या पाठीमागे श्री पार्वती देवी आणि भगवान शिव वधूवराच्या रूपांत आहेत. 

कोष्ठ मूर्ती: श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्मदेव, श्री दुर्गादेवी, श्री अर्धनारीश्वरर आणि श्री भिक्षादनर

प्रकारामध्ये पुढील मूर्ती आहेत: अतिपथर नायनमार, श्री वल्लभ गणपती, श्री अघोर वीरभद्र, आत्मलिंग, श्री विनायकर, श्री पळनी अंदवर आणि इडुम्बन. 

राजधानी मंडपात पुढील मूर्ती आहेत: श्री गणेश, वल्ली आणि दैवानै समवेत श्री षण्मुख, श्री काशी विश्वनाथ आणि श्री भैरव. उजव्या बाजूला श्री अंबिका देवींचे म्हणजेच श्री नीलायदाक्षी ह्यांचे देवालय आहे. त्या उभ्या मुद्रेमध्ये आहेत. 

आतल्या प्रकारामध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: श्री सूर्य, ६३ नायनमार, श्री मवादी पिल्लैयार (आम्रवृक्षाच्या खाली असलेले श्री गणपती), श्री वेन्नैपिरन, श्री अरुणाचलेश्वरर, श्री भैरव, श्री गजलक्ष्मीदेवी, श्री शनीश्वरर आणि नवग्रह. नवग्रहांच्या देवालयामध्ये सर्व तीन रांगेमध्ये मूलवर कडे मुख करून आहेत. 

उत्सव मूर्ती अशा आहेत: श्री भिक्षादनर, श्री शिवगामींसमवेत श्री नटराज आणि काटची नायनार

श्री त्यागराजांचे देवालय भगवान शिवांच्या बाजूला आहे. ह्या देवालयाच्या समोर शैव संत संबंधर त्यांच्या पत्नी परवै नायनार ह्यांच्या समवेत आहेत. 

बाहेरील प्रकारामध्ये पुढील मूर्ती आहेत: श्री अनुकूल आंजनेय, श्री भद्रकाली आणि अळुगुणी सिद्धर ह्यांची जीवसमाधी.

इतर देवालये आणि त्यांची वैशिष्ट्ये:

सुंदर विडंगर: ह्या मंदिरातले विडंगर खूप सुंदर आहे आणि त्याचे नाव सुंदर विडंगर आहे. भगवान शिवांच्या गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला श्री त्यागराजांचे देवालय आहे. सहसा इतर मंदिरांमध्ये श्री त्यागराजांच्या मुखाचे दर्शन मिळते. ह्या ठिकाणी वैकासि ह्या तामिळ महिन्यात विशाखा नक्षत्र दिवशी तसेच मारगळी ह्या तामिळ महिन्यामध्ये थिरुवथीरै ह्या उत्सवामध्ये भगवान शिवांना अलंकार अशा तऱ्हेने केले जातात जेणेकरून श्री त्यागराजांच्या उजव्या हाताचे आणि पायाचे दर्शन घडते. इथल्या उत्सवातली  मिरवणुक एखाद्या मागे पुढे सरकणाऱ्या लाटेसारखी भासते. ह्याला परवर नृत्य (नर्दन) म्हणतात.

श्री नीलायदाक्षी देवी:

असा समज आहे की नीलायदाक्षी देवी आपल्या भक्तांवर सागरासारखा कृपावर्षाव करते. हे दर्शविण्यासाठी तिचे नेत्र निळ्या रंगाचे आहेत. नीलायदाक्षी देवींचे स्वतंत्र देवालय आहे आणि ह्या देवालयाला ध्वजस्तंभ आहे. नीलायदाक्षी देवी युवा अवस्थेतल्या कुमारिका चित्रित केल्या आहेत. म्हणून आडी पुरम (पूर्वा फाल्गुनी नक्षत्र उत्सव) इथे भव्यतेने साजरा केला जातो. त्यांची मिरवणूक चिनी मातीच्या रथामधून काढली जाते. इथला गाभारा रथाच्या आकाराचा आहे. नीलायदाक्षी देवी कुमारिका असल्याकारणाने भगवान शिवांनी नंदींना त्यांच्या रक्षणासाठी पाठवले. पण नंदींना भगवान शिवांपासून दूर जायचे नव्हते. भगवान शिवांनी त्यांना वरदान दिलं की ते जरी पार्वतीदेवींबरोबर त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या जवळ असले तरी त्यांना भगवान शिवांचं सतत दर्शन होईल. म्हणून इथे नंदी भगवान शिव आणि पार्वती देवी ह्या दोघांकडेही मुख करून आहेत असं दिसतं. त्यांच्या डाव्या डोळ्याची दृष्टी भगवान शिवांकडे आहे तर उजव्या डोळ्याची दृष्टी पार्वतीदेवींकडे आहे. भाविक जन इथे नेत्र दोषांच्या निवारणासाठी नंदींची पूजा करतात.

श्री विनायक: 

श्री विनायकाचे इथे स्वतंत्र देवालय आहे जेथून ते आपल्या भक्तांवर कृपावर्षाव  करतात. त्यांच्या शरीराभोवती एक सर्प वेटाळा घालून आहे तर एक सर्प त्यांच्या माथ्यावर छत्रीसारखा आहे. म्हणून त्यांना श्री नागभरण विनायक (नागभूषण विनायक) असे संबोधले जाते. राहू आणि केतू दोषांच्या निवारणासाठी भाविक जन त्यांची पूजा करतात. इथे राहू काळ तसेच राहू आणि केतूंच्या गोचर काळात विशेष पूजा केली जाते. 

इथे श्री भैरवांचे श्वानाच्या ऐवजी सिंह हे वाहन आहे. असा समज आहे की जेव्हा पुंडरीकाक्ष ऋषींनी इथे भगवान शिवांची पूजा केली त्या पूजेच्या प्रभावाने गंगा नदी श्री भैरवांसमवेत प्रकट झाली. इथे श्री भैरव काळभैरव रूपांत भक्तांवर कृपावर्षाव करतात. ते दक्षिणाभिमुख असून त्यांच्या मुखावरचा भाव उग्र आहे. त्यांना शांत करण्यासाठी म्हणून इथे त्यांच्यासमोर दोन विनायक आहेत.

दक्षिण भारतामध्ये अशी प्रथा आहे की जेव्हा मंदिरासमोरून प्रेतयात्रा जाते तेव्हा मंदिराची दारे बंद ठेवली जातात. पण इथे प्रेताला मंदिरातील हार आणि वस्त्र अर्पण केली जातात. कोळी समाजातील एका श्रेष्ठ शिव भक्ताच्या आदरार्थ असं केलं जातं. 

सहसा उत्सवाच्या वेळेस रथयात्रा मंदिराच्या भोवतालच्या चार रस्त्यांमधून जाते. पण इथे रथयात्रा ह्या स्थळाच्या म्हणजेच नागपट्टीनंच्या आजूबाजूच्या सात गावांतून फिरते. सालीजा महाराजांना भगवान शिवांनी ह्या ठिकाणी विवाहाच्या पोशाखात दर्शन दिलं होतं. त्यांच्या आदरार्थ रथयात्रा सात गावांतून फिरवली जाते.

मोहिनी यात्रा: 

सहसा इतर मंदिरांमध्ये भगवान शिवांच्या मिरवणुकीमध्ये भगवान शिव वृषभ वाहनावर अशी मिरवणूक असते. पण इथे ह्या मिरवणुकीमध्ये भगवान विष्णू त्यांच्या मोहिनी रूपांत सहभागी होतात. समुद्र मंथनातून निर्माण झालेलं अमृत प्राशन करण्याआधी देवांनी भगवान शिवांची पूजा केली नाही. त्यांना क्षमा करण्यासाठी म्हणून भगवान शिवांनी प्रदोष समयी तांडव नृत्य केले. त्याचवेळी भगवान विष्णूंनी मोहिनी रूपांत अवतार घेतला. म्हणून प्रदोष पूजेच्या समयी इथे मोहिनी देवींचे दर्शन होते. इतर वेळी मोहिनी देवींची मूर्ती भगवान शिवांच्या गाभाऱ्यात ठेवली जाते. 

इथे कालीदेवींचे म्हणजेच अष्टभुजा अंबिकांचे देवालय आहे.

तसेच अष्ट भैरव आणि गजलक्ष्मी ह्यांची पण देवालये आहेत.

शिव लिंगाच्या पाठीमागे सोमस्कंदर आणि बारा हात असलेले श्री मुरुगन ह्यांच्या मूर्ती आहेत.

परिक्रमेमध्ये श्री चंडिकेश्वरर ह्यांचे देवालय आहे. 

इथल्या क्षेत्र वृक्षाची (आंबा) फळे खूप गोड आहेत. पण हे वृक्ष मंदिराच्या बाहेर लावल्यास त्याची फळे एवढी गोड नसतात.

प्रार्थना:

१. भाविक जन इथे पापांचं क्षालन करण्यासाठी प्रार्थना करतात.

२. ग्रहदोषांच्या निवारणासाठी भाविक जन इथे भगवान शिवांच्या गाभाऱ्याच्या छतावर असलेल्या बारा राशींच्या खाली उभे राहून प्रार्थना करतात.

३. ज्यांना नेत्र दोष आहेत ते भाविक जन इथे एरट्टाई पर्वाई नंदी ह्यांची प्रार्थना करतात.

४. राहू केतू दोषांचे निवारण होण्यासाठी भाविक जन इथे नागभूषण विनायकांची प्रार्थना करतात.

५. इथे कालभैरव दक्षिण दिशेला मुख करून आहेत. म्हणून भाविक जन इथे दीर्घायुष्यासाठी काळभैरवांची प्रार्थना करतात.

पूजा:

कामिग आगमानुसार नियमित दैनंदिन पूजा. तसेच प्रदोष पूजा केली जाते. दररोज सकाळी ९ वाजता आणि रात्री ८ वाजता अभिषेक केला जातो.

मंदिरात साजरे होणारे सण:

वैकासि (मे-जून): कल्याण (विवाह) उत्सव

आनी (जून-जुलै): आयिल्यम (मराठी मध्ये अशलेषा) नक्षत्र दिवशी अर्धजाम पूजेच्या समयी पुंडरीकाक्ष ऋषीं भगवान शिवांमध्ये विलीन होऊन मुक्ती पावले ह्या स्मृत्यर्थ पूजा केली जाते. अर्धजाम पूजा मंदिर बंद होण्याच्या अगदी आधी केली जाते.

आडी (जुलै-ऑगस्ट): आडीपुरम उत्सव (पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर उत्सव)

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): थिरुकार्थिगई

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्रि

मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते दुपारी १२.३०, संध्याकाळी ५ ते रात्री ९.३०

मंदिराचा पत्ता:

श्री कायारोहणेश्वरर मंदिर,
नागपट्टीनं,
तामिळ नाडू ६११००१

मोबाईल नंबर: +९१-९८९४५-०१३१९, +९१-९३६६६-७२७३७

आभार: https://tamilnadu-favtourism.blogspot.com/,  https://temple.dinamalar.com/en/


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

Thursday, July 30, 2026

Shri Kayarohaneshwarar Temple at Nagapattinam

This temple is situated in the city of Nagapattinam and is on the southern bank of Kaveri. 

This is one of the Sapta Vidanga sthala. Vidanga at this place is known as Sundar Vidangar. This is one of the Padal Pethra Sthalams revered by Thiru Dnyanasambandhar, Appar and Sundarar. The present temple is about 2000 years old which was built by Cholas and Pallavas. This temple must have existed even before the sixth century. It was originally built by the Lakolisa cult which originated in Gujarat. This temple is considered as a twin of Kayarohan temple in Gujarat.

Moolavar: Shri Kayarohaneshwarar
Utsavar: Shri Chandrashekharar
Devi: Shri Neelaydakshi
Pooja / Agama: Kameega Agama
Sacred Theertha: Pundarikaksha Theertha
Kshetra Vruksha: Mango tree
Puranik Name: Nagaykaronam
Present Name: Nagapattinam
District: Nagapattinam, Tamil Nadu 

Kshetra Puran

1. Emperor Dasharath came to know that Shani will be aspecting star Rohini which will cause famine. He decided to fight Shani and was advised by Surya not to fight Shani and please him by worshiping. Shani was pleased by the worship of Dasharath and accepted the desire of Dasharath by which he troubled to a lesser extent. Hence all the Navagrahas in this temple are facing the west.

2. There was a staunch devotee of Lord Shiva who was a fisherman named Athipathar. When he used to fish in the ocean he had the habit of throwing away the first fish back into sea as an offering to Lord Shiva. In order to test him, Lord Shiva made him catch only one fish on a particular day. But the fisherman (Athipathar) threw the first fish into the sea and did not bother about starving. Once, Lord Shiva gave him a golden fish. The other fishermen advised him to keep it. But, Athipathar threw it back into the sea as a routine. Pleased by his devotion Lord Shiva and Goddess Parvati gave darshan and gave him mukti. He attained the status of Nayanmar. He has a separate shrine inside the temple complex.

3. Azhuguni Siddhar: Like children cry to their mother to get their desire fulfilled, this Siddha used to cry in mother Parvati’s shrine begging the divine mother to grant him salvation. She gave him salvation with the consent of Lord Shiva. There is a jiva samadhi at this place for Azhuguni Siddhar. Special worship is done on Vishakha Nakshatra in the month of Vaikasi and on full moon day with Kheer (payasam) as the naivedya. 

4. Sage Pundarikaksha did penance at this place for attaining mukti. Lord Shiva gave darshan to the Sage, embraced him and gave him mukti. Generally mukti is attained only for atma but not for the body, but in this case Lord Shiva gave mukti to Sage Pundarikaksha by embracing him (arohan) with human body (kaya). Hence the lord is known as Kayarohanarar. 

5. Once the King of Serpents worshiped Lord Shiva and got a female child. The child had three breasts. Lord Shiva assured the King that the third breast will disappear when a King from the Surya dynasty visits him. When King Shalisuhan came to this place the third breast vanished. The Naga King gave his daughter in marriage to King Shalisuhan. Since the Naga King worshiped here, the place came to be known as Nagaikaronan. 

6. According to Puran, King Muchukunda got seven Shiva Lingas from Lord Indra for helping Lord Indra in overcoming the asuras. These Shiva Lingas are small in size and are known as Vidanga. He installed them at seven places which are praised as Sapta Vidanga sthalam. This is one of the Sapta Vidanga sthalams where Shiva Linga is made of a kind of Ruby. This Shiva Linga is very beautiful and hence Lord Shiva is praised here as Sundar Vidanga.

7. According to Puran, Lord Shiva asked Nandi to be the guard of Goddess Ambika who is a virgin. But Nandi informed Lord Shiva that he wished to see him even while he was guarding Goddess Parvati. Lord Shiva granted the request made by Nandi. Hence we find that in this temple the neck of Nandi is turned towards Lord Shiva with one eye on Goddess Ambika and other on Lord Shiva. Hence in this temple Nandi is praised as Erattai Parvai Nandi (i.e. Nandi having twin vision).

8. According to Kshetra Puran, Maharaja Salija worshiped Lord Shiva and performed pooja at seven places which are nearby. As a remembrance, during the festival, Lord Shiva’s procession is taken to seven nearby temples namely PogaiNallur, Poravachery, Sikkal, Palur, Vadagudi, Theti, and at Nagur. The procession goes through the Mada Veedhis (streets around the temple). This is known as Sapta Sthan temple of Nagapatiinam.

Those who worshiped at this place: Sapta Rishi, Sage Markendeya, Sage Pundarikaksha, Azhuguni Siddhar, fisherman Athipathar, King Dasharath, King of Serpents and King Salija.

Special features:

1. In the mandap of the Sanctum Sanctorum ceiling, we have the twelve zodiacs sculptured. 

2. By worshiping Lord Shiva in this mandap, people believe that they get relief from grahadosha. 

3. Two elephants, with four tusks each, are depicted doing puja to Goddess Gajalakshmi who has her legs hanging down. 

4. Koshta murti of Lord Dakshinamurti, in a separate shrine outside the koshta, is with eight disciples instead of four. 

5. Sundarar obtained a garland of pearls, a garland of diamonds, Kasturi and a horse etc from Lord Shiva by praying to him with sacred hymns.

6. The neck of Nandi is turned in such a way that one eye is in the direction of Lord Shiva and the other is in the direction of Ambika. 

7. Lord Bhairav has a lion as his mount instead of a dog.

8. When we view the Kshetra Vruksha from the south east prakaram, it looks like Nandi.

9. The fruit of the mango tree (Kshetra Vruksha) has acidic, bitter, sweet and sour taste.

10. In the Navagraha shrine, all the Navagrahas are arranged in three rows.  

About the temple:

Though this is a Shiva temple, it is popularly known as Goddess Neelaydakshi Amman Kovil. This temple was originally constructed by the Lakolisa cult. The only other temple constructed by them in Tamil Nadu is at Kanchipuram. The temple is also a Shakti Peeth. The temple is also called Shivarajadhani as Lord Shiva rules as a King. And is located near the sea shore.  

This is an east facing temple with a seven tiered Rajagopuram. At the entrance, there is a stucco image of Nandi. There is another five tiered Rajagopuram. There is Dhwajastambha, Balipeeth and Nandi after the five tiered Rajagopuram. The temple consists of Sanctum Sanctorum, Antarala and Ardha mandap.

The Shiva Linga is a Swayambhu Linga, a little bit big and black in color. The present lingam is not the original as the original was stolen long back. The present lingam is made of Gomed (topaz). Behind the Shiva Linga we come across Lord Shiva and Goddess Ambika in wedding posture. 

Koshta Murtis: Lord Dakshinamurti, Lord Lingodbhavar, Lord Brahma, Goddess Durga, Lord Ardhanarishwarar and Lord Bhikshadanar. 

In the prakara, we come across idols of Athipathar Nayanar, Lord Vallabha Ganapati, Lord Aghor Veerabhadra, Atmalinga, Lord Vinayaka, Lord Palani Andavar and Idumban. In a mandap known as Rajadhani Mandap we come across Lord Ganesha, Lord Shanmukha with Valli and Deivanai, Lord Kashi Vishwanath and Lord Bhairav. On the right side we find the shrine of Goddess Ambika, Goddess Neelaydakshi. She is in a standing posture. In the inner prakaram we come across idols of Lord Surya, Sixty three Nayanmars, Lord Mavadi Pillaiyar (Lord Ganesha under a mango tree), Lord Vennaipiran, Lord Arunachaleshwarar, Lord Bhairav, Goddess Gajalakshmi, Lord Shanishwarar and the Navagraha. In Navagraha all the planets are facing the Moolavar in three rows. The utsav murtis are Lord Bhikshadanar, Lord Nataraja with Goddess Shivagami and Katchi Nayanar. The shrine of Tyagaraja is next to Lord Shiva. Opposite to this shrine we come across Shaiva Saint Sambandhar along with his wife Paravai Nayanar. In the outer prakaram we come across Lord Anukoola Anjaneya, Goddess Bhadrakali and Jeevasamadhi of Azhuguni Siddhar. 

About other shrines and special features. 

Sundar Vidangar: The vidangar in this temple is very beautiful and is known as Sundar Vidangar. To the right side of Lord Shiva's Sanctum Sanctorum, we come across the shrine of Lord Tyagaraja. In most of the temples we can have darshan of the face of Lord Tyagaraja only. In this place during Vaikasi (Vishakha Nakshatra) and Margazhi (Thiruvathirai festival) alankar of Lord Shiva is done in such a way so that we can have darshan of the right hand and feet of Lord Tyagaraja. During the festival, the procession dances back and forth like a wave and is known as Paravar Nrutya (Nardana).

Goddess Neelaydakshi: It is believed that she bestows boons to the devotees like ocean. To indicate this, her eyes are blue (like ocean) in color. She has a separate shrine with a flagstaff. She is depicted as a virgin girl before marriage i.e. Yuva stage. Hence the Adipuram festival (festival on Purva Phalguni nakshatra) is celebrated on a grand scale. She is taken in procession in chariot of china clay. Goddess Ambal’s Sanctum Sanctorum is constructed like a chariot. As Goddess Ambika is a virgin, Lord Shiva sent Nandi to guard her. But Nandi was reluctant to leave Lord Shiva. Lord advised Nandi to have his darshan also by staying with Goddess Ambika. Hence we find that Nandi is facing the Ambal, but his face is toward Lord Shiva as well. His left eye is towards Lord Shiva and right eye is towards Goddess Ambika. People worship this Nandi to get rid of eye related problems. 

Lord Vinayaka: He graces from another shrine. He has one serpent coiled around his body and another one above his head like an umbrella. Hence he is known as Lord Nagaabharan Vinayaka (Nagabhushan Vinayaka). People worship him for relief from Rahu and Ketu effects. They perform special pujas during Rahu Kaal and Rahu-Ketu transit. 

Lord Bhairav has a lion as a mount instead of a dog. It is believed that when Sage Pundarikaksha worshiped Lord Shiva at this place, Ganges sprang up along with Lord Bhairvav. So Bhairava graces here as a Kaala Bhairav. He is facing south with a furious face. To calm him down we have two Vinayakas standing in front of him. 

It is customary in South India to close the temple doors when the procession of a dead person passes near it. But in this place, the dead body is garlanded, with a garland and vastra from the Shiva temple. This is done in honour of a great devotee of Lord Shiva from the fisherman community. 

Generally during the festival the Lord is taken in procession along the four streets surrounding the temple. But at this place the processional deity is taken through seven villages surrounding Nagapattinam. This is in honour of Salija Maharaja who had a darshan of Lord Shiva in bridal form when he came to this place after performing Shiva puja at the village. 

Mohini procession: Generally Lord Shiva goes in procession on a Rishabha vahan during pradosha puja in Shiva temples, but in this temple Lord Vishnu also joins in the procession in Mohini avatar. After the Samudra Manthan, Mohini avatar took place just before pradosha when Lord Shiva danced to forgive the devas for their mistake of not worshiping him before taking the amrut. Hence we can have darshan of Mohini during the pradosha puja. At other times Mohini is kept in the Sanctum Sanctorum of Lord Shiva. 

There is a shrine of Goddess Kali (Ashtabhuja Ambika). We come across idols of Lord Ashta Bhairav and Goddess Gajalakshmi in this temple. 

Behind the Shiva Linga we have the idol of Lord Somaskanda and Lord Muruga with weapons in twelve hands. 

We have the shrine of Lord Chandikeshewarar on the corridor. 

The mango tree (Kshetra Vruksha) fruits are sweet, bitter and sour. When we look at the tree from southeast parikrama, it looks like a Nandi. 

Prayers:

1. Devotees worship here for salvation and relief from the sins committed by them.

2. Devotees worship Lord Shiva under the twelve zodiac signs on the ceiling of Sanctum Sanctorum for relief from graha doshas.

3. Those having vision problems pray to Errattai Parvai Nandi.

4. Devotees pray to Lord Nagabhushan Vinayaka for Rahu Ketu related problems. They perform Abhishek with milk during Rahu Kaal.

5. Devotees worship Lord Kalabhairav for longevity as Lord Kaalbhairav faces the south direction.

Pooja:

Regular Pooja as per Kameega Agama. Pradosha puja is performed. Daily abhishek at 9 am and 8 pm.

Festivals

Ani (June-July) (Ayilyam nakshatra, Ashlesha in Marathi). On this day Sage Pundarikaksha entering Lord Shiva’s shrine and attaining mukti is held during ArdhaJama puja which is the last puja before closing the temple. 

Vaikasi (May-June): Wedding festival 

Aadi (July-Aug): Aadipuram festival (festival on Purva Phalguni Nakshatra).

Maasi (Feb-Mar): Shivatratri festival

Aippasi (Oct-Nov): Annabhisheka

Karthigai (Nov-Dec): Karhtigai Deepam 

Temple Timings: 6 am to 12.30 pm, 5 pm to 9.30 pm

Address

Shri Kayarohaneshwarar Temple at Nagapattinam
Tamil Nadu 611001

Mobile Number: +91-9894501319, +91-9366672737

Courtesy:
https://tamilnadu-favtourism.blogspot.com/
https://temple.dinamalar.com/en/


Sunday, July 26, 2026

सियाथमंगै येथील श्री आयवंदीश्वरर मंदिर

हे मंदिर थिरुमारुगल-नागोर मार्गावर थिरुमारुगल पासून ३ किलोमीटर्स वर, थिरुवारुर पासून २८ किलोमीटर्सवर आणि कुंभकोणम पासून ४८ किलोमीटर्सवर आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे. शैव संत संबंधर आणि वल्ललर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. ह्या स्थळाला पूर्वी थिरुछठमंगै असे नाव होते. ६व्या आणि ७व्या शतकाच्या आसपास ह्या मंदिराचे नाव आयवंथी असे होते. म्हणून हे मंदिर ६व्या आणि ७व्या शतकाच्या दरम्यान अस्तित्वात असावं. चोळा राजांनी ह्या मंदिराची दगडी बांधकाम करून पुनर्निर्मिती केली. कालांतराने पांड्या, नायक आणि नागरथर राजांनी ह्या मंदिराचा विस्तार केला. इथल्या शिलालेखांमध्ये विविध राजांनी मंदिराला दिलेल्या भेटवस्तू आणि देणग्यांचे उल्लेख आहेत. हे मंदिर कावेरी नदीची उपनदी असलेल्या मुडीकोंदण ह्या नदीच्या उत्तर काठावर आहे. थिरुनीळनक्क नायनार ह्यांचे हे जन्मस्थान आहे. 

मूलवर: श्री आयवंदीश्वरर, श्री ब्रह्मपुरीश्वरर
देवी: श्री उभयपुष्पविलोचीनी, श्री मलर-कन्न-अम्माई, श्री एरु-मलर-कन्न-अम्माई
पवित्र तीर्थ: मंदिरासमोरील तीर्थ. ह्या तीर्थाच्या अर्ध्या भागाला चंद्र तीर्थ म्हणतात तर दुसऱ्या अर्ध्या भागाला सूर्य तीर्थ म्हणतात.
पूजा / आगम: रुद्रयामल तंत्र आगम
पवित्र वृक्ष:  बहुवा (तामिळ मध्ये कोन्द्र)
पुराणिक नाव: थिरुछठमंगै       
वर्तमान नाव: सियाथमंगै

क्षेत्र पुराण:

१. पुराणानुसार श्री ब्रह्मदेवांनी, ज्यांना श्री आयवन असे पण संबोधले जाते, ह्या ठिकाणी पूजा केली. म्हणून भगवान शिवांना इथे श्री आयवंदीश्वरर आणि श्री ब्रह्मपुरीश्वरर असे संबोधले जाते.

२. इथले स्थळ पुराण ६३ नायनमारांमधले २८वे नायनार थिरुनीळनक्क नायनार ह्यांच्या संदर्भात आहे. ते जातीने ब्राह्मण होते आणि वेदपारंगत होते. ते उत्कट शिवभक्त होते. जेव्हा जेव्हा कोणी शिवभक्त त्यांच्याकडे यायचे ते त्यांचं स्वागत त्यांचे पाय धुवून करायचे. ते आगम नियमानुसार पूजाअर्चा करायचे. एकदा पौर्णिमेच्या दिवशी ते आपल्या पत्नीसह मंदिरात गेले होते. ते जेव्हा पूजा करत होते त्यावेळी एक कोळी आपल्या जाळ्यामधून शिव लिंगावर पडला. त्यांच्या पत्नीने तो कोळी फुंकर मारून उडवला. नीळनक्क नायनार ह्यांच्यानुसार हे कृत्य अपमानास्पद आणि निंदनीय होते. त्यांच्यामते त्यांच्या पत्नीने दुसरा कुठल्या मार्गाने त्याला बाजूला करावयास पाहिजे होते. त्यांनी आपली पूजा पूर्ण केली. पण त्यांनी आपल्या पत्नीला सोडून दिले आणि तिला मंदिरात ठेवून घरी परत आले. रात्री त्यांच्या स्वप्नात भगवान शिव आले. त्यांचं शरीर व्यवस्थित होतं पण कोळ्याचे विष जिथे पडले होते तो भाग सुजला होता. ज्यावर नीळनक्क नायनार ह्यांच्या पत्नीने फुंकर मारली होती तो भाग व्यवस्थित होता पण उरलेला भाग सुजला होता. नीळनक्क नायनार ह्यांना कळून चुकले कि भक्ती ही कर्मकांडापेक्षाही श्रेष्ठ आहे. ते पहाटेच मंदिरात गेले. त्यांनी शिवांची पूजा केली आणि आपल्या पत्नीला घेऊन आले. त्यांनी भगवान शिवांप्रती तसेच शिवभक्तांप्रती सेवा चालू ठेवली.    

३. एकदा नीळनक्क नायनार शैव संत संबंधरांना भेटायला गेले. त्यावेळी संबंधर खूप लहान होते. त्यावेळी संबंधरांबरोबर थिरुनीळकंठ याळप्पानर पण होते. ते दोघे सियाथमंगैकडे येत होते. नीळनक्क नायनारांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्यासाठी रात्री राहण्याची सोय केली. संबंधरांच्या सूचनेनुसार त्यांनी याळप्पानर आणि त्यांच्या पत्नीसाठी, ते दुसऱ्या जातीचे असल्याकारणाने, होमकुंडाजवळ सोय केली. रात्री होमकुंडामधला अग्नी जास्त तेजाने झळकत होता. ही याळप्पानर आणि त्यांच्या पत्नींच्या भक्तीची साक्ष होती. नीळनक्क नायनार ह्यांना ह्यातून शिक्षण मिळालं की भक्तीला जातींचं बंधन नसतं. संबंधर नीळनक्क नायनार ह्यांच्याबरोबर मंदिरात आले आणि त्यांनी भगवान शिव आणि नीळनक्क नायनार ह्यांची स्तुती गायली. संबंधरांनी नीळनक्क नायनार ह्यांना आपल्या विवाहाचे पौरोहित्य करण्यासाठी थिरुमननेल्लुर येथे येण्याचे आमंत्रण दिले. ते सगळे थिरुमननेल्लुर येथे गेले. तेथे संबंधर ह्यांनी भगवान शिवांकडे मुक्तीची प्रार्थना केली. ते सगळे भगवान शिवांच्या ज्योतीमध्ये विलीन झाले.

४. स्थळ पुराणानुसार एकदा ह्या गावातून काही व्यापारी प्रवास करत होते. तेवढ्यात त्यांच्यापुढे अचानक एक मुलगी आली. त्या व्यापाऱ्यांमधल्या सर्वात ज्येष्ठ व्यापाऱ्याला तिने मोडकळीस आलेल्या मंदिराला भेट देण्याची विनंती केली. तिचे मंत्रमुग्ध करणारे रूप पाहून त्या व्यापाऱ्याला तिच्या विनंतीला मान द्यावासा वाटला आणि तो आणि इतर व्यापारीपण तिच्याबरोबर त्या मंदिरात गेले. मंदिरात गेल्या गेल्या ती मुलगी अदृश्य झाली. त्यांना कळून चुकले कि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात त्या मंदिरातल्या पार्वती देवी होत्या. त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री ब्रह्मदेव, व्यापारी, संबंधर, थिरुनीळनक्क नायनार आणि त्यांची पत्नी.

वैशिष्ट्ये:

१. श्री अंबिका देवींच्या देवालयामध्ये देवींच्या कपाळावर भगवान शिवांसारखेच तिसरे नेत्र आहे. 

२. श्री अर्धनारीश्वरांचा एक पाय नंदीवर आहे. हे दृश्य अतिशय दुर्मिळ आहे.

३. श्री शनीश्वरांचा एक पाय त्यांच्या वाहनावर म्हणजेच कावळ्यावर आहे.

४. दररोज रुद्रयामल तंत्र आगमानुसार चार पूजा केल्या जातात.

५. स्तंभावरील श्री आयवंदीश्वरर आणि श्री बाळकृष्णांची शिल्पे खूप आकर्षक आहेत.

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्याला पांच स्तरांचं राजगोपुर आहे. हे मंदिर चारी बाजूंनी ग्रॅनाईट भिंतींनीं आच्छादलेले आहे. मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्धमंडप आहे. मध्यभागी स्टुक्कोची एक कमान आहे. अलीकडेच गाभाऱ्याच्या भोवती एक मंडप बांधला आहे. बलीपीठ आणि नंदी गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. राजगोपुराच्या समोर मंदिराचे पवित्र तीर्थ आहे. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. गाभाऱ्याचा आकार शिव लिंगासारखा आहे. इथल्या शिव लिंगावर फोड दिसतात. गाभाऱ्याच्या प्रवेशावर द्वारपालक आहेत तसेच श्री गणपती आणि श्री दंडपाणी ह्यांची देवालये आहेत.

कोष्ट मूर्ती: श्री नर्दन विनायक, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्म, श्री अर्धनारीश्वरर, अगस्त्य मुनी, आलिंगन मूर्ती, श्री भिक्षादनर आणि श्री दुर्गादेवी.

श्री अर्धनारीश्वरर उभ्या मुद्रेत आहेत आणि त्यांचा एक हात नंदींवर आहे. 

श्री अंबिकादेवींचे स्वतंत्र पश्चिमाभिमुख देवालय आहे. त्यांच्या देवालयाचं द्वारपालकी रक्षण करत आहेत. त्यांना उभ्या मुद्रेत चित्रित केले आहे आणि त्यांना चार हात आहेत. त्यांच्या कपाळावर भगवान शिवांसारखं तिसरं नेत्र आहे. त्यांच्या गाभाऱ्यासमोर त्यांच्याकडे मुख करून नंदी आहे. तो थोड्या उंचावर आहे. त्यांच्या देवालयाला आणि गाभाऱ्याला स्वतंत्र प्रवेशद्वारे आहेत. श्री अंबिका देवींच्या देवालयाच्या परिक्रमेमध्ये श्री विनायक, श्री मुरुगन, श्री सूर्य ह्यांची देवालये आहेत. तसेच त्यांच्या देवालयामध्ये शयनगृह पण आहे. 

बाहेरील परिक्रमेमधली इतर देवालये आणि मूर्ती: श्री चंद्र, श्री सूर्य, एक पाय त्यांच्या वाहनावर असलेले श्री शनीश्वर, शनीश्वरांचे वाहन कावळा, सप्त मातृका, श्री भैरव, नवग्रह, महालिंग, श्री विशालाक्षीदेवींसमवेत श्री काशी विश्वनाथ आणि श्री गणेश.

आतल्या परिक्रमेमध्ये पुढील देवालये आणि मूर्ती आहेत: वल्ली आणि दैवानै ह्यांच्या समवेत श्री सुब्रमण्यम, श्री गजलक्ष्मी, शैव संत नालवर, थिरुनीळनक्क नायनार त्यांच्या पत्नींसमवेत, मंगैयारकरसी, श्री सोमस्कंदर, श्री महागणपती, उत्सव मूर्ती आणि नर्दन सुंदरर.

नटराज सभेमध्ये श्री शिवकामींसमवेत श्री नटराज तसेच शैव संत माणिकवाचगर ह्यांच्या मूर्ती आहेत.

बाहेरील परिक्रमेमध्ये क्षेत्र वृक्षाच्या खाली श्री गणपतींच्या मूर्ती आणि शिव लिंग आहे. इथल्या स्तंभांवर श्री आंजनेय आणि त्यांच्या शेपटीवर घंटा तसेच रांगणाऱ्या बाळकृष्णांची शिल्पे कोरलेली आहेत.

प्रार्थना:

१. हे मूळ नक्षत्रासाठी परिहार स्थळ आहे. 

२. भाविक जन इथे विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी, शिक्षणामध्ये प्रगतीसाठी, ज्ञानप्राप्तीसाठी तसेच वैभवप्राप्तीसाठी प्रार्थना करतात.

पूजा:

आगमानुसार रोज चार पूजा तसेच नियमित प्रदोष पूजा केल्या जातात.

मंदिरात साजरे होणारे सण:

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी, मूळ नक्षत्र दिवशी उत्सव

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते ११, दुपारी ४ ते रात्री ८.३०

मंदिराचा पत्ता:

श्री आयवंदीश्वरर मंदिर,
सियाथमंगै,
तालुका आणि जिल्हा: नागपट्टीनं
तामिळ नाडू ६०९७०२

दूरध्वनी: +९१-४३६६२७००७३, +९१-९७५१०७५०२८

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

Thursday, July 23, 2026

Shri Ayavandeeshwarar Temple at Seeyathamangai

This place is at a distance of 3 kilometers from Thirumarugal on the Thirumarugal-Nagore route. It is at about a distance of 28 kilometers from Thiruvarur and 48 kilometers from Kumbhakonam. This Padal Pethra Sthalam is on the southern bank of Kaveri and was revered by Shaiva Saints Sambandhar and Vallalar. This place was earlier known as Thiruchathamangai and this temple was known as Ayavanthi during the sixth to seventh century. This shows that the temple must have existed even during the sixth-seventh century. It was reconstructed as a stone structure by Chola kings. Later on extensions were made by Pandya, Nayaks, and Nagarathars. There are stone inscriptions in the temple giving an account of gifts and endowments made by various kings. This temple is on the northern bank of river Mudikondan which is a tributary of Kaveri. This is the birth place of Thiru NeelaNakka Nayanar. 

Moolavar: Shri Ayavandeeshwarar, Shri Brahmapurishwarar
Devi: Shri UbhayaPushpaVilochini, Shri Malar-kann-ammai, Shri Eru-malar-kann-ammai
Sacred Theertha: Temple tank in the front of the temple. Half of it is praised as Chandra Theertha. The other half is praised as Surya Theertha.
Pooja / Agama: Rudrayamal Tantra Agama
Sacred Vruksha: Bahuva (Kondra in Tamil)
Puranik Name: Thiruchathamangai
Present Name: Seeyathamangai

Kshetra Purana:

1. According to the Puran, Lord Brahma who is also praised as Lord Ayavan worshiped Lord Shiva at this place. Hence Lord Shiva is praised as Lord Ayavandeeshwarar and Lord Brahmapurishwarar.

2. The Sthala Puran is about ThiruNeelaNakkaNayanar who is twenty eighth of sixty three nayanmars. He was a brahmin priest, an expert in Vedas and staunch devotee of Lord Shiva. He served Lord Shiva devotees by welcoming them first and washing their feet. He used to worship as per the agama rules. Once on a full moon day, he went to the temple along with his wife. While he was performing his rituals a spider fell from its web on the top of Shiva Linga. The wife blew away the spider which was considered as sacrilege of the rules (blasphemous by ThiruNeelaNakkaNayanar). He felt that she should have removed this spider by some other means. He apologized to Lord Shiva and offered rituals to purify the Shiva Linga. He abandoned his wife and left her in the temple. At night Lord Shiva appeared in his dream in which his body was normal but the rest of the portion was swollen due to spider’s poison. Lord Shiva told him that the portion where his wife blew away the spider was normal whereas the remaining portion was swollen. Then ThiruNeelaNakkaNayanar realized that the devotion to Lord is superior to rituals. At dawn he went to the temple, worshiped Lord Shiva and was reunited with his wife. He continued his service to Lord Shiva and Shiva devotees. 

3. Once ThiruNeelaNakkaNayanar visited Shaiva Saint Sambandhar who was a child. At that time Sambandhar was accompanied by ThiruNeelaKantha Yazhppanar. They were coming to Seeyathamangai. NeelaNakkaNayanar welcomed them and made arrangements for them to stay at his place for the night. At the suggestion of Sambandhar he asked Yazhppanar and his wife (who were of different cast) to stay near the homakunda. The fire in the homakunda burnt brightly during the night and gave testimony of the couple’s devotion. It exhibited to ThiruNeelaNakkaNayanr that devotion is superior to caste and its barrier. Sambandhar accompanied ThiruNeelaNakkaNayanar to the temple and composed a sacred hymn in honour of Lord Shiva and ThiruNeelaNakkar. Sambandhar invited ThiruNeelaNakkaNayanar to his wedding at ThiruManaNallur where ThiruNeelaNakka officiated as presiding priest. Then all of them went to ThiruManaNallur where Sambandhar prayed for salvation. All of them merged in the light of Lord Shiva. 

4. According to Sthala Puran, once a group of traders were passing through ThiruSeeyathamangai. At that time a girl appeared before them from nowhere. She invited the eldest person of the group to visit the dilapidated temple in the village. As that person was mesmerized by the divine look of the girl, he did not feel like disappointing her. He agreed to visit the temple and all of them accompanied the girl to the temple. On entering the temple the girl vanished. Then the traders realized and believed that the girl was none other than Goddess Parvati of the temple. So they decided to rebuild the temple and built the temple.

Those who worshiped here:
Lord Brahma, Traders, ThiruNeelaNakka Nayanar and his wife and Shaiva Saint Sambandhar

Special Features:

1. In Goddess Ambika’s shrine, Ambika has a third eye just like Lord Shiva on her forehead. 

2. The idol of Lord Ardhanarishwarar has one leg on Nandi which is very rare and unique.

3. Lord Shanishwarar has one leg on his mount i.e crow.

4. Daily four rituals are conducted according to Rudrayamal Tantra Agama.

5. The sculptures of Lord Ayavandeeshwarar and Lord Balakrishna on the pillars are very attractive.

About Temple:

This is an east facing temple with a five tiered Rajagopuram surrounded by granite wall on all sides. The temple consists of Sanctum Sanctorum, Antarala, and Ardhamandap. There is a stucco arch at the center. Recently a mandap was built around the Sanctum.  Balipeetham and Nandi are facing the Sanctum. The sacred theertha (temple tank) is in the front of Rajagopuram. The Shiva Linga is a Swayambhu Linga and the Sanctum is in the shape of linga. There are blisters on Shiva Linga. There are Dwarapalakas on the entrance of the Sanctum. At the entrance of the Sanctum, we have the shrine of Lord Ganesha and Lord Dandapani.

Koshta Murtis: Lord Nardana Vinayaka, Lord Lingodbhavar, Lord Brahma, Lord Ardhanarishwarar, Sage Agastya, Aalingan Murti, Lord Bhikshadanar and Goddess Durga. 

Lord Ardhanarishwarar is in a standing position with his hand on Nandi. Goddess Ambika is in a separate shrine facing west. Her shrine is guarded by Dwarapalikas. She is depicted in a standing posture with four hands. She has a third eye on her forehead similar to Lord Shiva. There is a Nandi facing her Sanctum from a raised platform. Her shrine and Sanctum have separate entrances. In the parikrama of her shrine there are shrines of Lord Vinayaka, Lord Muruga and Lord Surya. Shayanagraha is in her shrine. 

Other shrines and idols in outer parikrama:
Lord Chandra, Lord Surya, Lord Shanishwarar with one leg on his mount, the crow, Sapta Matrika, Lord Bhairav, Navagraha, Mahalinga, Lord Kashi Vishwanath with Goddess Vishalakshi and Lord Ganesha. 

In the inner prakaram we come across Lord Subramanya with Valli and Deivanai, Goddess Gajalakshmi, Shaiva Saint Naaalvar, ThiruNeelaNakkaNayanar with his wife, Mangaiarkarasi, Lord Somaskandar, Lord Mahaganapati, Utsav Murtis and Nardana Sundarar.

In the Nataraja Sabha, we come across Lord Nataraja with Goddess Shivakami and Shaiva Saint Manikkavachagar. 

In the outer prakaram under the kshetra vruksha there are idols of Lord Ganesha and Shiva Linga. On the pillars we come across the sculptures of Lord Anjaneya with a bell on his tail and Lord Balakrishna crawling on his legs. 

Prayers:

1. This is a parihar sthala for Mula Nakshatra.

2. Devotees worship here for removal of marriage obstacles, excellence in education and knowledge and prosperity.

Pooja:
Daily four rituals according to agama rules. Pradosh pooja.

Important Festivals:

Avani (Aug-Sept): Ganesh chaturthi and festival on mula nakshatra.

Aippasi (Oct-Nov): Annabhishek

Margazhi (Dec-Jan): Thiruvathirai

Masi (Feb-Mar): Mahashivaratri

Temple Timings: 6 am to 11 am, 4 pm  to 8.30 pm 

Address:

Shri Ayavandeeshwarar Temple at Seeyathamangai,
Taluka and district: Nagapatiinam,
Tamil Nadu 609702

Phone: +91-4366270073, +91-9751075028

Courtesy: Various websites and blogs

Sunday, July 19, 2026

थिरुमारुगल येथील श्री रत्नगिरीश्वरर मंदिर

हे मंदिर कुंभकोणम-नागपट्टीनं मार्गावर आहे. कुंभकोणम पासून ४६ किलोमीटर्सवर, मयीलादुथुराई पासून ३८ किलोमीटर्सवर, थिरुवारुरपासून २५ किलोमीटर्सवर थिरूकंदपूरम पासून ८ किलोमीटर्सवर आणि नन्नीलं पासून १७ किलोमीटर्सवर आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत संबंधर, अप्पर आणि वल्ललर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी ह्या मंदिरातील श्री मुरुगन ह्यांची स्तुती गायली आहे. हे कोचेंगट चोळा राजाने बांधलेल्या ७० माड कोविल पैकी एक मंदिर आहे. हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. असा समज आहे की हे मंदिर ३ऱ्या शतकात बांधलं असावं. चोळा राजांनी ह्या मंदिराची ग्रॅनाईट वापरून पुनर्निर्मिती केली आणि नायक आणि मराठा राजांनी जीर्णोद्धार केला. इथल्या शिलालेखांमध्ये सरभोजी ह्या मराठा राजाने तसेच इतरांनी मंदिराला दिलेल्या देणग्यांचे उल्लेख आहेत.

मूलवर: श्री रत्नगिरीश्वरर, श्री माणिक्कवन्नर
देवी: श्री वंदरकुळली
पूजा / आगम: कामीग आगम
पवित्र तीर्थ: लक्ष्मी तीर्थ, माणिक तीर्थ
पवित्र वृक्ष: मारुगल (तामिळ मध्ये एक प्रकारचे केळ्याचे झाड)
पुराणिक नाव: मारुगल, थिरुमारुगल
वर्तमान नाव: थिरुमारुगल

क्षेत्र पुराण:

१. पुराणानुसार एकदा ऋषींमध्ये भगवान शिव, श्री ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू ह्यांमध्ये कोण श्रेष्ठ आहे ह्यावर वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी भृगु ऋषी भगवान शिव आणि श्री ब्रह्मदेव ह्यांना भेटायला गेले. त्यांना तिथे अपेक्षित मान नाही मिळाला असं वाटलं म्हणून ते भगवान विष्णूंकडे गेले. त्यावेळी भगवान विष्णू श्री लक्ष्मीदेवींबरोबर होते. भृगु ऋषींना दोन मुहूर्त वाट पाहून पण भगवान विष्णूंना भेटता नाही आलं म्हणून त्यांना क्रोध आला आणि त्यांनी विष्णूंच्या हृदयावर लाथ मारली. भगवान विष्णूंनी भृगु ऋषींची पाऊलं धरून ती प्रेमाने चोळली. श्री लक्ष्मी भगवान विष्णूंच्या हृदयात वास करतात म्हणून भगवान विष्णू भृगु ऋषींची पाऊलं चोळत आहेत हे पाहून लक्ष्मीदेवींना क्रोध आला. त्या भगवान विष्णूंना सोडून गेल्या आणि जाताना भगवान विष्णूंना त्यांच्याकडे म्हणजेच लक्ष्मीदेवींकडे जायला भाग पाडतील असं सांगून गेल्या. त्यांनी बऱ्याच तीर्थक्षेत्रांना भेट दिलीआणि शेवटी त्या इथे कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आल्या. त्यांनी इथे एक तीर्थ बनवलं आणि श्री विष्णूंशी पुनर्मीलन व्हावं म्हणून भगवान शिवांची उपासना केली. ह्या तपश्चर्येमध्ये त्यांनी वरलक्ष्मी व्रत पाळलं. शेवटी भगवान शिवांनी भगवान विष्णू इथे आणून त्यांचा मिलन घडवून आणलं. ह्या घटने स्मृत्यर्थ इथल्या तीर्थाला लक्ष्मी तीर्थ संबोधलं जातं.

२. स्थळ पुराणानुसार हे स्थळ रानटी झुडपे, लहान झुडपे आणि काटेरी झाडे ह्यांनी भरलेले वन होते. कुषकेतू नावाचा राजा इथे वन साफ करत होता. साफ करताना एकदा कुदळ एका कठीण वस्तूवर लागली. राजाने तिथली जागा स्वच्छ केली तेव्हा त्याला शिव लिंग दिसले. इथे अजूनही शिव लिंगावर कुदळीचा व्रण दिसतो.

३. स्थळ पुराणानुसार पांड्या राज्यामध्ये धमनीन नावाचा एक व्यापारी राहत होता. आपली सर्वात थोरली मुलगो तुला देईन असं वचन त्याने आपल्या भाच्याला देऊन त्याला आपल्याकडे कामाला ठेऊन घेतले. पण त्याने वचन मोडून आपल्या थोरल्या मुलीचे लग्न आपल्या पसंतीच्या मुलाबरोबर लावून दिले. त्याने नंतर त्या भाच्याला त्याची दुसरी मुलगी देण्याचे वचन दिले. ते वचन पण त्याने मोडले आणि आपल्या दुसऱ्या मुलीचे पण लग्न आपल्या पसंतीच्या मुलाबरोबर लावून दिले. असं करत करत त्या व्यापाऱ्याने आपल्या सहा मुलींची लग्न वचन मोडून आपल्या पसंतीच्या मुलांबरोबर लावून दिली. सातव्या मुलीला हे आपल्या वडलांचं वचन मोडणं आवडलं नाही. ती त्या तरुण मुलाशी, म्हणजेच व्यापाऱ्याच्या भाच्याशी लग्न करण्याचे ठरवून त्याला घेऊन ती दुसऱ्या गावात गेली. वाटेवर ते थिरुमारुगल इथे रात्री विश्रांतीसाठी थांबले. त्या रात्री त्या मुलाला सर्पाने दंश केला. ती मुलगी खूप व्यथित झाली कारण तिला तिथे मदतीला कोणीच नव्हतं. तिने भगवान शिवांची प्रार्थना केली. शैव संत संबंधर त्यावेळी मंदिराकडे जात होते आणि त्यांनी ह्या मुलीचं आक्रंदन ऐकलं. त्यांचं हृदय कालवलं आणि त्यांनी तिच्या मदतीसाठी भगवान शिवांची स्तुती गायली. भगवान शिव त्या स्तुतीने प्रसन्न झाले आणि त्यांनी श्री विनायकांमार्फत त्या मुलाचे विष काढून घेतले. भगवान शिव त्या मुलीच्या आणि मुलाच्या समोर प्रकट झाले. संबंधरांनी भगवान शिवांसमक्ष त्या दोघांचा विवाह करविला. श्री विनायकांना इथे विष-तीर्थ-विनायक असे संबोधले जाते (म्हणजे ज्यांनी विष काढून घेतले).

४.  सर्पाचा दंश झालेल्या मुलाला वाचविल्यानंतर संबंधर थिरुमारुगल इथेच राहिले. संबंधर इथे वास्तव्य करून असताना एकदा सिरूथोंडर नायनार इथे आले आणि त्यांनी संबंधरांना थिरुचेनगट्टनकुडी इथल्या मंदिरात येण्याचं निमंत्रण दिलं. थिरुचेनगट्टनकुडीला निघण्याच्या आधी संबंधर आणि सिरूथोंडर नायनार थिरुमारुगल इथल्या मंदिरात आले आणि त्यांनी इथे भगवान शिवांची पूजा केली. जेव्हा ते मंदिरातून निघण्याच्या तयारीत होते त्यावेळी भगवान शिवांनी त्यांना थिरुचेनगट्टनकुडी येथील श्री गणपतीश्वरर रूपांत दर्शन दिले. त्यावेळी संबंधर ह्यांनी दोन्ही मंदिराची स्तुती ह्याच ठिकाणी गायली. 

५. मागच्या लेखात आम्ही चार अंबिका देवींचा उल्लेख केला होता. त्या चार पैकी श्री वंदरकुळली ह्यांनी इथल्या मंदिरातील भगवान शिवांशी विवाह केला. नंतर त्यांनी एका गर्भवती स्त्रीला तिच्या प्रसूतीमध्ये मदत केली. आणि त्यानंतर त्या मंदिराच्या बाहेरच राहिल्या. म्हणून इथे श्री वंदरकुळली ह्यांचे देवालय मंदिराच्या बाहेर आहे.

६. पुराणानुसार श्री ब्रह्मदेवांनी इथे त्यांची लोप पावलेली शक्ती परत प्राप्त करण्यासाठी इथे तपश्चर्या केली. 

७. स्थळपुराणानुसार पराशर ऋषींनी त्यांच्याकडून घडलेल्या पापांचं क्षालन करण्यासाठी इथे तपश्चर्या केली.

८. स्थळपुराणानुसार एकदा इथे प्रखर दुष्काळ पडला होता. तेव्हा भगवान शिवांनी रत्न पुरवून दुष्काळ घालवला. म्हणून इथे भगवान शिवांना माणिक्कवनर किंवा रत्नगिरीश्वरर असे संबोधले जाते.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
पराशर ऋषी, श्री ब्रह्मदेव, भृगु ऋषी, श्री लक्ष्मी देवी, कुषकेतु राजा.

वैशिष्ट्ये:

१. इथले शिव लिंग स्वयंभू आहे.

२. इथले मुख्य दैवत (मूलवर) श्री गणेश आहेत.

३. असा समज आहे कि ह्या मंदिरात जे उपासना करतात त्यांना कधीही सर्पदंश आणि इतर विषारी किड्यांचा उपद्रव होत नाही.

४. ह्या क्षेत्राला पूर्वी कदलीवन असे नाव होते.

५. इथल्या क्षेत्र वृक्षाची फळे खूप गोड आहेत. पण हे वृक्ष जर मंदिराच्या बाहेर लावलं तर ते वाढत नाही.

मंदिराबद्दल माहिती:

ह्या मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत. मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ, महामंडप आणि मुखमंडप आहेत. पूर्वेकडील प्रवेशाच्या इथे पांच स्तरांचं राजगोपुर आहे तर दक्षिणेकडील प्रवेशाच्या इथे तीन स्तरांचं राजगोपुर आहे.

इथे दोन परिक्रमा आहेत आणि त्या भिंतींनी आच्छादलेल्या आहेत. राजगोपुराच्या पुढे ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदी गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. ध्वजस्तंभाच्या डावीकडे शमी वृक्षाच्या खाली एक फलाट (प्लॅटफॉर्म) आहे. 

असा समज आहे कि शैव संत संबंधर ह्यांनी एका तरुण मुलाचा विवाह एका तरुण मुलीबरोबर भगवान शिवाच्या समक्ष घडवून आणला. 

इतर माड कोविल मंदिरांप्रमाणे इथेपण थोड्या उंचावर असलेल्या गाभाऱ्यात काही पायऱ्या चढून जायला लागतं. 

शिव लिंग स्वयंभू आहे. ते पूर्वाभिमुख असून एका चौथऱ्यावर (अवूदयार) आहे. गाभाऱ्याचा आकार शिव लिंगासारखा आहे. 

कोष्ठ मूर्ती: श्री विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिङ्गोद्भवर, श्री ब्रह्मदेव आणि श्री दुर्गा देवी. 

श्री चंडिकेश्वरांचे देवालय त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी आहे. 

श्री अंबिका देवींचे देवालय मुखमंडपामध्ये उजव्याबाजूला आहे आणि ते दक्षिणाभिमुख आहे. अंबिका देवींच्या देवालयाजवळ श्री चंडिकेश्वरींचे देवालय आहे. ह्या देवालयामध्ये काही चित्रे आहेत ज्यामध्ये कुषकेतु राजाचे पुराण तसेच संबंधरांनी तरुण मुलाला सर्प दंशापासून वाचविल्याची कथा चित्रित केली आहेत. श्री शनीश्वरांचे देवालय श्री अंबिका देवींच्या देवालयाच्या उजव्या बाजूला आहे. 

महामंडपामध्ये नटराज सभा आहे. ह्या सभेमध्ये पतंजली ऋषी, व्याघ्रपाद ऋषी तसेच तरुण मुलाची चित्रे आहेत. 

परिक्रमेमधली इतर देवालये आणि मूर्ती: श्री सोमस्कंदर, श्री माणिक्कवनर, शैव संत नालवर, ६३ नायनमार, श्री प्रार्थना विनायक, शिव लिंगाची पूजा करत असलेले पराशर ऋषी, वल्ली आणि दैवानै समवेत श्री सुब्रमण्यम. 

आतल्या परिक्रमेमध्ये चौथऱ्यावर पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: श्री महालक्ष्मी, नटराज सभा, नवग्रह, श्री भैरव, श्री चंद्र, श्री सूर्य, नाग, तरुण मुलगा आणि तरुण मुलगी.

ह्याशिवाय बाहेरील परिक्रमेमध्ये सप्त मातृका, श्री गणेश आणि श्री सौंदर्यनायकी आहेत. 

मंदिराच्या तीर्थाच्या काठावर श्री मुथू विनायक ह्यांची मूर्ती आहे.

जमिनीच्या पातळीवरील परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: श्री तीर्थ विनायक (ज्वरतीर्थ विनायक), श्री संतन विनायक, श्री सौंदर्यनायकींसमवेत श्री मारुगल उदयार.

श्री विषम-तीर्थ-विनायकांच्या दोन बाजूला श्री गणेशाच्या मूर्ती आहेत. असा समज आहे की सिरूथोंडर नायनार ह्यांचा पुत्र सिरलन ह्याने ह्या मूर्तींची पूजा केली. 

वरच्या भागात प्रवेशद्वाराच्या डाव्याबाजूला भात साठविण्यासाठी धान्याचे कोठार आहे. (तामिळ मध्ये ह्याला नेल कळंजूयं असं म्हणतात).

प्रार्थना

१. भाविक जन इथे विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी तसेच अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना करतात.

२. भाविक जन ज्वर बरा होण्यासाठी तसेच इतर आरोग्याच्या समस्यांसाठी ज्वरतीर्थ विनायकांची पूजा करतात.

३. भाविक जन इथे परिस्थितीमुळे किंवा गैरसमजुतीमुळे विभक्त झालेल्या दाम्पत्यांचे पुनर्मीलन होण्यासाठी श्री लक्ष्मी देवी आणि भगवान शिवांची पूजा करतात.

पूजा:

कामीग आगमानुसार नियमित पूजा केल्या जातात तसेच प्रदोष पूजा, दिवाळीत विशेष पूजा आणि पोंगल, इंग्लिश नववर्ष आणि तामिळ नववर्ष दिनी पूजा केल्या जातात.

मंदिरात साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): १० दिवसांचा ब्रह्मोत्सव

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): वरलक्ष्मी व्रत, गणेश चतुर्थी

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई 

थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति, पुष्य नक्षत्र दिवशी उत्सव

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते दुपारी १२.३०, दुपारी ४.३० ते रात्री ८.३०

मंदिराचा पत्ता:

थिरुमारुगल येथील श्री रत्नगिरीश्वरर मंदिर,
तालुका आणि जिल्हा नागपट्टीनं,
तामिळ नाडू ६०९७०२

मंदिराच्या पुजाऱ्याचा संपर्क: सुंदर गणपती गुरुक्कल - +९१-९७८६१९२१९६


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


Thursday, July 16, 2026

Shri Ratnagirishwarar Temple at Thirumarugal

This place is on the Kumbhakonam-Nagapattinam route. It is about 46 kilometers from Kumbhakonam, 38 kilometers from Mayiladuthurai, 25 kilometers from Thiruvarur, 6 kilometers from Thirukandapuram, 17 kilometers from Nannilam. This Padal Pethra Sthalam is on the southern bank of Kaveri and is revered by Shaiva Saints Sambandhar, Appar and Vallalar. Saint Arunagirinathar has praised Lord Muruga of this temple in his sacred hymns. This is one of the Mada kovils built by Kochengat Cholan and must have existed even before the 7th century. It is believed to have been constructed in the 3rd century. It was later reconstructed by Chola kings into granite structure and was later renovated by Nayaks and Maratha rulers. There are stone inscriptions in the temple which speak about the endowments made by Maratha king Sarabhoji and others. 

Moolavar: Shri Ratnagirishwarar, Shri Manikkavannar
Devi: Shri Vandarkuzhali
Pooja / Agama: Kameega Agama
Sacred Theertha: Lakshmi Theertha, Manik Theertha
Sacred Vruksha: Marugal (in Tamil a kind of plantain tree)
Puranik Name: Marugal, Thirumarugal
Present Name: Thirumarugal

Kshetra Purana:

1. According to the Puran, once there was an argument amongst the sages about the greatness of Lord Shiva, Lord Brahma and Lord Vishnu. To clarify this argument, Sage Bhrigu went to meet Lord Shiva and Lord Brahma. At that time he felt that he was not given due respect. Hence he went to Lord Vishnu in Vaikuntha. When he went there Lord Vishnu was with Goddess Lakshmi. He waited for about two muhurtas but could not meet Lord Vishnu. He got angry and kicked Lord Vishnu on the chest. Lord Vishnu got up and massaged the feet of Sage Bhrigu. As Goddess Lakshmi resides in the heart of Lord Vishnu, she got angry with Lord Vishnu for touching the feet of Sage Bhrigu. She left Lord Vishnu stating that she will make him (Lord Vishnu) come to her place. She visited many sacred places and reached this place on the southern bank of Kaveri. She dug a pond and did penance on Lord Shiva for reuniting with Lord Vishnu. She observed Varalakshmi Vrat during the penance. Finally Lord Shiva brought Lord Vishnu to this place and united them. In memory of this event, the sacred theertha is known as Lakshmi Theertha. 

2. As per the Sthala Puran, this place was a forest with wild bushes, shrubs and thorns. A king named Kushaketu was clearing this place. At that time there was a sound. When the shovel hit some hard thing on the ground, and when the king cleared that place, he found a Shiva Linga. The shovel had made a mark on Shiva Linga which is visible even now. 

3. According to the Sthala Puran, there was a merchant named Dhamanin in the Pandya kingdom. He promised his nephew that he would give his eldest daughter in marriage to him and made him work at his place. Later he got her married to someone else because of his greed. Again he promised his nephew that he will give his second daughter in marriage to him. This time also he did not keep the promise. In this manner he got six of his daughters married to someone else. He made this promise with his youngest (seventh) daughter also. The youngest daughter did not approve of his breaking the promise for the last six times. Hence one day she eloped with the young man (nephew of her father) and planned to get married in the next city. On the way they stopped at Thirumarugal for the night. A snake bit the young man at night. The girl was in distress as she had no one to turn to for help. As she had run away from her parents, she was lamenting and praying to Lord Shiva. Shaiva Saint Sambandhar who was passing through this place on his way to the temple heard the cries of the girl. He was moved by her plight. He sang a sacred hymn, pleading to Lord Shiva explaining the plight of the girl. Lord Shiva was moved by the hymn. He removed the snake poison through Lord Vinayaka. Lord Shiva appeared in front of the couple. Sambandhar performed marriage of young man and young girl in front of Lord Shiva. Lord Vinayaka is praised at this place as Visham-Theertha-Vinayaka (in Tamil Visham means poison, theertha means removed, that is Vinayaka who removed poison). 

4. After saving the young man Sambandhar stayed at Thirumarugal. At that time Siruthondar Nayanar came to this place and invited Sambandhar to visit Thiruchengatankudi Temple. Before leaving, Sambandhar and Siruthondar came to Thirumarugal temple and worshiped Lord Shiva. When they were about to leave the temple, Lord Shiva provided them with the darshan of Thiruganapatishwarar of Thiruchengatankudi temple at this place itself. At that time Shaiva Saint Sambandhar sang a common sacred hymn for both the temples at this place itself.

5. In our last blog we mentioned about the four Ambikas. One of the four Ambikas, namely Vandarkuzhali married Lord Shiva at this temple. Later these four Ambikas helped in the delivery of a pregnant lady and after performing the delivery they stayed outside the temple. Hence we find shrine of Vandarkuzhali outside the main temple. 

6. According to the Puran, Lord Brahma did penance at this place to regain his lost power. 

7. As per the Sthala Puran, Sage Parashar performed penance at this place as an atonement for the sin committed by him. 

8. According to Sthala Puran, once there was a great famine around this place. At that time Lord Shiva showered precious gems (stones) and eradicated the famine. Hence he is praised as Manikkavannar / Ratnagirishwarar

Those who worshiped here:
Sage Parashar, Lord Brahma, Sage Bhrigu, Goddess Lakshmi and King Kushaketu

Special Features:

1. Shiva Linga is a Swayambhu Linga.

2. Lord Ganesha is the main deity in this temple.

3. It is believed that those who have worshiped in this temple are not affected by snake bites and bites by other poisonous insects.

4. This kshetra was known earlier as Kadalivana Kshetra.

5. The kshetra vruksha is very sweet but it does not grow if planted outside the temple.

6. There is a scar on the Shiva Linga made by a shovel.

About Temple:

The temple consists of Sanctum, Antarala, Mahamandap and Mukhamandap and has two entrances. The east facing entrance has a five tiered Rajgopuram whereas the south entrance has three tiered Rajagopuram. There are two prakarams enclosed by the wall. We come across Dhwajastambha, Balipeeth and Nandi after the Rajagopuram facing the Sanctum. To the left of Dhwajastambha there is a platform under Shami tree. It is believed that Shaiva Saint Sambandhar performed the marriage of the young man and young woman at this place. Like other Mada kovils we have to climb a few steps to reach the sanctum which is at the higher level. Shiva Linga is a Swayambhu Linga facing the east on a square avudayar. The sanctum is shaped like a Shiva Linga. 

Koshta Murtis: Lord Vinayakar, Lord Dakshinamurti, Lord Lingodbhavar, Lord Brahma and Goddess Durga.

The shrine of Chandikeshwarar is in a usual position. The shrine of Ambika is located in the Mukhamandap on the right side and it is facing south. There is a shrine of Chandikeshwari near Ambika’s shrine. There are paintings in her shrine which depict the puran of King Kushaketu and Sthala puran of Sambandhar saving the young man from snake bite. The shrine of Lord Shanishwarar is on the right side of Ambika’s shrine. Nataraja Sabha is in the Mahamandap. There are paintings of Sage Patanjali, Vyaghrapad and the young man in this Nataraja sabha. 

Other shrines and idols in the prakaram: Lord Somaskandar, Lord Manikkavannar, Shaiva Saint Naalvar, Sixty three Nayanmars, Lord Prarthana Vinayakar, Sage Parashar worshiping a Shiva Linga and Lord Subramanya with Valli and Deivanai. In the inner prakaram, we come across Goddess Mahalakshmi, Nataraj Sabha, Navagraha, Lord Bhairav, Lord Chandra, Lord Surya, Serpents (Naga), young woman and young man on a platform. 

Besides these we come across Sapta Matrika, Lord Ganesha, Goddess Saundarya Nayaki in the outer prakaram. On the bank of the temple tank, we come across the idol of Shri Muthhu Vinayakar. In the parikrama on the ground level we come across the idols and shrines of Lord Theertha Vinayakar (Jwara Theertha Vinayakar), Lord Santan Vinayakar, Lord Marugal Udayar with Saundarya Nayaki. There are two Ganesha idols on both sides of Visham-Theertha-Vinayakar believed to have been worshiped by Seralan (son of Siruthondar Nayanar). On the upper level to the left of the entrance there is a barn for storing paddy (Nel Kalanjuyam in Tamil).   

Prayers:

1. Devotees worship here for removal of marriage obstacles and for child boon. 

2. Devotees pray to Lord Jwara Theertha Vinayakar for getting rid of fever and health problems.

3. Devotees worship Goddess Lakshmi and Lord Shiva for the reunion of an estranged or separated couple due to misunderstanding.

Pooja:

Regular pooja according to Kameega Agama, Pradosh pooja, Special pooja on Diwali, Pongal, Tamil and English New Year.

Festivals:

Chitrai (April-May): 10 days of Brahmotsav

Avani (August-September): Varalaskhmi Vrat, Ganesh Chaturthi

Purattasi (September-October): Navaratri

Aippasi (October-November): Annabhishek and Skanda Shashthi

Karthigai (November-December): Thiru Karthigai

Thai (January-February): Makar Sankranti and festival on the day of Pushya Nakshatra

Maasi (February-March): Mahashivaratri

Temple Timings: 7 am to 12.30 pm, 4.30 pm to 8.30 pm

Address:

Shri Ratnagirishwarar Temple at Thirumarugal,
Taluka and District Nagapattinam,
Tamil Nadu 609702

Contact # of priest: Sundar Ganapati Gurukkal +91-9786192196

Courtesy: various websites and blogs


Sunday, July 12, 2026

थिरुचेनकट्टनगुडी येथील श्री गणपतीश्वरर / श्री उत्तरपशुपतीश्वरर मंदिर

हे मंदिर थिरुकन्नपुरम पासून ३ किलोमीटर्सवर, थिरुमारुगलपासून ३ किलोमीटर्सवर, कारैक्कल पासून २० किलोमीटर्सवर, थिरुवारुरपासून १५ किलोमीटर्सवर तर नन्नीलं पासून १५ किलोमीटर्सवर आहे. थिरुपुगलूर पासून खूप जवळ आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत संबंधर आणि अप्पर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. म्हणून हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. चोळा साम्राज्याच्या काळामध्ये ह्या मंदिराची पुनर्निर्मिती झाली. पल्लव राजांनी ह्या मंदिराचा विस्तार केला. इथल्या शिलालेखांमध्ये चोळा राजांनी मंदिरासाठी दिलेल्या देणग्या आणि भेटवस्तूंचे उल्लेख आहेत. सिरूथोंडर नायनार ह्या नायनमारांचे हे जन्मस्थान आहे. ते पल्लव साम्राज्याचे सेनापती होते. ह्या मंदिराचे पूर्वीचे नाव परयुर असे होते. 

मूलवर: श्री गणपतीश्वरर, श्री उत्तरपतीश्वरर, श्री उत्तरपशुपतीश्वरर

देवी: श्री वैथरथिरुकुळली, श्री उमैनायकी

पवित्र तीर्थ: सूर्य तीर्थ, चंद्र पुष्करिणी, इथल्या विहिरीला तीर्थविहीर म्हणतात

पवित्र वृक्ष: औदुंबर, उंबर

पुराणिक नाव: गणपतीचरम, रक्तारण्य क्षेत्र

वर्तमान नाव: थिरुचेनकट्टनकुडी

क्षेत्र पुराण:

१. स्थळ पुराणानुसार परमज्योती नावाचे पल्लव साम्राज्याचे सेनापती होते. ते इथे राहत होते. ते भगवान शिवांचे परम भक्त होते. भगवान शिवांच्या कृपेने त्यांनी पल्लव साम्राज्याला अनेक युद्धांमध्ये विजय मिळवून दिला होता. राजाला त्याच्या शिव भक्तीची आणि तो शिव भक्तांना करीत असलेल्या मदतीची माहिती झाली. त्याला असं वाटलं की युद्ध करताना परमज्योतीचे काही बरंवाईट झालं तर तो भगवान शिवांचा खूप मोठा अपमान होईल. म्हणून राजाने परमज्योतींना फक्त शिव भक्तीवरच लक्ष केंद्रित करायला सांगितलं. परमज्योतींनी मंगैनल्लळ नावाच्या स्त्रीशी विवाह केला. त्यांना एक पुत्र झाला ज्याचे नाव त्यांनी चिरलन असे ठेवले. हे कुटुंब रोज शिव भक्तांना अन्न देऊन मगच भोजन करायचे. त्यांच्या दारी आलेल्या कुठल्याही याचकाला ते परत पाठवायचे नाहीत. एके दिवशी त्यांच्याकडे कोणीच आले नाही. म्हणून परमज्योती शिवभक्तांच्या शोधात घराबाहेर गेले. त्यावेळी भगवान शिव शिवभक्ताचे रूप घेऊन त्यांच्या घरी गेले. परमज्योतींच्या पत्नीने आणि सेवकांनी त्यांचे स्वागत केलं आणि त्यांना अन्न ग्रहण करण्याची विनंती केली. पण शिवभक्ताच्या रूपांत असलेल्या भगवान शिवांनी परमज्योती घरात नसल्याने अन्न ग्रहण करण्यास नकार दिला. मंदिरातील क्षेत्र वृक्षाखाली ते थांबतील असं सांगून ते निघून गेले. परमज्योती जेव्हा परत आले तेव्हा त्यांना शिवभक्त मंदिरात त्यांच्यासाठी थांबले आहेत हे लक्षात आलं. परमज्योती मंदिरात गेले आणि त्यांनी शिवभक्ताला आपल्या घरी येऊन अन्न ग्रहण करण्याची विनंती केली. शिवभक्त परमज्योतींना म्हणाले कि ते परमज्योतींचा पुत्र चिरलन ह्याच्या शरीरापासून शिजवलेले अन्न ग्रहण करतील. परमज्योती घरी आले आणि त्यांनी चिरलनला मारून त्याचे अन्न शिजवले. जेव्हा शिवभक्त जेवावयास बसले त्यावेळी त्यांनी परमज्योतींना त्यांच्या पुत्राला हाक द्यायला सांगितलं जेणेकरून ते त्या पुत्रासमवेत जेवतील. परमज्योती, त्यांच्या पत्नी आणि सेवक बाहेर जाऊन चिरलनला हाक मारू लागले. चिरलन हाकेला प्रतिसाद देऊन परत आलेला पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले. ते जेव्हा घरात परत आले त्यावेळी भगवान शिवांनी श्री पार्वतीदेवींसमवेत त्यांना दर्शन दिलं. म्हणून भगवान शिवांना इथे श्री उत्तरपशुपतीश्वरर असं संबोधलं जातं. इथे क्षेत्र वृक्षाखाली पशुपतीश्वरर ह्यांची मूर्ती आहे. पुढे जाऊन परमज्योतींना नायनार पदवी मिळाली आणि ते सिरूथोंडर नायनार ह्या नावाने प्रसिद्धी पावले. 

२. स्थळ पुराणानुसार इथली श्री गणपतींची मूर्ती वातापी (सध्याचे बदामी) इथून आली असावी असा समज आहे. पुलिकेसी विरुद्धच्या युद्धामध्ये परमज्योतींनी वातापी येथे श्री गणपतींची पूजा केली. ते युद्ध जिंकले आणि त्यांना श्री गणपतींची मूर्ती मिळाली. परमज्योतींनी इथे श्री गणपतींची स्थापना केली. म्हणून इथे श्री गणपतींना वातापी गणेश असे संबोधले जाते.

३. पुराणानुसार गजमुखासुराचा वध केल्यानंतर श्री गणपतींना दोष प्राप्त झाला. असा समज आहे की त्यांनी इथे येऊन शिव लिंगाची पूजा केली. भगवान शिवांनी त्यांना दर्शन दिल्यानंतर त्यांचे दोष निवारण झालं. म्हणून इथे भगवान शिवांना श्री गणपतीश्वरर असे संबोधले जाते. जेव्हा गजमुखासूराचे रक्त जमिनीवर वाहिले त्यावेळी त्याचा अंत झाला. म्हणून ह्या स्थळाला रक्तारण्य क्षेत्र असे नाव प्राप्त झाले (तामिळ मध्ये थिरुचेनगट्टनकुडी). असा समज आहे देवाने रक्तबीज आणि इतर असुरांचा वध केला. 

४. स्थळपुराणानुसार इथे जो राजा राज्य करत होता तो शिवभक्त असल्याकारणाने त्याने भगवान शिवांच्या कृपेने अपत्यप्राप्ती व्हावी म्हणून यज्ञ केला. त्यावेळी आकाशवाणीने सांगितले कि श्री पार्वती देवी त्याची पुत्री म्हणून जन्म घेतील. एकदा राजा शिकारीला गेलेला असताना त्याला चार मुली दिसल्या. त्याने त्या मुलींना आपल्या पुत्री समजून त्यांचे संगोपन केले. त्या मुली लहान वयापासूनच भगवान शिवांच्या उत्कट भक्त होत्या. त्या जेव्हा विवाहयोग्य झाल्या त्यावेळी राजाने भगवान शिवांना त्या मुलींबरोबर  विवाह करण्याची विनंती केली. भगवान शिवांनी ती विनंती मान्य केली आणि विवाह केला. त्या मुली विवाह करून ह्या स्थळाच्या आजूबाजूला राहिल्या. यांची नावे अशी १) रामनंदीचरम येथे श्री सरीवरकुळली, २) ह्याठिकाणी श्री वैथकारूकुळली, ३) थिरुपुगलूर येथे श्री करुंधर कुळली आणि ४) थिरुमरुगल येथे श्री वरंदर कुळली. ह्या सगळ्यांना एक एकत्र नाव आहे - शूलीअंबळ.

५. स्थळ पुराणानुसार इथे एक गरीब स्त्री होती जी अंबिकादेवींची उत्कट भक्त होती. एकदा ती गर्भवती असताना तिची प्रसूतीची वेळ आली. त्या रात्री तिची आई काही कामासाठी नदीच्या पलीकडील गावामध्ये गेली होती. अचानक मुसळधार पाऊस चालू ती नदीच्या पलीकडेच अडकून पडली. त्याचवेळी ह्या स्त्रीला प्रसूतिवेदना चालू झाल्या. असा समज आहे कि अंबिका देवींनी येऊन तिची प्रसूती केली. म्हणून ह्या चार अंबिकांना शूलाम्बिका (तामिळ शूल म्हणजे गर्भ) असे संबोधले जाते. अंबिका देवी प्रसूतीसाठी मंदिराच्या बाहेर आल्याने त्या परत जाऊ शकल्या नाहीत. म्हणून ह्या चार मंदिरांमध्ये अंबिका देवींचे देवालय मंदिराच्या बाहेर आहे. ह्या मंदिरांमध्ये अर्धजाम पूजेच्या समयी मिरी, मीठ, तूप आणि जीरा मिश्रित भात नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो.

६.  एकदा राजाला भगवान शिव ज्यांनी सिरूथोंडर नायनार ह्यांना दर्शन दिलं, त्यांची मूर्ती बनविण्याची इच्छा झाली. बऱ्याच प्रयत्नानंतरपण मूर्तिकार मूर्ती बनवू शकले नाहीत. एकदा एक शिवभक्त त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पाणी मागितलं. मूर्तिकार विमनस्क अवस्थेत असल्याने त्यांनी चुकून पाण्याच्या ऐवजी वितळलेले धातू त्या शिवभक्ताला प्यायला दिले हे त्यांना लक्षात आले नाही. शिवभक्तांनी ते प्यायलाबरोबर ते मूर्तीमध्ये रूपांतरित झाले. राजाला हे कळल्यावर त्याने त्या मूर्तीची (श्री उत्तरपशुपतीश्वरर) स्थापना केली. त्या मूर्तीच्या कपाळावर वितळलेल्या धातूचा एक थेंब होता. जेव्हा मूर्तिकारांनी छिन्नीने त्या थेंबाला स्पर्श केला त्यावेळी तिथे जखम झाली आणि त्यातून रक्त वहायला लागले. त्यांनी त्या जखमेवर कापूर आणि हळद लावल्यावर तेथून रक्त येणे थांबले. अजून पण त्या मूर्तीच्या कपाळावर त्या जखमेचा व्रण बघावयास मिळतो. 

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

सिरूथोंडर नायनार समवेत त्यांच्या पत्नी आणि त्यांचा पुत्र, राजा, श्री गणेश आणि श्री भैरव

वैशिष्ट्ये:

१. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. 

२. श्री उत्तरपशुपतीश्वरर ह्यांच्या मूर्तीमध्ये त्यांच्या कपाळावर एक जखमेचा व्रण दिसतो. 

३. इथे एका रांगेत भगवान शिवांच्या संहार मूर्ती आहेत. ह्या मूर्ती अद्वितीय आहेत आणि अशा मूर्ती कुठे दुसरीकडे बघावयास मिळत नाहीत.

४. श्री सुब्रमण्यम त्यांच्या पत्नीसमवेत मोराच्या रूपांत असलेल्या असुरावर बसले आहेत.

५. शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी ह्या मंदिरातल्या श्री सुब्रमण्यम ह्यांची स्तुती गायली आहे.

६. कोष्टामधल्या श्री दुर्गादेवी अष्टभुजा आहेत आणि त्यांच्या हातामध्ये शस्त्रे आहेत. 

७. नवग्रह देवालयामध्ये श्री सूर्य थोड्या उंचावर आहेत.

८. भगवान शिवांच्या नवतांडव क्षेत्रांमधलं हे एक क्षेत्र आहे. 

९. हे जरी भगवान शिवांचं मंदिर असलं तरी हे मंदिर श्री गणेशांचं मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.

मंदिराबद्दल माहिती:

ह्या मंदिराचे आवार साधारण २ एकर वर पसरले आहे. मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्धमंडप आहेत. हे अशा स्थळांपैकी एक आहे जिथे भगवान शिवांनी थिरुविलयावल नावाचा नाट्यप्रयोग सादर केला.

हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्याला पांच स्तरांचं राजगोपुर आहे. मंदिराच्या तीर्थाचं नाव सत्य तीर्थ आहे. ह्या तीर्थाच्या काठावर श्री विनायकांची मूर्ती आहे ज्याचे नाव श्री मंगल विनायक असे आहे. मुख मंडपामध्ये ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदी आहेत. दुसऱ्या पातळीवर तीन स्तरांचं अजून एक राजगोपुर आहे. इथे भगवान शिवांचे बैठ्या मुद्रेमधले एक स्टुक्कोचे चित्र आहे ज्यामध्ये त्यांच्या बरोबर सिरूथोंडर नायनार आहेत. इथले शिव लिंग स्वयंभू आहे आणि त्याच्या वरती एक व्रण आहे. 

कोष्ठ मूर्ती: श्री दक्षिणामूर्ती, श्री लिङ्गोद्भवर, श्री अर्धनारीश्वरर आणि श्री दुर्गादेवी. 

शिव लिंगाजवळ श्री उत्तरपशुपतीश्वरर ह्या रूपांतून भगवान शिव भक्तांवर कृपावर्षाव करतात. त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ, छोटा डमरू (तामिळ मध्ये उडूक्कई) आणि भिक्षापात्र (तामिळमध्ये थिरुवोडू) आहे. ह्या रूपामध्ये ते भगवान शिवांचं भिक्षादनर रूप प्रतीत होतं. भगवान शिवांच्या देवालयासमोर क्षेत्र वृक्ष आहे आणि सिरूथोंडर नायनार ह्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या मूर्ती आहेत.

श्री दुर्गादेवी अष्टभुजा दुर्गादेवींच्या रूपांत आहेत. त्यांच्या आठ हातांमध्ये शस्त्रे आहेत. त्यातलं एक शस्त्र धनुष्य आहे.

आतल्या परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आहेत - श्री भिक्षादनर, श्री संतन नंगै, सीरलथेवर, सिरूथोंडर नायनार आणि ६३ नायनमार. बाहेरील परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आहेत- श्री सिद्धिविनायक, शैव संत नालवर, नागांच्या मूर्ती संगनिधी आणि पद्मनिधी, श्री वातापी गणपती, सप्तशद महर्षी आणि त्यांनी पूजिलेलं शिव लिंग, श्री ब्रह्मदेवांनी पूजिलेलं शिव लिंग ज्याला दोन बाण आहेत, वल्ली आणि दैवानै समवेत श्री सुब्रह्मण्य, मनुष्याचे मुख असलेले श्री विनायक ज्यांना श्री आदि गणेश असं संबोधलं जातं. 

अष्टमूर्ती मंडपामध्ये भगवान शिवांच्या आठ संहार मूर्ती एका समरेषेमध्ये आहेत. त्या मूर्ती अशा आहेत - श्री भुजलिंग मूर्ती, श्री गजसंहार मूर्ती, श्री ऊर्ध्वतांडव मूर्ती, श्री कालसंहार मूर्ती, श्री भिक्षादनर, श्री त्रिपुरसंहार मूर्ती आणि श्री भैरव.

इथे एक असे शिल्प आहे ज्यामध्ये सिरूथोंडर नायनार ह्यांना कैलासावर नेण्यात येत आहे असे दर्शविले आहे. 

नवग्रह मंडपामध्ये श्री सूर्य हे उंच चौथऱ्यावर आहेत.

अष्टमूर्ती मंडपामध्ये पुढील मूर्ती आहेत - श्री दुर्गादेवी, विराट्ट मूर्ती, नटराज सभा, नवग्रह, श्री भैरव, श्री स्तंभमूर्ती विनायक आणि श्री सूर्य.

भगवान शिवांचे नऊ तांडव असे आहेत:

१. थिरुवलंगडू येथे ऊर्ध्वतांडव

२. कैलास पर्वतावर वेदतांडव

३. थिरुवेंगाडू येथे रहस्यतांडव

४. चिदंबरम येथे आनंदतांडव

५. मदुराई येथे कालमारी तांडव (उजव्या पाया ऐवजी डावा पाय जमिनीवर. तामिळ मध्ये काल म्हणजे पाय, आणि मारी म्हणजे परिवर्तन)

६. कुंभकोणम येथे अदवल्लर तांडव

७. वल्लुवूर येथे दारूकवन तांडव

८. अटकाई येथे त्रिपुर तांडव

९. ह्या ठिकाणी उभय पांडव तांडव

इथे मरगद (पाचू) लिंग आहे जे तिजोरीमध्ये ठेवले आहे.

प्रार्थना:

१. भाविक जन इथे पापांचं निरसन करण्यासाठी प्रार्थना करतात.

२. भाविक जन इथे दोष निरसन होऊन मन शांत आणि स्वच्छ व्हावं म्हणून प्रार्थना करतात.

३. गर्भवती स्त्रिया इथे सुरक्षित आणि सहज प्रसूती व्हावी म्हणून प्रार्थना करतात.

४. भाविक जन इथे अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करतात.

पूजा:

रोज नियमित सहा पूजा केल्या जातात. तसेच प्रदोष पूजा केली जाते.

मंदिरात साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): भरणी नक्षत्र दिवशी इथे पिल्लैकारी नावाची विशेष पूजा केली जाते. सिरूथोंडर नायनार ह्यांच्या पुत्राच्या स्मृत्यर्थ ही पूजा केली जाते.

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): शताभिषा नक्षत्र आणि षष्ठी दिवशी विशेष पूजा केली जाते तसेच गणपती उत्सव पण साजरा होतो.

थै (जानेवारी-फेब्रुवारी): पुष्य नक्षत्र दिवशी विशेष पूजा

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते १०, संध्याकाळी ५ ते ८

मंदिराचा पत्ता:

श्री गणपतीश्वरर मंदिर
थिरुचेनकट्टनगुडी, गणपती चरम,
जिल्हा: थिरुवारुर
तामिळ नाडू ६९०७०४

दूरध्वनी: +९१-४३६६२७०२७८, +९१-४३६६२९२३००, +९१-९४४४३११३०२


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.